कालपासून जरा अस्वस्थच वाटत होत. त्यामुळे वाटलं हे सुद्धा मी माझ्या शब्दात मांडले पाहिजे. तस तर या घटना सतत घडत आहे. मनाला चटका लावणारी, माणुसकीच्या नावाला काळ फासणारी, कंठ दाटून टाकणारी, आणि एक मुलगी म्हणून मनात धसकी भरणारी, ती म्हणजे स्त्रीवर होणारे अत्याचार त्यालाच समाजात बलात्कार असे म्हणतात. खूप संवेदनशील गोष्ट आहे. बँगलोर मधली घटना मी ऐकली, आणि हे ऐकून मन खूप अस्वस्थ झालं. डोळ्यासमोर येतो तो त्या व्यक्तींनी किती सहन केले असेल, किती आक्रोश केला असेल, त्या मायबापाला किती दुःख वाट्याला आलं असेल..........आणि हे सर्व थांबायला हवं आहे......
आपल्या देशात घडणाऱ्या या देशाला काळिमा फासणाऱ्या घटना रोज घडत आहे. काही या समोर येतात तर काही भीती पोटी लपवून ठेवतात. भारत कितीही विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ, साक्षरता अनेक सुविधांमध्ये प्राविण्य मिळवत प्रगती करत असला तरी जोपर्यंत या अश्या दुर्देवी घटना आपण थांबवू शकत नसेल तर त्या प्रगती ला काही अर्थ नाही, आज जर देशाच्या मुलीला या अत्याचारापासून वाचवायला देश असमर्थ असेल तर हे देशाचं दुर्दैव्य आहे. आज एक मी पण मुलगी आहे, आज या घटना ऐकून भीती पण वाटे आणि देशाच्या प्रणालीवर विश्वास बसत नाही. नेहमी ऐकण्यात येणाऱ्या गुन्ह्यापैकीं हा एक अत्याचार आहे. एखादी बातमी आली कि खूप मनावर प्रभाव पडतो. आपण सुरक्षित राहायला हवं. दिवस गेले कि आपण सामान्य बनतो आधीसारखेच, आपल्याच जगात रमून जातो, पण हे आपलं वागणं चुकीचं आहे.
समाजात याबाबदल बोलायला गेलं कि काही लोक स्त्रीला दोषी ठरवतात किंवा काही त्या नालायक लोकांना...सर्वांची वेगळे वेगळी बाजू असू शकते...पण सर्व प्रकरणात एकच पकडून आपण चालू नाही शकत.. चुकी हि कोणाचीही असू शकते, तपास केल्यावर गुन्हेगाराला पकडल्याच जाते. ज्यांच्या हातात उच्च शक्ती आहे, ते करतील काय करायचं ते पण गरज हि आहे स्व:रक्षणाची. शेवटी स्वतःला सुरक्षित करण्यासाठी स्वतःला ताकतीने मोठे करायचे आहे.
आजच्या काळात योग्य संगोपनाची गरज आहे. शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीला साक्षर बनवते पण पुस्तके सोडून इतर गोष्टीविषयी ज्ञान गरजेचं आहे. आजच्या काळात स्वरक्षण म्हटलं की महिलांसाठी स्वरक्षणचे धडे शिकवले जातात परंतु त्याच्याआधीपण काही साध्या साध्या गोष्टी मदतीला ठरू शकतात. सुरवात हि आई वडिलांपासून होते. आज पालक आणि बालक यामध्ये पारदर्शकता राहिलेली नाही. आज प्रत्येक आई वडिलांनी आपल्या पाल्याना या गोष्टीबद्दल जाणीव करून द्याची गरज आहे. मुलींना पण आपल्या पद्धतीने सुरक्षित राहायला शिकवायला हवं, आणि मुलांना सुद्धा मुलींचा आदर करायला शिकवायला हवा. असं संभाषण फार कमीच होत असेल. आज प्रत्येक घरात राजमाता जिजाऊ असत्या तर शिवबा जन्माला आला असता आणि राणी लक्ष्मीबाई ची शूरता प्रत्येक मुलीत असती तर क्रूर लोकांना धडा शिकवलं असता पण आजचा काळ खूप भयंकर आहे त्यामुळे तुम्हीच ती व्यक्ती आहे जी स्वतः माणुसकी दाखवू शकेल आणि सामर्थ्य एकत्र करून शक्तीचा उपयोग कराल.
आपण कुठेही वावरत असताना आपल्या आजूबाजूला लोक असतात, त्यामुळे लोक ओळखायला शिकणे हि स्वरक्षणाची पहिली पायरी आहे. त्यांनतर एक मर्दपणा असायला हवा, जर काही वाईट घडत असेल तर त्याला विरोध करायची शक्ती असली पाहिजे. आज मार्केटला अनेक स्वरक्षणासाठी उपकरण किंवा साधन उपलब्ध आहेत, ती विकत घ्या आणि बाहेर जाताना नेहमी तुमच्याजवळ ठेवा, काही चुकीचं वाटलं की लगेच हिमतीने सामना करायला शिका. आज आपल्याला कोणी वाईट नजरेने बघायला नको त्यामुळे आपल्या परीने वागणूक ठेवायला हवी.
No comments:
Post a Comment