Wednesday, March 02, 2022

अर्थ गणित

                घरात येणाऱ्या संपत्तीला लक्ष्मीचे स्वरूप समजल्या जाते. प्रत्येक घरात लक्ष्मीचा वास असतो. लक्ष्मीला धन संपदाशांती आणि समृद्धी ची देवी समजल्या जाते. हातात  येणाऱ्या धनाचा उपयोग योग्य रीतीने करणे महत्त्वाचे असते. धन हातळण्याची कला ही धन कमवण्यापेक्षा महत्वाची ठरते. जीवन जगताना अनेक गोष्टी लक्षात ठेवून समोर पाऊल टाकावे लागते. पण आजकाल बहुतांश घरात आर्थिक स्थिति मध्ये फार प्रमाणात बदल झालेले आहेत. आणि त्यामागची कारणं अनेक आहेत. ती एक एक बघूया..

                        आजच्या काळात घरातील प्रत्येक व्यक्तीकडे दूरध्वनी असतो....काळ बदलतोय तसा  अनावश्यक खर्च वाढतोय ..... मुलं-मुलींची शैक्षणिक खर्च वाढलालहान मुलामुलीना शिकवणीला पाठवण्याची सवय झाली आहे ... ....वाढदिवस आणि वेगळे समारंभात अनेक दिखावा खर्च..... हळदमेहंदीलग्न समारंभात अतिशय खर्च कशासाठी एक प्रतिष्ठा असावी..... लोक काय म्हणतील या विचारपाई कर्ज  घेतात आणि नंतर ते फेडण्याची वेळ येते............हॉटेल मध्ये जेवण करायला जाण्याची भर पडली......मित्र मंडळात पार्टी करण्याच एक वेगळच वेड लागल आहे. काही नवीन वस्तु घेतली तरी त्यासाठी पार्टी मागितली जाते....खाण्यापिण्यात बदल झाल्यामुळे वैद्यकीय खर्चात वाढ...... असे अनेक अनावश्यक खर्च टाळणे आजची गरज आहे. आपली गरज ही अन्नवस्त्र आणि निवारा आहे. लोकांसाठी आपला अनावश्यक खर्च करण्याची गरज नाही आहे.

                जुन्या काळात घरात एकच दूरध्वनी असायचाआणि आता घरातील प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचा दूरध्वनी असतोच. त्यामुळे खर्चात  वाढ झाली आहे. आधी टी.व्ही. वर  मोजक्या वाहिन्या असायच्या आणि त्या सर्व मिळून बघायचेवाहिनी संपली की लोक झोपायचे किवा गप्पा करत बसायचे. पूर्वी शालेय विद्यार्थी शाळा करूनमैदानावर खेडून लवकर झोपी जायचे पण आता शिक्षणाचा ताण वाढला आणि कोविड च्या काळात अभ्यासाची एक आवड कमी झाली..आणि मोबाइलच वेड लागल.....पूर्वी आजी-आजोबाना  चष्मे लागायचे आता लहान मुला-मुलीना चष्मे लागतात....विशेष पदार्थ सणाच्या दिवशीच केले जायचे पण आता खाण्यापिण्यात खूप बदल झाले आहे त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण वाढले आहे...

 

           आजच्या काळात  माणूस स्वतःला काळाच्या प्रवाहात वाहू देत आहे. पण त्याच प्रवाहात आपण होडी वापरुन आपण आपल्या मार्गाने प्रवाहात गेलो तर ते उत्तम असेल. 

जीवनात आपण ठरवलेल्या प्रवाहात आनंद घेत जगायच....

पूर्वी जवळ काही नसताना आनंदात जगता येत होत. पण आता मार्गदर्शन घेतात की स्वतःला आनंदी कसे ठेवायचे..  या दोन ओळीच सर्व काही सांगून जातात..

म्हणून खरा आनंद आणि पैश्यांचा संबंध नसतो. आणि खरा आनंद विकत घेता येत नाही.. त्यासाठी मनाची श्रीमंती असणे गरजेच असते....

No comments:

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...