प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सभोवतील वतावरणाचा, परिसराचा शारीरिक, मानसिक किंवा व्यक्तिमत्त्व विकासावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. प्रत्येक व्यक्तीची वाढ होत असताना ती व्यक्ती आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीवरून शिकत जातो आणि आत्मसात करत असतो. नवनवीन गोष्टी शिकत असताना त्या चांगल्या आहे की वाईट आहेत याच परीक्षण त्या व्यक्तीला करता येईलच अस नाही. त्यासाठी आदर्श व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज असते.
आदर्श व्यक्ती कोण ?
आदर्श व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल, आणि तुम्ही कुठे चुकत असाल तर ती चूक तुम्हाला सांगून त्यावर योग्य उपाय सांगेल. अशी ही आदर्श व्यक्ती स्वतःलाच शोधावी लागते.
आयुष्य जगताना खूप लोक भेटतात. काही मैत्रीच्या रूपात काही गुरूच्या रूपात किंवा अजून काही.............. मैत्रीच्या रूपात भेटणाऱ्या व्यक्तीमध्ये चांगले आणि वाईट गुण असतात आणि या संगतीचा परिणाम स्वतःवर होतो. आपण त्या व्यक्तीकडून कोणते गुण घ्यावे हे स्वतःवर अवलंबून असते.
जेव्हा व्यक्ती माणूस ओळखायला शिकतो, तेव्हा त्या व्यक्तीचा एक नवीन प्रवास सुरू होतो. कारण तेव्हा एक स्वतःवरचा विश्वास कायम असतो आणि काय बरोबर काय चूक आहे याची जाणीव येते. आपल कोण ? या प्रश्नाच उत्तर मिळून जाते.
आयुष्यात संगत खूप महत्त्वाची असते. त्याच आधारे आपलं आयुष्य प्रकाशात किवा अंधारात जाऊ शकते. त्यामुळे प्रकाश की अंधार यापैकी कोणत्या मार्गाने जायच हे स्वतः ठरवून स्वतःच्या बळावर आयुष्यातील यशाची शिखरे गाठायची.
No comments:
Post a Comment