लिखाण हे एक संवादाचे साधन आहे. प्रत्येकाला आपलं जीवन कस जगायचं याच स्वातंत्र्य आहे. आपला देश जसा आधुनिक प्रगती करत आहे तसंच मानवाचे विचार पण आधुनिक गोष्टीकडे वळत आहे, या जगासोबत चालता चालता मूळ तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. आजच्या काळाची गरज बघून मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे. एकापण व्यक्तीला या तत्त्वाचे महत्त्व पटले तरी मला आनंद आहे.
Sunday, August 24, 2025
निःशब्द संवाद
Saturday, August 16, 2025
Let's Travel
Travelling is where person feels nature, meet new people. It is not only about the destination but the journey you enjoy. Travelling is new experience that has space in our hearts for the memories.It is a way to expand the thinking of our mind, heart and soul and It's not about how much distance is in our journey but cherishing seconds of that moment we enjoy.
At the end of the day what matters is you......
Thursday, July 27, 2023
पाऊसधारा
Sunday, June 18, 2023
पितृत्व
Wednesday, July 13, 2022
आनंदाचे क्षण
Friday, June 03, 2022
प्रेम म्हणजे काय ?
जगातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम. प्रत्येक सजीवामध्ये असणारी ही प्रेमाची भावना, काही मनातल्या गोष्टी न बोलता सांगून देते. प्रेम समजावायला कोणतीही वाख्या नाही. प्रेमाबद्दल कितीही शब्दाने व्यक्त केलं तरी कमीच आहे. तर नेमक प्रेम काय असतं हे बघूया
जेव्हा २ व्यक्तिमध्ये नात असते, तेव्हा त्या नात्यामधील जिव्हाळा, विश्वास, आनंद, दुःख या सर्वांचा एकत्रितपणे विचार म्हणजे प्रेम. प्रत्येक आनंदात सहभागी असणार म्हणजे प्रेम, दुःखात आधार देणार प्रेम, उद्दिष्टापर्यंत पोहचवण्यासाठी ताकत देणार प्रेम, मायेचा जिव्हाळा देणार प्रेम, नेहमी विचारपूस करणार प्रेम................ अस हे प्रेम
आपण घरी बागेत झाडे लावतो त्यात एखाद्या झाडाला फूल लागण्यासाठी खत पाणी देतो. जेव्हा ते फूल उगवते तेव्हा खूप आनंद होतो. त्या झाडाची वाढ होण्यासाठी केलेली काळजी पण एक प्रेमच आहे. पण तेच फूल आपल्याला आवडते म्हणून आपण त्या फुलाला तोडण आणि फूल झाडाला खूप छान दिसते म्हणून झाडाला शोभून ठेवणे या २ वेगळ्या गोष्टी आहे. फूल झाडपासून वेगळ करण एक आवड झाली, पण तेच फूल झाडाला शोभून दिसण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे प्रेम.
जगाला प्रेमाचे महत्त्व समजवून सांगणारे एकमेव, सर्वांचे प्रिय म्हणजे श्री कृष्ण. श्री कृष्णाच्या लीला बद्दल सर्वाना माहीतच आहे. राधाकृष्ण अस श्री कृष्ण आणि राधा यांचे एकत्रित नाव आज सर्व भक्त घेतात.राधाकृष्ण एकमेकावर किती अपार प्रेम करायचे हे सर्वाना माहीत आहेत पण तरी त्यांच लग्न झाल नाही तर याच कारण खूपच सुंदरतेने सांगितलेले आहे. श्री कृष्ण आणि राधा यांच एकमेकावर प्रेम अनंत आहे. प्रेम म्हणजे एकच आत्मा आणि शरीर हे आत्मा वर कार्यरत असते. मनातून दोघेही एकच झालेले आहे. श्री कृष्णाने प्रेमा च महत्त्व सांगितलं आहे. प्रेमात अहंकार क्रोध द्वेष, निष्काळजी या सर्वांची जागाच नाही आहे. प्रेम म्हणजे एक शुद्ध, पवित्र मनातील भावना.
खर प्रेम मिळण म्हणजे एक नशीब आहे. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीने पण आपल्यावर प्रेम करावे तितकीच आपली काळजी घ्यावी अस वाटत असते. पण जेव्हा नात्यात समजूतदारपणा, विश्वास, आपुलकी, काळजी असते तिथे खर प्रेम असते.
Wednesday, March 02, 2022
मनाचा स्पर्श
- आयुष्य खूप सुंदर आहे, जेव्हा स्वतः जगता जगता दुसऱ्यासाठी जगतो.
- न पाहता मनात रुजणारी गोष्ट म्हणजे खरी भावना.
- निस्वार्थपणे कार्य करणे हीच खरी सेवा.
- काही क्षणांना आशीर्वाद द्याल देव सुद्धा प्रेमाचा वर्षाव करीत असतो.
- खरा आनंद पैशातून विकत घेता येत नाही त्यासाठी अंतर्मन निर्मळ असायला हवे.
- एक रंगात दुसरा रंग एकत्र केला कि नवीन रंग तयार होतो पण तो रंग नक्कीच आकर्षित असेलच असं नाही ते त्या दोन रंगावर अवलंबून असते आणि जीवनाचं असच काही असते जेव्हा एक नवीन नात बनत.
- हाताची पाच बोटे सारखी नसतात पण एकत्रित होऊन काम कस पार पडायचं माहिती आहे, तसेच मैत्रीत एकमेकांना समजल्याशिवाय एकत्र काम करणे कठीण असते.
- निसर्गातील प्रत्येक गोष्टीकडून शिकवण येतेच, दिवस संपला कि रात्र येतेच तेच दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळ होतेच तर नवीन दिवसाचा विचार मनात ठेवायचा.
३ रंग आयुष्याचे
बालपण आणि म्हातारपण साम्य आहे अस म्हणतात. बाळ जन्माला येते आणि तो जीव सर्वांचा लाडका असतो. पण जेव्हा त्या बाळाची काळजी घ्याची असते तेव्हा कष्ट लागते, कारण त्या बाळाला बोलता येत नाही, सांगता येत नाही. प्रत्येक गोष्ट हाई आईला, बाबाला समजून घ्यावी लागते. बाळ रडते आहे तर काय करायला हवं हे हळू हळू शिकून घेतात. त्या बाळाला आधार हवा असतो.
बाळ मोठं होत होत युवावर्गात प्रवेश करतो. त्या काळात अनेक मित्र मैत्रिणी मिळतात, त्यापैकी जास्तीत जास्त हे काही वर्षासाठी मैत्री असणारे असतात पण काहीसोबत मैत्री ही कायम साथ देणारी असते. खूप काही नवीन शिकण्याचा काळ असतो. याच काळात आपलं ध्येय, आपल्या आवडीनिवडी ठरवतो आणि एका भविष्याच्या वाटचालीने जगतो.
म्हातारपण एक कसोटीची परिस्थिती असते, वृद्ध व्यक्ती सहज बोलून दाखवत नाही, त्यांना अस वाटते याना त्रास नको त्यासाठी मौन असतात पण त्यांची ती गोष्ट माहित करायला समजून घ्यावं लागते. प्रत्येक गोष्टीत आधार द्यावा लागतो. चालायला आधार देण्यापासून ते जेवण भरवण्यापर्यंत सर्वच करावं लागते. जेव्हा व्यक्ती जवळची असते तेव्हा पूर्ण आपुलकीने सेवा केली जाते. आणि त्याच वेळेला आपण आयुष्यभर काय कमावलं याच फळ माहित पडते. रक्ताच्या नात्यांनी दिलेली साथ नाहीतर सोडलेली साथ..........
ती
कालपासून जरा अस्वस्थच वाटत होत. त्यामुळे वाटलं हे सुद्धा मी माझ्या शब्दात मांडले पाहिजे. तस तर या घटना सतत घडत आहे. मनाला चटका लावणारी, माणुसकीच्या नावाला काळ फासणारी, कंठ दाटून टाकणारी, आणि एक मुलगी म्हणून मनात धसकी भरणारी, ती म्हणजे स्त्रीवर होणारे अत्याचार त्यालाच समाजात बलात्कार असे म्हणतात. खूप संवेदनशील गोष्ट आहे. बँगलोर मधली घटना मी ऐकली, आणि हे ऐकून मन खूप अस्वस्थ झालं. डोळ्यासमोर येतो तो त्या व्यक्तींनी किती सहन केले असेल, किती आक्रोश केला असेल, त्या मायबापाला किती दुःख वाट्याला आलं असेल..........आणि हे सर्व थांबायला हवं आहे......
आपल्या देशात घडणाऱ्या या देशाला काळिमा फासणाऱ्या घटना रोज घडत आहे. काही या समोर येतात तर काही भीती पोटी लपवून ठेवतात. भारत कितीही विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ, साक्षरता अनेक सुविधांमध्ये प्राविण्य मिळवत प्रगती करत असला तरी जोपर्यंत या अश्या दुर्देवी घटना आपण थांबवू शकत नसेल तर त्या प्रगती ला काही अर्थ नाही, आज जर देशाच्या मुलीला या अत्याचारापासून वाचवायला देश असमर्थ असेल तर हे देशाचं दुर्दैव्य आहे. आज एक मी पण मुलगी आहे, आज या घटना ऐकून भीती पण वाटे आणि देशाच्या प्रणालीवर विश्वास बसत नाही. नेहमी ऐकण्यात येणाऱ्या गुन्ह्यापैकीं हा एक अत्याचार आहे. एखादी बातमी आली कि खूप मनावर प्रभाव पडतो. आपण सुरक्षित राहायला हवं. दिवस गेले कि आपण सामान्य बनतो आधीसारखेच, आपल्याच जगात रमून जातो, पण हे आपलं वागणं चुकीचं आहे.
समाजात याबाबदल बोलायला गेलं कि काही लोक स्त्रीला दोषी ठरवतात किंवा काही त्या नालायक लोकांना...सर्वांची वेगळे वेगळी बाजू असू शकते...पण सर्व प्रकरणात एकच पकडून आपण चालू नाही शकत.. चुकी हि कोणाचीही असू शकते, तपास केल्यावर गुन्हेगाराला पकडल्याच जाते. ज्यांच्या हातात उच्च शक्ती आहे, ते करतील काय करायचं ते पण गरज हि आहे स्व:रक्षणाची. शेवटी स्वतःला सुरक्षित करण्यासाठी स्वतःला ताकतीने मोठे करायचे आहे.
आजच्या काळात योग्य संगोपनाची गरज आहे. शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीला साक्षर बनवते पण पुस्तके सोडून इतर गोष्टीविषयी ज्ञान गरजेचं आहे. आजच्या काळात स्वरक्षण म्हटलं की महिलांसाठी स्वरक्षणचे धडे शिकवले जातात परंतु त्याच्याआधीपण काही साध्या साध्या गोष्टी मदतीला ठरू शकतात. सुरवात हि आई वडिलांपासून होते. आज पालक आणि बालक यामध्ये पारदर्शकता राहिलेली नाही. आज प्रत्येक आई वडिलांनी आपल्या पाल्याना या गोष्टीबद्दल जाणीव करून द्याची गरज आहे. मुलींना पण आपल्या पद्धतीने सुरक्षित राहायला शिकवायला हवं, आणि मुलांना सुद्धा मुलींचा आदर करायला शिकवायला हवा. असं संभाषण फार कमीच होत असेल. आज प्रत्येक घरात राजमाता जिजाऊ असत्या तर शिवबा जन्माला आला असता आणि राणी लक्ष्मीबाई ची शूरता प्रत्येक मुलीत असती तर क्रूर लोकांना धडा शिकवलं असता पण आजचा काळ खूप भयंकर आहे त्यामुळे तुम्हीच ती व्यक्ती आहे जी स्वतः माणुसकी दाखवू शकेल आणि सामर्थ्य एकत्र करून शक्तीचा उपयोग कराल.
आपण कुठेही वावरत असताना आपल्या आजूबाजूला लोक असतात, त्यामुळे लोक ओळखायला शिकणे हि स्वरक्षणाची पहिली पायरी आहे. त्यांनतर एक मर्दपणा असायला हवा, जर काही वाईट घडत असेल तर त्याला विरोध करायची शक्ती असली पाहिजे. आज मार्केटला अनेक स्वरक्षणासाठी उपकरण किंवा साधन उपलब्ध आहेत, ती विकत घ्या आणि बाहेर जाताना नेहमी तुमच्याजवळ ठेवा, काही चुकीचं वाटलं की लगेच हिमतीने सामना करायला शिका. आज आपल्याला कोणी वाईट नजरेने बघायला नको त्यामुळे आपल्या परीने वागणूक ठेवायला हवी.
मैत्री
मैत्रीचा उल्लेख हा अनेक शब्दात वाक्यात करू शकतो. पण माझ्या मते मैत्री हि दुधासारखी असावी, दुधात पाणी टाकलं कि पाणी दुधाचं रूपे घेते पण दुधाला उष्णता दिली कि पाणी वाफेच्या रूपात दुधापासून वेगळं होते. म्हणजेच कितीपण कठोर क्षण आला तरी ती मैत्री कायम ठेवणारं, तितक्याच विश्वासाने मन जिंकून घेणारं नातं म्हणजे मैत्री.
रंगात रंग मिसळवला कि नवीन रंग तयार होतो पण तो रंग आकर्षित असेलच असं नसते, तो नवीन तयार झालेला रंग हा त्या दोन रंगावर अवलंबून असतो. तसेच मैत्रीच्या नात्यात त्या दोन व्यक्तीवर अवलंबून असते की हे मैत्रीचं नातं किती काळ टिकणार, विश्वास त्या मैत्रीचा मूलभूत पाय असतो.
जीवनात बरेच मित्र मैत्रीण भेटतात पण त्यातले काहीच शेवटपर्यंत सोबतीला असतात. कठीण प्रसंगी जो मदतीला येईल त्या नात्याचा मनापासून आदर करत असतो. जीवाला जीव लावणारे, खोट्या हास्याच्या मगच दुःख ओळखणारे, फक्त कामापुरते नाही तर बाकी वेळ पण आपली आठवण काढणारे, योग्य दिशा दाखवणारे असे जिवलगीचे मित्रमैत्रिणी भेटायला भाग्यच लागते.
तुमच्याकडे ते देवांनी दिलेलं अमूल्य नातं असेल तर नक्कीच जपून ठेवा....इतक्या मोठ्या जगात इतके लोक आहे पण आपली भेट त्याच व्यक्तीशी होणे आणि ते फार काळपर्यंत टिकणे हा एक देवाचाच आशीर्वाद आहे. जीवनात भेटणारी प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवूनच जाते, ती चांगलीही असू शकते किंवा वाईट पण.....एक जीवन जगायचं मूलमंत्र नक्कीच शिकवून देईल.....
चांदणी
निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...
-
काल ९ ऑक्टोबर रोजी श्री रतन नवल टाटा सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी साधारण मध्यरात्री प्रसारित माध्यमातुन कळाली. जणूकाह...
-
आनंदाने जीवन जगण्याची इच्छा बाळगत आईबाबांनी एका मुलीला जन्म दिला. फक्त आईबाबाच नाही तर पूर्ण परिवार आनंदाने न्हाहून निघाले....
