Showing posts with label जागरूकता. Show all posts
Showing posts with label जागरूकता. Show all posts

Friday, August 15, 2025

ती एक रात्र 🌌

           उन्हाळ्याचे दिवस होते. हळूहळू सूर्य मावळू लागला होता. दिवसभर उन्हाने तापून निघणाऱ्या गच्चीला थंड करायची वेळ झाली होती. टाकीतून पाणी घेऊन पूर्ण गच्चीवर पाण्याचा वर्षाव केला. पाण्याने गच्ची अगदी गार केली. जेवण आटोपून झोपण्यासाठी गाद्या टाकल्या गेल्या. गप्पा गोष्टीचा खेळ संपला आणि सर्व आपल्या आपल्या जागेवर झोपून एकटक आकाशाकडे पाहत राहिले.......

            निरभ्र आकाश आणि त्यात वाऱ्याची थंड झुळूक मनाला गुदगुल्या करत होती.  निरभ्र आकाशाला प्रकाशाची चाहूल लागली होती. आणि ती प्रकाशाची चाहूल पूर्ण करायला लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी संपूर्ण आकाश न्हाऊन निघाले आणि त्यात इवलीशी उगवती चंद्रकोर आसमंताला ध्यास लावून गेली. हे नयनरम्य दृश्य बघण्यात माझे मन रमले होते. खूप कौतुकाने हे दृश्य डोळ्यात सामावून घेत होती. असंख्य असणाऱ्या चांदण्या मोजण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण एकटीने मोजता येणारच नाही त्यामुळे सर्वांना कामी लावले पण मोजणी काही थांबेना. अगणित चांदण्यामध्ये सर्वात जास्त चमकणाऱ्या चांदणीला शोधत होते आणि ती गवसली. पूर्ण गोष्ट लक्षात नाही पण म्हणायचे की आकाशात चांदण्यामध्ये आजीबाईच्या खाटेचे ४ पाय आणि त्या बाजूला ३ चोर दिसतात. आणि खरंच ४ चांदण्या आयताकृतीत दिसल्या आणि त्या बाजूला ३ चांदण्यापण दिसल्या.

             चांदण्यांनी भरलेलं आकाश बघून फार कौतुक वाटायचं. आपलं जस जग आहे तसंच, त्या चांदण्या पलीकडे पण एक वेगळं जग असेल का ? सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी आणि पूर्ण सूर्यमालेचे घटकनिर्मिती कशी झाली असेल ? झाडांची आणि प्राण्यांची निर्मिती कशी झाली असेल ? असे प्रश्न मनात यायचे. लहान असताना आपल मन हे किती साध असतं, आपल्याला जे दिसतं त्याचबद्दल आपण साधेपणाने विचार करत असतो. 
              
               आज आधुनिक काळात प्रत्येक गोष्टीच विज्ञान असेल तरीही मला निसर्गाच्या या गोष्टीचं आजही नवलच वाटत. पण आजकाल चांदण्या दिसतातच कुठे ? समोरच्या पिढीला चांदण्या दाखवायच्या तरी कश्या ? आपण निसर्गाची निगा नाही राखली तर निसर्ग सुद्धा आपली निगा करणार नाही. वाढती लोकसंख्या, वाढत प्रदूषण, तापमानवाढ, जंगलतोड इत्यादि गोष्टी निसर्गाला हानी पोहचवत आहेत. म्हणून निसर्गाची काळजी घेणे ही आपलीच जबाबदारी समजून आपल कर्तव्य सर्वांनी पार पाडायला पाहिजेच.


Wednesday, August 14, 2024

खरचं देश स्वतंत्र झाला काय ?

                 आनंदाने जीवन जगण्याची इच्छा बाळगत आईबाबांनी एका मुलीला जन्म दिला. फक्त आईबाबाच नाही तर पूर्ण परिवार आनंदाने न्हाहून निघाले. मुलीला हातात घेऊन बाबाचा आनंद गगनात मावेना, आईने ९ महिने पोटात वाढलेल्या बाळाला कुशीत घेतल तेव्हा उर दाटून आला.

                   मुलीच्या रुपात साक्षात लक्ष्मीने जन्म घेतला, मुलीचा पायगुण घराला लागला. घराची भरभराट झाली. ते कुटुंब फार आनंदी होत. मुलगी जशी मोठी होऊ लागली तसे आईबाबा तिचे लाड पुरवत गेले, तिच्या स्वप्नांसाठी ते झटत राहिले. आपली मुलगी शिकून खूप मोठी व्हावी, आपलं नाव तिने मोठे करावे हीच इच्छा बाळगत ते मुलीला शिक्षणासाठी दूर पाठवू लागले. मुलगी पण तशीच जिद्दी, चिकाटी वृत्तीची, तिने आपल्या स्वप्नांना पंख दिले, खूप मेहनत घेतली. आपल्या आई बाबाच नाव मोठं करण्यासाठी ती कष्ट घेत राहिली.

                नियमितपणे रोजची कामे करत असताना अचानक घरच्यांना फोन येतो, तुमच्या मुलीने आत्महत्या केली. नेहमी सारखे आनंदात जगण्याऱ्या कुटुंबाला राक्षसाची नजर लागली. जिवाचे हाल करून मोठ केलेल्या मुलीच्या बाबतीत ही घटना एकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. काही समजेना, काही सुचेना, काय झालं असेल ते ही कळेना. गुलाबाच्या फुलाप्रमाणे जपणाऱ्या मुलीला त्या आई वडिलांनी आपल्या मुलीला मृत अवस्थेत बघितलं, रक्तबंबाळ शरीर, अस्त्यावस्त असलेलं निर्वस्त्र शरीर. दोघांचं काळीज चिरून उठलं.  दोघांचा आक्रोश आसमंतात पोहचला.

            त्या मुलीची अशी अवस्था का झाली ? तिने अंग प्रदर्शन करणारे कपडे घातले होते ? रात्रीच्या वेळी ती आपली नोकरी करत होती ? स्वतःसाठी नाहीतर दुसऱ्या जीवांना जपत होती ? ती कामाच्या जागी एका हॉल मध्ये आराम करत होती ? काय होती तिची चुकी ?

               जिवाचे रान करून अभ्यास करून शिक्षण घेतल ? स्वतःची पर्वा न करता दुसऱ्यांसाठी झटत होती ? कामाच्या ठिकाणी आपण सुरक्षित असणार हा विचार करत होती ? या होत्या तिच्या चुका ?

                मुलींनी बलात्काराच्या भीती पोटी घरीच बसायचं का ? शिक्षण घेऊन पण घरचीच कामे करायची का ? आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आकाशात घेतलेली झेप थांबवायची का ?

               चूक करणाऱ्या पेक्षा चुकीच्या गोष्टीबद्दल मौन राहणे हे जास्त अपराधी आहे. सतत घडणाऱ्या गोष्टींना आळा घालणं हे जास्त महत्त्वाचं वाटते. प्रत्येक दिवसाला काही न काही नवीन धक्कादायक बातम्या समोरच येतात पण न्यायाच काय ? आरोपी लपवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. हे सर्व कधी थांबणार ? कधी हा देश बलात्कार मुक्त होणार ? या अश्या राक्षस वृत्तीच्या लोकांना जगण्याचा अधिकार नकोच.

        भारत भूमी ही संतांची भूमी आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले, थोर महापुरुष, राजे, महाराजे यांनी स्व मेहनतीवर स्वराज्य निर्माण केले. त्याच भूमीवर अश्याप्रकरचे दुष्कर्म थांबत नाहीत हे बघून मनाला अत्यंत दुःख वाटते. सर्वांनी एकमेकांना जपा, अस कृत्य कोणासोबत घडू नये..... बाकी काय अजून समोर खूप काही बघायचचं आहे..........


हा देश माझा याचे भान,
जरासे राहू द्या रे
जरासे राहू द्या
अभिलाषा यांची धरिता
कुणी नजर वाकडी करिता
त्या मरण द्यावया,
स्फुरण आपुले बाहु पाऊ द्या रे ॥


Friday, January 26, 2024

Incredible India 🇮🇳

From learning the history of our India's independence to witnessing growth of India beating other countries in many ways, this journey has been incredible.

Even though everything has two sides how we see but I wanted to narrate the positive sides of our Bharat.

Metro cities development, growth in IT sector, technology development, space research, agriculture research, growing financial economy, sports participation, young entrepreneurs, women empowerment, prioritising cultures, growth in business, increasing startups, cleanliness drives,  creation of cultural architectures etc has help to glow INDIA 🧡🤍💚🇮🇳

Our generation has been seeing the growth as much faster, the generation from our parents has suffer a lot that needs to be appreciated.
Overcoming from earthen stove to LPG gas from walking miles of distance for work to using public transport or owned vehicles, from having only basics needs to having luxurious life, we have come far now.

Even though you are new to any city you will find the way to survive using a device that is our phones, Just search and get it there. ( I am also doing the same everytime 😉)

Thinking about the life before 10 years, now it has been more easy and convenient for people of India. Single blog cannot explain the richness and achievements of India. India has become more powerful. Praising today's era we should not forget our freedom fighters. The life we are enjoying, working hard to earn money is because of the freedom we got.

India has ranked first in the population in the world, Managing 140 crore people is not an easy task, everyone has different mindset, not all people are same and everyone has their own views. Hence respect to Everyone who is contributing towards India's success.
proud to be an Indian 🧡🤍💚


Sunday, June 18, 2023

मानवा डोळे उघड

                        मानवाच्या जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवधर्म. देवांवर विश्वास ठेवणारे म्हणजे आस्तिक आणि विश्वास न ठेवणारे म्हणजे नास्तिक. आपण देवाला प्रत्यक्षात पाहलेले नसले तरी त्याचं रूप आपल्याला माहीत आहे, मूर्तिमार्फत किवा फोटोमार्फत आणि काहींनी अनुभव पण घेतला असेल. 

                 सर्वांना सुखी ठेव, ज्ञान दे, बुद्धी दे अशी प्रार्थना आपण देवाला करतो आणि देव आपल सर्व ऐकतो आणि आपल्याला साह्य करतो अशी ही आपली श्रद्धा असते. देवाबद्दलची मनातील श्रद्धेची भावना निर्मळ आणि पवित्र असते. देव आपल्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही, फक्त भक्तांनी पवित्र मनाने भक्ति करावी. आजच्या काळात काही प्रमाणात रूप बदललेल दिसते, धर्माच्या नावावर लोकांकडून  पैसा काढला जातो, प्रत्येक मंदिरात दानपेटी असते, भक्त इच्छेप्रमाणे दानपेटीत पैसे दान करतो पण काही ठिकाणी श्रद्धेच्या नावावर लोकांकडून पैसा मागितला जातो आणि हे मला पूर्णपणे चुकीचे वाटते, जिथे पैसा आला तो व्यवसाय झाला असे मला वाटते.

             आजही काही संस्था खूप छान  प्रकारे कार्य करत आहे. सर्वांना सोईस्कर दर्शन व्हावे, महाप्रसाद मिळवा यासाठी खूप छान पद्धतीने नियोजन करत आहे आणि या संस्थाकडून हीच शिकवण घेणे उपयुक्त ठरेल. स्वतः मनापासून दान करणे आणि मागितलेले पैसे देणे यात खूप फरक असतो आणि देवकार्यात चुकीच्या मार्गाने पैसे येत असतील तर हे खूप चुकीचे आहे. 

Wednesday, March 02, 2022

अर्थ गणित

                घरात येणाऱ्या संपत्तीला लक्ष्मीचे स्वरूप समजल्या जाते. प्रत्येक घरात लक्ष्मीचा वास असतो. लक्ष्मीला धन संपदाशांती आणि समृद्धी ची देवी समजल्या जाते. हातात  येणाऱ्या धनाचा उपयोग योग्य रीतीने करणे महत्त्वाचे असते. धन हातळण्याची कला ही धन कमवण्यापेक्षा महत्वाची ठरते. जीवन जगताना अनेक गोष्टी लक्षात ठेवून समोर पाऊल टाकावे लागते. पण आजकाल बहुतांश घरात आर्थिक स्थिति मध्ये फार प्रमाणात बदल झालेले आहेत. आणि त्यामागची कारणं अनेक आहेत. ती एक एक बघूया..

                        आजच्या काळात घरातील प्रत्येक व्यक्तीकडे दूरध्वनी असतो....काळ बदलतोय तसा  अनावश्यक खर्च वाढतोय ..... मुलं-मुलींची शैक्षणिक खर्च वाढलालहान मुलामुलीना शिकवणीला पाठवण्याची सवय झाली आहे ... ....वाढदिवस आणि वेगळे समारंभात अनेक दिखावा खर्च..... हळदमेहंदीलग्न समारंभात अतिशय खर्च कशासाठी एक प्रतिष्ठा असावी..... लोक काय म्हणतील या विचारपाई कर्ज  घेतात आणि नंतर ते फेडण्याची वेळ येते............हॉटेल मध्ये जेवण करायला जाण्याची भर पडली......मित्र मंडळात पार्टी करण्याच एक वेगळच वेड लागल आहे. काही नवीन वस्तु घेतली तरी त्यासाठी पार्टी मागितली जाते....खाण्यापिण्यात बदल झाल्यामुळे वैद्यकीय खर्चात वाढ...... असे अनेक अनावश्यक खर्च टाळणे आजची गरज आहे. आपली गरज ही अन्नवस्त्र आणि निवारा आहे. लोकांसाठी आपला अनावश्यक खर्च करण्याची गरज नाही आहे.

                जुन्या काळात घरात एकच दूरध्वनी असायचाआणि आता घरातील प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचा दूरध्वनी असतोच. त्यामुळे खर्चात  वाढ झाली आहे. आधी टी.व्ही. वर  मोजक्या वाहिन्या असायच्या आणि त्या सर्व मिळून बघायचेवाहिनी संपली की लोक झोपायचे किवा गप्पा करत बसायचे. पूर्वी शालेय विद्यार्थी शाळा करूनमैदानावर खेडून लवकर झोपी जायचे पण आता शिक्षणाचा ताण वाढला आणि कोविड च्या काळात अभ्यासाची एक आवड कमी झाली..आणि मोबाइलच वेड लागल.....पूर्वी आजी-आजोबाना  चष्मे लागायचे आता लहान मुला-मुलीना चष्मे लागतात....विशेष पदार्थ सणाच्या दिवशीच केले जायचे पण आता खाण्यापिण्यात खूप बदल झाले आहे त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण वाढले आहे...

 

           आजच्या काळात  माणूस स्वतःला काळाच्या प्रवाहात वाहू देत आहे. पण त्याच प्रवाहात आपण होडी वापरुन आपण आपल्या मार्गाने प्रवाहात गेलो तर ते उत्तम असेल. 

जीवनात आपण ठरवलेल्या प्रवाहात आनंद घेत जगायच....

पूर्वी जवळ काही नसताना आनंदात जगता येत होत. पण आता मार्गदर्शन घेतात की स्वतःला आनंदी कसे ठेवायचे..  या दोन ओळीच सर्व काही सांगून जातात..

म्हणून खरा आनंद आणि पैश्यांचा संबंध नसतो. आणि खरा आनंद विकत घेता येत नाही.. त्यासाठी मनाची श्रीमंती असणे गरजेच असते....

पालक आणि बालक

                        आईवडील म्हणून जगताना आधी एक मित्र आणि मैत्रीण म्हणून जगावं लागतपण का असं तर मित्र आणि मैत्रीण म्हटलं कि आपल्याच वयाचे असतातत्याच डोकं सारखंच चालत आणि विचार सारखेच चालतात. आज जर आपला मुलगा किंवा मुलगी प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे येऊन सांगत असेल तर फारच उत्तम आहे. पाल्याला एक वळण लावण्यास मदत होईल. चांगली कामगिरी असेल त शाबासकी देता येईल किंवा चुकीचं घडल्या वळण लावता यतेची. पण तेच लेकरू घाबरत असेल तर ते काय सांगणारघरातच वादभांडणताणतणाव तर कोणत्या प्रकारे मनोवृद्धी होईलकिंवा काय शिकेल अजून घाबरेल तेमी नाही सांगत भीती वाटे मला असं मन होऊन जाईल आणि ते आपल्या वर्तुळाच्या बाहेर निघायचा प्रयत्न पण करणार नाही.

                    शिक्षण महत्त्वाचं आहेचत्यात एका दबावाखाली येऊन अभ्यास करीत भरपूर मार्क्स मिळवणारपरंतु फक्त अभ्यासच करणे हा त्यावरचा पर्याय नाही आहे. अभ्यास सोडून पण इतर भरपूर काही शिकण्यासारखे आहे. त्यामुळे मार्क्स वरून त्या विद्यार्थ्यांची किंमत लक्षात घेणे हे चुकीचं आहे. सर्वांच्या वेगळ्या उच्चआवडीनिवडी असतात. मार्क्स भरपूर आले कीअपेक्षा पण वाढते आपलं नाव मोठं करेल म्हणूनकरेल नक्कीच पण त्या अडखडलेल्या मनाचं काय जर कधी अपयश मिळालं तर .... चुकीचा विचार केला तर......

             साधं उत्तर आहेआपल्या पाल्याला एक मित्र आणि मैत्रीण म्हणून जवळ घ्याएक जीवन कस जगायचंजगातील बाहेरचे लोक वाईट दृष्टिकोनाचे असू शकतात.या काही गोष्टींबाबदल सांगा. आणि एक खरं जीवन जगणारा व्यक्ती बनवाहेच खूप मोलाचं आहे. लहानपणी तुम्ही हि शिकवण दिली तर तुमच्या म्हातारपणात तुम्हाला एकटं नाही सोडणार. फक्त गरज पुरविणे इतकच नसते हे प्रेमशिक्षण घेतलं मोठ्या नोकरीवर असून आईवडिलांसाठी  वेळ नसणाऱ्या लोंकाना किंमत नसते. 

             जग खूप मोठं आहे जगायचं असेल तर वाघासारखा जगायला शिकवा आणि मरण हे किड्यामुंगीसारखे नको आहे. रस्त्यावर जाताना पण पाटी असते  त्यावर लिहलं असते,'नजर हाती दुर्घटना घटी'. संगोपन हा प्रत्येकाच्या जीवनाचा खूप मोठा भाग आहे. म्हणतात ना 'जे पेराल तेच उगवेलम्हणजेच तुम्ही जशी शिकवण द्याल वळण द्याल तशीच वागणूक ही तुमच्या पाल्यामध्ये असेल.

 विचार करा आणि पटलं तर नक्कीच जीवनात या विचाराचे पालन करा.......

३३ कोटी देवतांची संकल्पना

 देव हा एकच आहे. देवांनी भिन्न रूप धारण करून एक वेगळं जग निर्माण केलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत ब्रह्मविष्णूशिवशक्ती आणि गणपती या देवांना पंचदेवता मानले जातात. ब्रह्मदेवांनी संपूर्ण सृष्टी निर्माण केली आणि श्रीविष्णू हे सृष्टीचे पालनहार आहेत असे मानले जाते. महादेव शिवशंकर हे सृष्टिच्या लय तत्त्वाचे स्वामी मानले जातात. शक्ती हे देवीचे स्वरुप मानले गेले आहे. गणपती हे मूळ स्वरुप मानले गेले आहे.

गायीच्या पोटात ३३ कोटी देवतांचा वास असतो असे मानले जाते. ३३ कोटी देवता ही संकल्पना आहे. ३३ कोटी ही देवतांची संख्या नाही. संस्कृतमध्ये कोटी ' या शब्दाचा अर्थ प्रकार ' आहेम्हणून ३३ कोटी देवता नसून देवता या ३३ प्रकारच्या आहेत.

त्या ३३ देवता कोणत्या ते बघूया

सृष्टीचे व्यवस्थापन करणे हे या ३३ कोटी देवतांकडे असते असे मानले जाते. या ३३ कोटी देवतांमध्ये ८ वसू११ रुद्र१२ आदित्य१ इंद्र१ प्रजापती यांचा समावेश आहे. प्रत्येक देवतांचे कार्य हे वेगळे असल्यामुळे त्यांना कोटी असे म्हटले जाते.

  • ८ वसू   -  आपधृवसोमधरअनिलअनलप्रत्यूष आणि प्रभास                                                                               ( जलतारेचंद्रपृथ्वीवायूअग्नीसूर्यआकाश )
  • ११ रुद्र  -  मनुमन्युमहतशिवऋतुध्वजमहीनसउम्रतेरसकालवामदेवभव आणि धृत-ध्वज.                           
  • १२ आदित्य   - अंशुमानअर्यमनइंद्रत्वष्टाधानूपर्जन्यपूषनभगमित्रवरूणवैवस्वत व विष्णू      

                        सूर्याला आदित्य पण म्हटले जाते. भारतीय दिनदर्शिका सूर्य आधारित बनवलेली असते. एक वर्षात १२ महिने असतात. त्याच १२ महिन्यांना आदित्य म्हणून संबोधले जाते.                                                                                                                                                

  • १ इंद्र 
  • १ प्रजापती 

असे पूर्ण मिळून ३३ प्रकारचे देवता संपूर्ण सृष्टीला जीवनदान प्रदान करतात. ३३ देवतांचे देवता हे साक्षात देवांचे देव महादेव आहे. 

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...