आईवडील म्हणून जगताना आधी एक मित्र आणि मैत्रीण म्हणून जगावं लागत, पण का असं ? तर मित्र आणि मैत्रीण म्हटलं कि आपल्याच वयाचे असतात, त्याच डोकं सारखंच चालत आणि विचार सारखेच चालतात. आज जर आपला मुलगा किंवा मुलगी प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे येऊन सांगत असेल तर फारच उत्तम आहे. पाल्याला एक वळण लावण्यास मदत होईल. चांगली कामगिरी असेल त शाबासकी देता येईल किंवा चुकीचं घडल्या वळण लावता यतेची. पण तेच लेकरू घाबरत असेल तर ते काय सांगणार, घरातच वाद, भांडण, ताणतणाव तर कोणत्या प्रकारे मनोवृद्धी होईल, किंवा काय शिकेल अजून घाबरेल ते, मी नाही सांगत भीती वाटे मला , असं मन होऊन जाईल आणि ते आपल्या वर्तुळाच्या बाहेर निघायचा प्रयत्न पण करणार नाही.
शिक्षण महत्त्वाचं आहेच, त्यात एका दबावाखाली येऊन अभ्यास करीत भरपूर मार्क्स मिळवणार, परंतु फक्त अभ्यासच करणे हा त्यावरचा पर्याय नाही आहे. अभ्यास सोडून पण इतर भरपूर काही शिकण्यासारखे आहे. त्यामुळे मार्क्स वरून त्या विद्यार्थ्यांची किंमत लक्षात घेणे हे चुकीचं आहे. सर्वांच्या वेगळ्या उच्च, आवडीनिवडी असतात. मार्क्स भरपूर आले की, अपेक्षा पण वाढते आपलं नाव मोठं करेल म्हणून, करेल नक्कीच पण त्या अडखडलेल्या मनाचं काय ? जर कधी अपयश मिळालं तर .... चुकीचा विचार केला तर......
साधं उत्तर आहे, आपल्या पाल्याला एक मित्र आणि मैत्रीण म्हणून जवळ घ्या, एक जीवन कस जगायचं, जगातील बाहेरचे लोक वाईट दृष्टिकोनाचे असू शकतात., या काही गोष्टींबाबदल सांगा. आणि एक खरं जीवन जगणारा व्यक्ती बनवा, हेच खूप मोलाचं आहे. लहानपणी तुम्ही हि शिकवण दिली तर तुमच्या म्हातारपणात तुम्हाला एकटं नाही सोडणार. फक्त गरज पुरविणे इतकच नसते हे प्रेम, शिक्षण घेतलं मोठ्या नोकरीवर असून आईवडिलांसाठी वेळ नसणाऱ्या लोंकाना किंमत नसते.
जग खूप मोठं आहे , जगायचं असेल तर वाघासारखा जगायला शिकवा आणि मरण हे किड्यामुंगीसारखे नको आहे. रस्त्यावर जाताना पण पाटी असते त्यावर लिहलं असते,'नजर हाती दुर्घटना घटी'. संगोपन हा प्रत्येकाच्या जीवनाचा खूप मोठा भाग आहे. म्हणतात ना 'जे पेराल तेच उगवेल' म्हणजेच तुम्ही जशी शिकवण द्याल वळण द्याल तशीच वागणूक ही तुमच्या पाल्यामध्ये असेल.
विचार करा आणि पटलं तर नक्कीच जीवनात या विचाराचे पालन करा.......
No comments:
Post a Comment