एक बोलका निसर्ग
मानव आणि निसर्गाचं नातं नेमकं काय असावं, याचा विचार करताना ‘झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया’ या कवी ग्रेस यांच्या ओळी स्मरल्यावाचून राहत नाहीत. मानवाचं अस्तित्व खऱ्या अर्थानं निसर्गाचं देणं आहे. आपण व्यक्त होतो, चालतो-बोलतो, हसतो-रडतो. निसर्गही हे सगळं करतच असतो. फक्त त्याचं मन वाचता यायला हवं. निसर्गपुत्र असण्यातला अभिमान बाळगला, तर हे मैत्र आणखी दृढ होईल.
आता बोलका निसर्ग म्हणजे म्हणजे नेमक काय ते एक एक उदाहरणात बघू,
- नैराश्य विसरून आजचा सूर्योदय बघायला मिळत असेल तर यातच स्वतःला नशीबवान समजा. आजचा एक नवीन दिवस जीवन जगण्याची एक नवीन संधी देत आहे, त्या संधीचे सोने करायची हीच वेळ आहे. दररोज सूर्योदय होतो आणि वातावरण प्रसन्न करून देतो, दररोज प्रकाशाचे किरण पसरवत असला तरी तेज कमी होत नाही.
- रोपटं लहान असते तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते.त्या रोपट्याला पाणी द्या खत द्या माती टाका,तेव्हाच ते रोपटं परिपूर्ण उगवते आणि रोपट्याचा अवयवयाची वाढ होते. मूळ, पान, फुल, फळ इत्यादींची भरभराट होते. सर्वाना मोहून टाकणारा अवयव म्हणजे फुल, त्या फुलाची निर्मिती व्हायला विशिष्ट काळ लागतो.तसेच जीवन जगताना आपल्या जीवनाची मूळ मजबूत असावी लागतात, तेव्हाच या जगात आपले विचार पोहचवू शकणार.
- निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही मन वेधून घेणारी असते. सकाळी निळा रंग खुलून उठणारं, सायंकाळी पिवळा, केशरी,लाल या रंगांची छटा दाखवणारं, आणि रात्री काळोखामध्ये तेजस्वी आणि शांत चंद्र आणि चांदण्याचा प्रकाश देणारं असं आकाश प्रत्येक दिवसाला वेगळ्या वेगळ्या रंग छटा आपल्या वातावरणात पसरवून मन मोहून टाकते. एका रचनेत कापसारखे दिसणारे ढग बघताच मन खुलून उठेल ही अशी निसर्गाची किमया.
- एखाद्या ध्येयापर्यंत पोहचताना सर्व दार बंद होत असताना दिसले की नक्कीच त्या कठीण परिस्थिती नंतर प्रकाशाचा तेज येईल, वेळ लागेल पण नक्कीच तो तेज प्रकाश जीवन बदलवेल. हीच शिकवण सूर्य देतो. नियमितपणे सकाळी सूर्योदय होऊन आपले किरण पृथ्वीवर प्रकाशित करून संपूर्ण पृथ्वीला जीवनदान देतो पण सायंकाळ झाली की सूर्यास्त होतो. अतिशय आकर्षित रंग आकाशात विलीन करून मावळतो, ते बघून मनाला ताजेतवाने करून टाकते.
No comments:
Post a Comment