Wednesday, March 02, 2022

संयम

                  माझ्यासोबतच अस का होते मला का अपयश मिळते कधी मी यशाची पायरी गाठेल ?  काय सारख एक गेल की एक टेंशन येऊनच असते ?

   असे प्रश्न मनात येण स्वाभाविकच आहे. मानवी जीवनात सुखदुःखताण-तणावरडणसकारात्मकतानकारात्मकता  ही सर्व असण सामान्य आहे. वाईट काळ हा चांगल्या काळात कस वागायच ते शिकवून जाते. जीवन जगताना म्हणजे फक्त सकाळी उठणेकाम करणेजेवण करणेपरत झोपणे.......नाहीफक्त याच गोष्टी नाही तर जीवन जगताना म्हणजे आपले विचारआपली दुसऱ्या व्यक्तीबद्दलची वागणूककठीण प्रसंगी सावरायची क्षमतानिर्णय घेण्याची क्षमता इ. त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे संयम. 

             बहुतेक व्यक्तीच मन हे चंचल असते आणि त्याच चंचलपणाच्या विरुद्ध असतो संयमआपण ऐकलं आहेसंयम ही यशाची किल्ली आहेआणि कुलूप म्हणजे आपल्या समोरील संधी. प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट वेळ असतो आणि तो वेळ आली की कार्य पूर्ण होते. पण तिथपर्यंत पोहचेपर्यंत अनेक अडथळे पार करावे लागते. त्यात खरी परीक्षा असतेत्या परिस्थितीत आपलं वर्तन कस असतेहे महत्त्वाचे ठरते. 

                एखाद्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी संयम आवश्यक आहेच पण सोबतीला मेहनतीची जोड लागतेच. संयम हा त्या संघर्षाचा एक घटक आहे. आपल्या मेहनतीच्या बळावर आणि देवाच्या आशीर्वादाने जोपर्यंत आपण ध्येयापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहणे योग्य आहे. 

              खचून न जाता संयम ठेवून मेहनत करून यशाच शिखर गाठण्याची प्रत्येक व्यक्तिमध्ये शक्ति असते. फक्त गरज असते ती शक्ति ओळखण्याची ..........

स्वप्न अनंत असावी पण ती पूर्ण करण्याची ताकत पण असावी.

संयम बाळगा......नक्कीच एक नवीन दिवस आयुष्यात यशाची भरभराट आणेल.....

No comments:

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...