जीवनात लहान लहान गोष्टीच आनंद अनुभवता येणारी व्यक्ती ही नक्कीच समाधान वृत्तीची असते. दररोज येणारे नवीन क्षण, नवीन अनुभव या सर्वाना आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग बनवून त्यांचा स्वीकार करून आनंदात जगणं सोप नाही पण ते अवघड सुद्धा नाही.
आजकाल जगाच्या वाटेने चालणारी व्यक्ती स्वतःच अस्तित्व विसरत आहे. या गोष्टीच उदाहरण बघू,
रस्त्यावर अपंग (ज्या व्यक्तीला पाय नाहीत, किवा चालायला जमत नाही) व्यक्ती ही आपली चाके असलेली खुर्ची हाताच्या मदतीने चालवून गती निर्माण करतो. पण तेच जेव्हा त्याला पायांनी चालणारी व्यक्ति दिसते, तेव्हा त्याला पण वाटते की आपण पण स्वतःच्या पायावर चालू शकलो असतो तर किती बर झाल असतं. आता जो पाऊलवाटेने चालणारा व्यक्ती सायकल चालवण्याऱ्या व्यक्तीला बघतो तर त्याला पण विचार येतो, आपल्याकडे पण सायकल असती तर खूप बर झाल असतं. समोर सायकल चालवणारा व्यक्तीला गाडी चालवणाऱ्या व्यक्तीकडे बघून वाटते माझ्याकडे पण गाडी असती किती छान असतं .............
असे हे विचारांचे चक्र सुरूच असते. नक्कीच प्रत्येक व्यक्तीने समोरील स्वप्न बघावे पण ते स्वप्न सकारात्मक दिशेने न्यावे. काही नकारात्मक विचार करतात. माझ्या नशिबात हेच आहे का ?.. अस तस.. तुमच्या जवळ जे काही आहे त्याचा आदर केला की नक्कीच समोरच यश देवच आपल्या पदरी देतो. आणि म्हणतात ना तुमच्याकडे जे आहे ते कदाचित कोणाच स्वप्न असेल म्हणून देवावर विश्वास ठेवून आपल्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते.
तुमच्याकडे काय नाही याच्या विचारात जीवन घालवण्यापेक्षा आज तुमच्याकडे काय काय आहे, हे विचार करून एक यादी बनवा मग नक्कीच कळेल, आपण किती भाग्यवान आहो की देवाने आजपर्यंत आपल्याला किती काही दिलेल आहे.
जगताना आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे कमी आहे त्याच्याकडे बघून जगा, तेव्हा वाटेल की खरच आपल्याकडे किती काही आहे. तेच आपण ज्यांच्याकडे जास्त साधन संपत्ति आहे, अश्याकडे बघून जीवन जगणार तर एक वर्तमान गोष्टीतील समाधान हरवून बसाल.
No comments:
Post a Comment