लिखाण हे एक संवादाचे साधन आहे. प्रत्येकाला आपलं जीवन कस जगायचं याच स्वातंत्र्य आहे. आपला देश जसा आधुनिक प्रगती करत आहे तसंच मानवाचे विचार पण आधुनिक गोष्टीकडे वळत आहे, या जगासोबत चालता चालता मूळ तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. आजच्या काळाची गरज बघून मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे. एकापण व्यक्तीला या तत्त्वाचे महत्त्व पटले तरी मला आनंद आहे.
Tuesday, December 02, 2025
चांदणी
Sunday, October 26, 2025
आली दिवाळी 🪔
Saturday, September 27, 2025
असा असावा साथीदार 💞
Sunday, March 02, 2025
अश्रू
Sunday, November 03, 2024
मैत्रीण कशी असावी....
Sunday, October 13, 2024
समुद्र 🌊
Saturday, May 11, 2024
का रे दुरावा
माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. माणूस बोलू शकतो एकु शकतो, बघू शकतो आणि विचार सुद्धा करू शकतो सोबत भावना व्यक्त करू शकतो हे सर्व तर प्राणी पण करू शकतात पण माणूस हा कोणत्याही क्षेत्रात बुध्दीने अग्रेसर असतो.
व्यक्तीच्या वागणुकीवर समाजाचा, सभोवतील वातावरणाचा खूप प्रमाणात प्रभाव होत असतो. आपण ज्या भविष्याचा विचार करतो तो खरा होतो, नाही होत यावर प्रत्येकाचे वेगळे मत असू शकते पण जास्त प्रमाणात काहीतरी वेगळी परिस्थिती असते. आपण जसा विचार करतो तस काही घडत नसते, आपल्या मनासारखं होत नसल्याने आपल्याला त्या गोष्टीचं दुःख सुद्धा वाटते, डोळ्यात अश्रू दाटतात. पण त्या परिस्थितीला सामना करायला देवाने आपल्या मध्ये शक्ती दिली असते याच भान नसते. आपल्यासोबत २ गोष्टी प्रेमाने बोलले तरी आपल्याला छान वाटते.
भविष्यात आपलं जीवन अस असेल तस असेल असा विचार नक्कीच सर्वांनी केलाच असेल पण खरचं ते सर्व खर होत आहे का ?
आपण भविष्याचा अंदाज लावू शकतो पण वास्तव नाही.
मनात गुंफलेल्या तारा सोडवाव्या कश्या
नात्यातला रुसवा, फुगवा सोडवावा कसा
काचेला तडा गेला की वापरता येत नाही
नात्याला तडा गेला की नात भरून निघत नाही
स्वतःच्या आधी ठेवलेली नाती परकी होतात
काळजी आणि प्रेमाची जागा क्लेश, मत्सर घेतात
नेहमीच्या भेटीची जागा अकस्मात होणारी भेट घेते
घट्ट नातं वाटणाऱ्या नात्यात पोकळ निर्माण होते
Sunday, January 07, 2024
सोबती 🥰
Monday, October 02, 2023
आठवण येते तुझी
Sunday, November 27, 2022
माझे मन
फुले पाहून माझे मन आनंदाने बहरले
गुलाबी रंगात रंगून पुष्प वाऱ्याने डुले
पावसाचे थेंब जणू वाटे फूल मोत्याने सजलेले
फुले पाहून माझे मन आनंदाने बहरले
Wednesday, March 02, 2022
भारत भूमी
झेंडा आमुचा या भारत भूमीचा
शान बाण आणि मान आमुचा
फडकत राहील वरी महान
गर्व आम्हास त्या तिरंगाचा
झुकून करतो आम्ही प्रणाम याला
करतो आम्ही प्रणाम...
लढले गांधी, टिळक, नेहरू,
लढले आमचे वीर जवान
सोबत आधार देत लढली आपली जनता
या भारत मायेला अर्पण केले त्यानी आपले प्राण
करतो आम्ही प्रणाम यांना करतो आम्ही प्रणाम .....
फुलपाखरू आधारित मानवी जीवन
अळीच्या जन्मात नकोशी होते मी
फुलपाखराच्या रूपात सजून होते मी
फुलांचं आणि माझं नातं हे वेगळं
रंगबिरंगी छटा माझ्या पंखावर उठलं
हातात ना येई मी हवा मला सुगंधी द्रव्य
सर्व चाहते माझ्यावर करतात काव्य
संदेश देऊ इच्छिते सर्वाना सौंदर्यावर जाऊ नका
बाह्यरंग सुंदर असेल तरी माझ्या शरीराला आहे खूप नाजूकपणा..
ताकत बघा मनातली माझी हाती कधी येणार नाही
एवढ्या मोठ्या जगात मला माझा जीव गमवायचा नाही
का तर........?
मला लढायचं आहे सामोरे जायचं आहे
सर्वाना घेऊन मला चालायचं आहे
फुलपाखराचा जन्म छोट्या अंड्यापासून होतो. त्यातून जीव बाहेर येऊन अळी बनून आपली कात सोडते आणि त्याच रूपांतर एका कोशात होते , आणि त्यातच एक मनमोहून टाकणार फुलपाखरू जन्माला येत. साधं छोटासा फुलपाखरू एक निसर्गाचं देणं, त्यातून पण शिकवण मिळते, छोटा असो कि मोठं प्रत्येक जीवांमध्ये एक शिकवण लपली असते , फक्त ती शोधून काढणे गरजेचं असते.
आज ते पाखरू आहे सर्व मानवाला मोहून टाकते आकर्षित करते पण त्या आधीच त्या जीवाचं रूप कोणालाही मोहक वाटत नाही. अळी ही सर्वाना नकोशी वाटते मात्र जेव्हा तीच रूपांतर फुलपाखराच्या होते तेव्हा मात्र सर्वाना ते हवं असते, माझ्या हातावर बसावं, मी त्याला पकडावं असं प्रत्येकाला वाटते. याचप्रकारे हे फुलपाखरू मानवाला एक शिकवण देऊन जाते. बाह्यरंगपेक्षा अंतरंग महत्त्वाचे हे सर्वाना माहित असेलही तरीही चेहऱ्याच्या सौंदर्याला जग मान्यता देते. आर्थिक , चैनीच्या वस्तू, सौंदर्य, श्रीमंती, आनंद या सर्वच एक आकर्षण वाटे, सर्वाना सुख हवं असते पण दुःख नको असते, सुखात सर्वेच असतात पण दुखात कोण असते हे महत्त्वाचे आहे. तेव्हाच आपले कोण हे माहिती पडते.
हसत खेळत फुलपाखराप्रमाणे बागडा, जीव कोणत्यापण परिस्थितीमध्ये असेल तरी त्याचा स्वीकार करा. अळीला वाटले असेल आपलं आयुष्य संपलं परंतु तिचा एक नवा जन्म एक नवं रूप जगात येणार आहे हे माहिती नसते पण तो निसर्गाचा नियम आणि धन्य त्या देवाची किमया ज्यांनी या सृष्टीला घडवलं एक आकर्षित, मनमोहक, विविध जीवांची निर्मिती केली आणि त्या प्रत्येक जिवाकडून शिकवण घेता येईल.
चांदणी
निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...
-
काल ९ ऑक्टोबर रोजी श्री रतन नवल टाटा सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी साधारण मध्यरात्री प्रसारित माध्यमातुन कळाली. जणूकाह...
-
आनंदाने जीवन जगण्याची इच्छा बाळगत आईबाबांनी एका मुलीला जन्म दिला. फक्त आईबाबाच नाही तर पूर्ण परिवार आनंदाने न्हाहून निघाले....
