Showing posts with label पुढाकार. Show all posts
Showing posts with label पुढाकार. Show all posts

Saturday, September 23, 2023

एक वेगळा उपक्रम

                      रूमची स्वच्छता 🧹मोहीम राबवून एक मोकळा श्वास घेतला आणि समोरच्या टेबल वर ठेवलेल्या वर्तमानपत्रावर नजर गेली. इतकी नजर जाण्यासारख काय होत त्यात  तर चक्क गणपती बाप्पाचं चित्र होत. लगेच उठून कात्रीने त्या गणपतीच्या चित्राला पेपर पासून वेगळं केलं. इतकं गोड चित्र समोर जाऊन कचऱ्यात गेल असतं, या विचाराने मनात खंत वाटू लागली.

                     आपल्याकडे घरोघरी सकाळी वर्तमानपत्र 📰वाचण्याची सवय असते. ठळक बातम्या, चालू घडामोडी माहिती करण्याच उत्तम साधन म्हणजे वर्तमानपत्र. पण तेच वर्तमानपत्र वाचून झाल्यावर अनेक मार्गी लागतो किंवा ते रद्दीत विकले जातात. म्हणजेच शेवटी वर्तमानपत्राचा एक कचराच होणार असतो पण मग आपल्या देवी देवतांचे चित्र त्या वर्तमानपत्रात समाविष्ट करणे किती चुकीचे आहे. फक्त वर्तमानपत्र नाही तर दिनदर्शिका, लग्नाच्या पत्रिका, फटाके, बॅनर, कपड्यावर चित्र किंवा पिशवीवर देवी देवतांचे चित्र असणे फार चुकीचे आहे. आपल्या धर्मात देवी देवतांचे महत्त्व सर्वांना माहीत आहे. आपल्या धर्मात अनेक देवी देवता आहेत आणि जर प्रत्येक सणाला प्रत्येक देवीदेवता यांचे चित्र साध्या साध्या गोष्टीमद्धे समाविष्ट करण्यात येत असतील तर हा देवाचा अपमान आहे. 

                        प्रत्येक व्यक्तीने थोडा जीवनात वेगळा मार्ग निवडला तरी ते आनंदाचे असेल. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, वर्तमानपत्र वापरताना एकदा नक्की बघा की त्यात आपले देवी देवतांचे छायाचित्र तर नाही ना असेलतर लगेच तो भाग काढून वेगळा ठेवावा, लग्नाच्या पत्रिकेत आपण देवाचे नाव लिहितोच आणि देव सर्व भक्तांना समजतो आणि तो नेहमी आपल्याला आशिर्वाद देतच असतो त्यामुळे देवाच्या चित्र ऐवजी वेगळी डिझाईन प्रिंट करा कारण वर्षभर जमा होण्याऱ्या पत्रिका आपण रद्दीतच देत असतो म्हणजे हा एक देवाचा अपमान झाला. 

                      माझ्या मते देवाचे स्थान हे फक्त  मंदिर🛕 आणि आपलं हृदय💗 आहे. आता विचार कराल, मंदिराबाहेर दुकान असतात त्यात तर किती देवाच्या मूर्ती, फोटो असतात. ते तर असणारच ना, जर भक्ताला देवाला आपल्या घरच्या मंदिरात स्थापना करायची असेल तर ती मूर्ती विकत घ्यावी लागेल. व्यवसायधारकानी जर या गोष्टीला महत्त्व दिले आणि देवांचे छायाचित्र छापणे बंद केले तर हे अति उत्तम असेल. 

आज मी हा प्रसंग अनुभवला आणि माझी चूक मला कळाली. ही चूक तुमच्या हातून होवू नये यासाठी मी हा लेख  लिहिते 🖊आहे.  आयुष्यात लहान लहान बदल केले तरी जीवन जगण्याचा मार्ग बदलतो. 😊




गणपतीचे मनमोहक चित्र 

Sunday, April 02, 2023

महत्त्वाकांक्षा

                      भूतकाळातील गोष्टी मनात पकडून सामोरे जाण्यात अर्थ नाही, पण भूतकाळातून आपण काय शिकवण घेतली हे महत्त्वाचे ठरते. एखाद्या परीक्षेत मनापासून अभ्यास केला असता  तर आपण त्यात उत्तीर्ण झालो असतो अशी खंत मनात ठेवून आपला निकाल बदलत नाही पण पुढे असणाऱ्या परीक्षेची या क्षणापासून अभ्यासाला बसणे ही गोष्ट आपल्याला पूर्वी असणाऱ्या परीक्षेमधून शिकायला मिळाल. हे एक उदाहरण झाल पण जीवनात अनेक प्रसंग येतात, कधी अपयश येते क मनासारख होत नाही किवा अचानकपणे काही प्रसंग अनुभवतो, या सर्वांना हिमतीने, बुद्धीने हाताळता यायला हवं. एखाद्या गोष्टीची बोंब करत बसण्यापेक्षा योग्य ते कर्म करून यश संपादन करण्याची महत्त्वाकांक्षा असणे गरजेचे आहे.


#BeStrong #LiveInTheMoment 

Thursday, March 02, 2023

मनातलं काही

                      तुम्हाला माहीत आहे का आपल्या देशाची एक अनोखी ओळख आहे, आपला  देश म्हणजे भारत, पूर्ण परिसर दणाणून टाकणारं  घोषवाक्य भारत माता की जय असे आपण म्हणतो. लहानपणापासूनच प्रत्येकाला शिकविले जाते की भारत हा फक्त देश नसून आपली माता सुद्धा आहे,  आणि आपला महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र किवा साम्राज्य. 

                      आपला देश /राज्य घडवण्यासाठी अनेक थोरपुरुषांना वीरमरण आले, अनेक क्रांतिकारी सैनिकांना फाशीची शिक्षा देण्यात आली, स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपलं जीवनदान दिल. आपला इतिहास खूप मोठा आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा  विचार न करता समाजाचा विचार केला, देशाला गुलामगिरीतून मुक्त कसे करावे याचा विचार करून अमलात पण आणला. पण दुःख या गोष्टीच वाटते आज समाजातील काही पापी लोकांना या गोष्टीची अजिबात जाणीव नाही. या जमिनीवर अनेक सजीव आहेत पण त्यातला मानवी रूपात जन्माला येण नशीब असते. पण हे सुद्धा लोकाना कळत नाही आहे.  प्रत्येकाचा जन्म हा एक स्त्रीच्या उदरातून होतो आणि त्याच स्त्रीला वाईट बोलणे, वाईट नजर टाकणे हे सर्व आपल्या महाराष्ट्रात घडते आहे, या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीत घडते आहे, नेहमी स्त्रीला मातेसमान मानणारे आपल्या महाराजांच्या स्वराज्यात अस घडताना चीड येते आणि वाईट सुद्धा वाटते. 

                       आपण आपल काम करायच, उगाच गोष्टीत आपला वेळ घालवायचा नाही अशी पण मानसिकता असणारे लोक असतात. आपल्यावर असते आपल्याला कोणत्या मार्गाने जायच. परंतु वाईट गोष्टीला विरोध करणे हे ही महत्त्वाचे, काही गोष्टी फक्त दुर्लक्षित करून जमत नाही त्यावर उपाय पण शोधणे महत्त्वाचे आहे. चांगल्या  गोष्टीची सवय लावायला वेळ लागतो, तसेच चांगल्या गोष्टीपेक्षा माणूस वाईट गोष्टीना लवकर आहारी जातो. 

                     एकीकडे कष्ट करून यशस्वी होणारी  व्यक्ति आणि एक वाईट गोष्टीत चर्चेत असणारी  व्यक्ति, यापैकी जास्त आकर्षण  वाईट गोष्टीला मिळते हे तितकच सत्य आहे. भान राखा आपण काय करतोय आणि वाईट गोष्टीला समर्थन चुकूनही करू नका.

Sunday, August 14, 2022

हर घर तिरंगा



                                      भारतात  स्वातंत्र्याचे 75 वर्षे अगदी उत्साहाने आनंदाने साजरा केला जात आहे. नवीन नवीन उपक्रम राबवले जात आहेत. आपल्या देशाची शान आपला ध्वज हा शाळा कार्यालय, इतक्यात मर्यादित न राहत आज भारतातील  प्रत्येक घराघरात पोहचला आहे. त्या ध्वजाकडे बघून पूर्ण भारताच्या स्वातंत्र्यासाठी  लढा देणारे सर्व वीरांच्या महनतीचे फळ दिसते. पिंगाली वेंकय्या यांनी तिरंग्याची रचना केली. केशरी , पांढरा, हिरवा आणि निळे अशोक चक्र असा आपला ध्वज प्रत्येक भारतीयांच्या मनात रुजलेला आहे. प्रत्येक नागरिकांच देशप्रेम हे अफाट आहे. भारत हा विभिन्न संस्कृतीचा देश आहे. विविध धर्म, प्रथा रूढीने हा देश जोडला गेला आहे. नैसर्गिक प्रकृतीने नटलेला भारत हा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सुद्धा प्रगतिशील आहे. 


स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

जय हिंद जय भारत 




हर घर तिरंगा 

Saturday, June 25, 2022

नारी सशक्तीकरण

                                                                                                                                                                                                                                                                                                                        आपला समाज हा पुरूषप्रधान समजल्या जातो. काही वर्ष आधी अस ठरलेल होत की पुरुष घर चालवण्यासाठी नोकरी किंवा धंदा करतील आणि स्त्रीयांनी घर काम सांभाळायच. इच्छा असेल तरी मुलीना शिक्षणापासून वंचित ठेवले जायचे. नोकरी करण्यास विरोध केला जायचा. हे आताच्या परिस्थितीत सुद्धा घडत आहे. तरी या सर्वाना सामना करून महिलाशक्ती आज प्रत्येक क्षेत्रात उत्तमरीत्या कार्यरत आहे.

                  ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले या भारताच्या सुपुत्रिमूळे आज प्रत्येक जन्म घेणाऱ्या मुलीला शिक्षणाचा हक्क मिळाला आहे. जीवन जगण्याचा एक मूलभूत पाया म्हणजे शिक्षण आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपली जबाबदारी पार पाडत आहे. काही महिला देशाच नाव उज्ज्वल करत आहे. हे शिक्षण मुलीना मिळवून देण्यासाठी अनेक समाजसुधारक यांनी अपार कष्ट केले. आणि त्याचच फळ म्हणजे महिलांची प्रगती.

                     आजच्या काळात प्रत्येक मुलीला, स्त्रीला स्वतःच्या पायावर उभ राहण्याची गरज आहे. कधी अडचण आली तरी स्वतः त्या गोष्टीचा सामना करण्याची ताकत प्रत्येक स्त्री मध्ये हवी. आज अनेक घटना घडतात त्यासाठी प्रत्येक महिलेने सावधान राहणे गरजेचे आहे. प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी होणे गरजेचे आहे. स्वावलंबी म्हणजे फक्त पैसा कमावणे नाही तर समाजात घडत असणाऱ्या नवीन गोष्टी माहीत करून शिकून घेणे, पैसचे व्यवहार,काही नियम व कायदा, असे अनेक गोष्टी प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे.

                       महिलांची जबाबदारी आहे मूल आणि चूल सांभाळण्याची परंतु त्यासोबतच जगाच्या सोबत चालण्यासाठी जगात काय घडते आहे हे माहीत असण महत्त्वाच आहे. अस म्हणतात घरातली स्त्री शिकली की ती पूर्ण घराला शिकवते तसच काळानुसार महत्त्वपूर्ण गोष्टी माहीत असण काळाची गरज आहे.

मुलगी शिकली प्रगती झाली


 

Wednesday, March 02, 2022

रक्तदान - श्रेष्ठ दान

                           परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री याच्या जयंतीनिमित्त्य मला पहिल्यांदा रक्तदान करण्याचा अनुभव आला. तो अनुभव मी सर्वाना सांगू इच्छितेजेणेकरून तुम्ही सुद्धा या सेवेत आपलं योगदान द्याल.

                सर्वात प्रथम रक्तदान करण्यासाठी अनेकांना मनात भीती शंका असतातत्या प्रथम दूर करण्याची गरज आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असं म्हटल्या जाते. आपण दान केलेल्या रक्तामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव सुद्धा वाचू शकतो. रक्तदाताचं वजन आणि हिमोग्लोबीन हे प्रमाणात असावं आणि शरीर निरोगी असावं लागते. आपल्या शरीरातील रक्त गेलं हे मनात ठेवण्यापेक्षा हेच एका जिवाच्या कामी येईल असं मनात ठेवून पुढाकार घ्याला हवा. शरीर सुदृढ असेल तर अशक्तपणा सुद्धा जाणवत नाही. पण विश्रांतीची गरज असते. काही तासात नैसर्गिक रक्त शरीरात तयार होते. 

                   मला सुरुवातीला मनात भीती होती कस काय होईल.... पण सर्व सुरळीतपणे प्रक्रिया पार पडली. पण एक गोष्ट होती ती म्हणजे मी गेली तेव्हा मुली नव्हत्या. पुरुषांचं प्रमाण हे जास्त होत. त्यामुळे मनात आलं कि आपली स्त्री शक्तींनी सुद्धा मनात भीती न बाळगता आनंदाने या सेवेचा आनंद घ्यावा.

                 आजच्या लिखाणाचा हेच उद्देश आहे कि हे माझे शब्द वाचताना तुम्हाला पण  या सेवेत येण्याचा मार्ग दिसावा  आणि जे आधीपासून या सेवेत आहेत त्यांचं कौतुक आहे.

Sunday, February 06, 2022

स्वातंत्र्य

    स्वातंत्र्य हा शब्द कानी आला की लगेच 15 ऑगस्ट  1947  रोजी आपला भारत स्वतंत्र झालाहेच वाक्य गुणगुणत असते. आपल्याला त्याच दिवशी स्वातंत्र्य मिळालं आणि गर्वानी आपल्या देशाचा मान तिरंगा फडकवतो. पण नेमकं स्वातंत्र्य म्हणजे कायया प्रश्नाची अनेक उत्तर येतीलस्वातंत्र्य म्हणजे आपण आपल्या मनासारखं वागू शकू आपल्याला हवं ते करू शकूजिथे जायचं आहे तिथे जाऊ शकू पण खरं स्वातंत्र्य म्हणजे ज्या थोर व्यक्तींनी आज आपला बलाढ्य भारत बनवण्यास सहकार्य केलेत्रास सहन करून पण हार नाही मानली त्यांना मनात प्रेरणास्थान ठेवून आजच्या भारतात एक जबाबदार नागरिकएक चांगला व्यक्ती बनून राहणे हे प्रत्येक व्यक्तीच आपल्या जन्मभूमीसाठीच कर्तव्य आहे. थोर व्यक्ती काही मूळ तत्त्वावर जीवन जगतात. थोर व्यक्ती वेळ मिळत नाही अशी तक्रार करत नाहीजीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत जिद्द चिकाटी आणि आवड या तत्त्वाची गरज असते.

    त्यामुळे स्वातंत्र्य म्हणजे एक विश्वासएक इच्छाएक आवड माणुसकी आणि एक कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी आहे. सर्व आपल्याच मनासारखं घडावं हे गृहीत धरणे बरोबर नाही पण त्यात सर्वांना घेऊन चालण्याला अर्थ आहेएक कार्य पण खूप काही शिकवून देते त्यामुळे याचा खरा अर्थ समजून जीवन जगण्यातच आनंद आहे.

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...