प्रेमानंदजी महाराज म्हणतात काय इतका स्वतःला तणाव करून घ्यायचा, ईश्वराचे नामस्मरण करा सर्व चांगलं होईल. हे अगदी खर आहे. पण कधी कधी असहनीय अश्या घटना आपल्या जीवनात घडतात आणि त्या गोष्टीचा ताण पूर्णपणे विसरणे ही साधी गोष्ट नाही. आतापर्यंत जे काही झालंय त्यामागे कधी कधी चांगला हेतू असतो.
आज माणसाकडे सर्व गोष्टी असूनही माणूस ताण तणाव मध्ये दिसतो. नोकरी असणारा किंवा नोकरी नसणारा, अमाप संपत्ती असणारा किंवा कमी पैसे असणारा इ. लोकांमध्ये ही लक्षणे दिसून येतात. समोरील व्यक्ती हसत बोलत असेल तरीही मनात किती काही दाटून भरले असेल याचा अंदाज लावणे कठिणच.....
आयुष्यात आनंद साजरा करणे हे खूप महत्त्वाचे ठरते. आनंदाचा क्षण असला की मनातून दुःख आपोआप चालले जाते. आणि हसण्याने मन आनंदाने प्रफुल्ल होते. आपण आशेच्या किरणांनी भरलेल्या दिवसाची वाट बघत बसतो, पण तो दिवस लवकर दिसावा यासाठी आपण किती मेहनत करतो याला महत्त्व आहे. मी मेहनत केली म्हणूनच आज हे यश मला मिळाले असे ठामपणे आपण बोलायला हवे....