Wednesday, March 02, 2022

संयम

                  माझ्यासोबतच अस का होते मला का अपयश मिळते कधी मी यशाची पायरी गाठेल ?  काय सारख एक गेल की एक टेंशन येऊनच असते ?

   असे प्रश्न मनात येण स्वाभाविकच आहे. मानवी जीवनात सुखदुःखताण-तणावरडणसकारात्मकतानकारात्मकता  ही सर्व असण सामान्य आहे. वाईट काळ हा चांगल्या काळात कस वागायच ते शिकवून जाते. जीवन जगताना म्हणजे फक्त सकाळी उठणेकाम करणेजेवण करणेपरत झोपणे.......नाहीफक्त याच गोष्टी नाही तर जीवन जगताना म्हणजे आपले विचारआपली दुसऱ्या व्यक्तीबद्दलची वागणूककठीण प्रसंगी सावरायची क्षमतानिर्णय घेण्याची क्षमता इ. त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे संयम. 

             बहुतेक व्यक्तीच मन हे चंचल असते आणि त्याच चंचलपणाच्या विरुद्ध असतो संयमआपण ऐकलं आहेसंयम ही यशाची किल्ली आहेआणि कुलूप म्हणजे आपल्या समोरील संधी. प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट वेळ असतो आणि तो वेळ आली की कार्य पूर्ण होते. पण तिथपर्यंत पोहचेपर्यंत अनेक अडथळे पार करावे लागते. त्यात खरी परीक्षा असतेत्या परिस्थितीत आपलं वर्तन कस असतेहे महत्त्वाचे ठरते. 

                एखाद्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी संयम आवश्यक आहेच पण सोबतीला मेहनतीची जोड लागतेच. संयम हा त्या संघर्षाचा एक घटक आहे. आपल्या मेहनतीच्या बळावर आणि देवाच्या आशीर्वादाने जोपर्यंत आपण ध्येयापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहणे योग्य आहे. 

              खचून न जाता संयम ठेवून मेहनत करून यशाच शिखर गाठण्याची प्रत्येक व्यक्तिमध्ये शक्ति असते. फक्त गरज असते ती शक्ति ओळखण्याची ..........

स्वप्न अनंत असावी पण ती पूर्ण करण्याची ताकत पण असावी.

संयम बाळगा......नक्कीच एक नवीन दिवस आयुष्यात यशाची भरभराट आणेल.....

स्वप्न जीवनाचे

                  जीवनात लहान लहान गोष्टीच आनंद अनुभवता येणारी व्यक्ती ही नक्कीच समाधान वृत्तीची असते. दररोज येणारे नवीन क्षणनवीन अनुभव या सर्वाना आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग बनवून त्यांचा स्वीकार करून आनंदात जगणं  सोप नाही पण ते अवघड सुद्धा नाही. 

आजकाल जगाच्या वाटेने चालणारी व्यक्ती स्वतःच अस्तित्व विसरत आहे. या गोष्टीच उदाहरण बघू

               रस्त्यावर अपंग (ज्या व्यक्तीला पाय नाहीतकिवा चालायला जमत नाही) व्यक्ती ही आपली चाके असलेली खुर्ची हाताच्या मदतीने चालवून गती निर्माण करतो. पण तेच जेव्हा त्याला पायांनी चालणारी व्यक्ति दिसतेतेव्हा त्याला पण वाटते की आपण पण स्वतःच्या पायावर चालू शकलो असतो तर किती बर झाल असतं. आता जो पाऊलवाटेने चालणारा व्यक्ती सायकल चालवण्याऱ्या व्यक्तीला बघतो तर त्याला पण विचार येतोआपल्याकडे पण सायकल असती तर खूप बर झाल असतं. समोर सायकल चालवणारा व्यक्तीला  गाडी चालवणाऱ्या  व्यक्तीकडे बघून वाटते माझ्याकडे पण गाडी असती किती छान असतं .............

         असे हे विचारांचे चक्र सुरूच असते. नक्कीच प्रत्येक व्यक्तीने समोरील स्वप्न बघावे पण ते स्वप्न सकारात्मक दिशेने न्यावे. काही नकारात्मक विचार करतात. माझ्या नशिबात हेच आहे का ?.. अस तस.. तुमच्या जवळ जे काही आहे त्याचा आदर केला की नक्कीच समोरच यश देवच आपल्या पदरी देतो.  आणि म्हणतात ना तुमच्याकडे जे आहे ते कदाचित कोणाच स्वप्न असेल म्हणून देवावर विश्वास ठेवून आपल्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. 

                   तुमच्याकडे काय नाही याच्या विचारात जीवन घालवण्यापेक्षा आज तुमच्याकडे काय काय आहेहे विचार करून एक यादी बनवा मग नक्कीच कळेलआपण किती भाग्यवान आहो की देवाने आजपर्यंत आपल्याला किती काही दिलेल आहे. 

             जगताना आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे कमी आहे त्याच्याकडे बघून जगातेव्हा वाटेल की खरच आपल्याकडे किती काही आहे. तेच आपण ज्यांच्याकडे जास्त साधन संपत्ति आहेअश्याकडे बघून जीवन जगणार तर एक वर्तमान गोष्टीतील समाधान हरवून बसाल.




 

 

मनाचा स्पर्श

 


  • आयुष्य खूप सुंदर आहेजेव्हा स्वतः जगता जगता दुसऱ्यासाठी जगतो.

 

  • न पाहता मनात रुजणारी गोष्ट म्हणजे खरी भावना.

 

  • निस्वार्थपणे कार्य करणे हीच खरी सेवा.

 

  • काही क्षणांना आशीर्वाद द्याल देव सुद्धा प्रेमाचा वर्षाव करीत असतो.

 

  • खरा आनंद पैशातून विकत घेता येत नाही त्यासाठी अंतर्मन निर्मळ असायला हवे.

 

  • एक रंगात दुसरा रंग एकत्र केला कि नवीन रंग तयार होतो पण तो रंग नक्कीच आकर्षित असेलच असं नाही ते त्या दोन रंगावर अवलंबून असते आणि जीवनाचं असच काही असते जेव्हा एक नवीन नात बनत.

 

  • हाताची पाच बोटे सारखी नसतात पण एकत्रित होऊन काम कस पार पडायचं माहिती आहेतसेच मैत्रीत एकमेकांना समजल्याशिवाय एकत्र काम करणे कठीण असते.

 

  • निसर्गातील प्रत्येक गोष्टीकडून शिकवण येतेचदिवस संपला कि रात्र येतेच तेच दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळ होतेच तर नवीन दिवसाचा विचार मनात ठेवायचा.





ऋणानुबंध

 घरात एक बाळ जन्माला येते तेव्हा त्या बाळासोबत अनेक नाती जन्माला येतात. नात म्हटल की मनात एक वेगळच स्मितहास्य येते. बघा ना आपल्या कुटुंबातील सदस्य त्यानंतर शेजारीमग मित्रमैत्रिणीशिक्षक असे कितीतरी नाती तयार होतात आणि प्रत्येक नात्याच एक वैशिष्ट्य असते. 

जेव्हा एक नात तयार होत ते विश्वासावर अवलंबून असते. त्या नात्यातला समजूतदारपणाखोडकरपणाचिडचिडभांडणहास्यअबोला अश्या अनेक भावना त्या नात्यावर परिणाम करतात. काही नाती रक्ताची असतात काही दूरची असली तरी इतकी जवळची होऊन जातात कळतपण नाही. आपण प्रत्येक नात्याला नाव दिले आहेआणि त्या प्रत्येक नात्याची  एक विशिष्ट ओळख असते. 

नात म्हटल की त्यात एकमेकांसोबत व्यक्त केलेल्या भावनाकाही विषयावर चर्चामदतीला असणारा हातयोग्य निर्णय सुचवणारी बुद्धी असे सर्व येते. पण त्या नात्याचा तितकाच आदर असणे पण महत्त्वाचे आहे. जेव्हा त्या दोन व्यक्तिमध्ये एकमेकाबद्दल आदर असेलप्रेम असेलविश्वास असेल तरच ते नात योग्य वाटेने जातेआणि जर ते नात कमजोर झाल तर त्यातले घटक आपोआप ऱ्हास पावतात. 

सोप्प वाटे नात टिकवण पण जेव्हा वेळ येते तेव्हा हिंमत लागते. नात तोडायला एक कारण खूप असतेपण तेच नात जुळवून ठेवण्यास सर्व बाजूने विचार करूनसमजुतीने रहावे लागते.

झाडाला जगवण्यासाठी जस पाणीऊनऑक्सिजन हे सर्व लागते तेव्हाच ते मोठ होते आणि एकदा त्याची वाढ झाली की त्याला जपण्याची गरज नसतेतसच एकदा नात्याचा विश्वाससमजूतदारपणा दृढ झाला की त्या नात्यात असणाऱ्या व्यक्तीमध्ये ते नात जपवून ठेवण्याची ओढ असते.



   

इच्छाशक्ती

 कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है। 

 

हा डायलॉग नक्कीच ऐकला असेल...............घडल आहे का अस काही तुमच्या आयुष्यात.........इतका काय दडल आहे या वाक्यात की हा डायलॉग इतका लोकप्रिय झाला ?

चला तर बघूया 

आपण म्हणतो आपल्या नशिबात जे असते तेच घडते पण काही गोष्टी आपण आपल्या इच्छाशक्तीचा उपयोग करून सत्यात उतरवू शकतो. आपले विचार हे आपल जीवन घडवण्यास कारणीभूत ठरतात. एखादी व्यक्ति सतत नकारात्मक विचार करत असेल तर नक्कीच त्या व्यक्तीच्या जीवनात पण त्याच गोष्टी घडतात पण तेच एखाद्या व्यक्तीने सकारात्मक विचार करून आपल स्वप्न पूर्ण होणारच अशी भावना मनात ठेवली की नक्कीच एक दिवस ते स्वप्न पूर्ण होईलच.................पण हे कस काय होते ?

जेव्हा व्यक्ती विचार करतो तेव्हा त्या व्यक्तीची ऊर्जा वातावरणात समावेश होते. जे व्यक्तीचे विचार असतील त्यावर सभोवतील वातावरण कार्य करते..........नकळत आपल्या हातून ते कार्य पार पडते................. ते सकारात्मक किवा नकारात्मक असू शकते.. ही सर्व व्यक्तिमधून येणाऱ्या उर्जेचा परिणाम असतो. 

इच्छाशक्ती ही  एक जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहेया शक्तीचा वापर जीवनातील मोठ्या संकटातून बाहेर पडण्यास केल्या जाऊ शकतो किवा मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

त्यामुळेच त्या एका डायलॉगने सर्वांची मने जिंकून घेतली. सर्वाना नकारात्मक विचार येतातच मात्र ती आपल्या मनात घर करून राहायला नको............ कोणताही विचार करण्याआधी नक्कीच एकदा विचार करा की आपण जसा विचार करू तस आपल्या आयुष्यात होऊ शकते त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करत जीवनाचा आस्वाद घ्यावा.

अर्थ गणित

                घरात येणाऱ्या संपत्तीला लक्ष्मीचे स्वरूप समजल्या जाते. प्रत्येक घरात लक्ष्मीचा वास असतो. लक्ष्मीला धन संपदाशांती आणि समृद्धी ची देवी समजल्या जाते. हातात  येणाऱ्या धनाचा उपयोग योग्य रीतीने करणे महत्त्वाचे असते. धन हातळण्याची कला ही धन कमवण्यापेक्षा महत्वाची ठरते. जीवन जगताना अनेक गोष्टी लक्षात ठेवून समोर पाऊल टाकावे लागते. पण आजकाल बहुतांश घरात आर्थिक स्थिति मध्ये फार प्रमाणात बदल झालेले आहेत. आणि त्यामागची कारणं अनेक आहेत. ती एक एक बघूया..

                        आजच्या काळात घरातील प्रत्येक व्यक्तीकडे दूरध्वनी असतो....काळ बदलतोय तसा  अनावश्यक खर्च वाढतोय ..... मुलं-मुलींची शैक्षणिक खर्च वाढलालहान मुलामुलीना शिकवणीला पाठवण्याची सवय झाली आहे ... ....वाढदिवस आणि वेगळे समारंभात अनेक दिखावा खर्च..... हळदमेहंदीलग्न समारंभात अतिशय खर्च कशासाठी एक प्रतिष्ठा असावी..... लोक काय म्हणतील या विचारपाई कर्ज  घेतात आणि नंतर ते फेडण्याची वेळ येते............हॉटेल मध्ये जेवण करायला जाण्याची भर पडली......मित्र मंडळात पार्टी करण्याच एक वेगळच वेड लागल आहे. काही नवीन वस्तु घेतली तरी त्यासाठी पार्टी मागितली जाते....खाण्यापिण्यात बदल झाल्यामुळे वैद्यकीय खर्चात वाढ...... असे अनेक अनावश्यक खर्च टाळणे आजची गरज आहे. आपली गरज ही अन्नवस्त्र आणि निवारा आहे. लोकांसाठी आपला अनावश्यक खर्च करण्याची गरज नाही आहे.

                जुन्या काळात घरात एकच दूरध्वनी असायचाआणि आता घरातील प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचा दूरध्वनी असतोच. त्यामुळे खर्चात  वाढ झाली आहे. आधी टी.व्ही. वर  मोजक्या वाहिन्या असायच्या आणि त्या सर्व मिळून बघायचेवाहिनी संपली की लोक झोपायचे किवा गप्पा करत बसायचे. पूर्वी शालेय विद्यार्थी शाळा करूनमैदानावर खेडून लवकर झोपी जायचे पण आता शिक्षणाचा ताण वाढला आणि कोविड च्या काळात अभ्यासाची एक आवड कमी झाली..आणि मोबाइलच वेड लागल.....पूर्वी आजी-आजोबाना  चष्मे लागायचे आता लहान मुला-मुलीना चष्मे लागतात....विशेष पदार्थ सणाच्या दिवशीच केले जायचे पण आता खाण्यापिण्यात खूप बदल झाले आहे त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण वाढले आहे...

 

           आजच्या काळात  माणूस स्वतःला काळाच्या प्रवाहात वाहू देत आहे. पण त्याच प्रवाहात आपण होडी वापरुन आपण आपल्या मार्गाने प्रवाहात गेलो तर ते उत्तम असेल. 

जीवनात आपण ठरवलेल्या प्रवाहात आनंद घेत जगायच....

पूर्वी जवळ काही नसताना आनंदात जगता येत होत. पण आता मार्गदर्शन घेतात की स्वतःला आनंदी कसे ठेवायचे..  या दोन ओळीच सर्व काही सांगून जातात..

म्हणून खरा आनंद आणि पैश्यांचा संबंध नसतो. आणि खरा आनंद विकत घेता येत नाही.. त्यासाठी मनाची श्रीमंती असणे गरजेच असते....

संगत

       प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सभोवतील वतावरणाचापरिसराचा शारीरिकमानसिक किंवा व्यक्तिमत्त्व विकासावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. प्रत्येक व्यक्तीची वाढ होत असताना  ती व्यक्ती आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीवरून शिकत जातो आणि आत्मसात करत असतो. नवनवीन गोष्टी शिकत असताना त्या चांगल्या आहे की वाईट आहेत याच परीक्षण त्या व्यक्तीला करता  येईलच अस नाही. त्यासाठी आदर्श व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज असते. 

आदर्श व्यक्ती  कोण ?

                   आदर्श व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती  तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेलआणि तुम्ही कुठे चुकत असाल तर ती चूक तुम्हाला सांगून त्यावर योग्य उपाय सांगेल. अशी ही आदर्श व्यक्ती  स्वतःलाच  शोधावी लागते. 

          आयुष्य जगताना खूप लोक भेटतात. काही मैत्रीच्या रूपात काही गुरूच्या रूपात किंवा अजून काही..............  मैत्रीच्या रूपात भेटणाऱ्या व्यक्तीमध्ये चांगले आणि वाईट गुण असतात आणि या संगतीचा परिणाम स्वतःवर होतो. आपण त्या व्यक्तीकडून कोणते गुण घ्यावे हे स्वतःवर अवलंबून असते. 

                   जेव्हा व्यक्ती माणूस ओळखायला शिकतोतेव्हा त्या व्यक्तीचा एक नवीन प्रवास सुरू होतो. कारण तेव्हा एक स्वतःवरचा विश्वास कायम असतो आणि काय बरोबर काय चूक आहे याची जाणीव येते. आपल कोण ?  या प्रश्नाच उत्तर मिळून जाते. 

                  आयुष्यात संगत खूप महत्त्वाची असते. त्याच आधारे आपलं आयुष्य प्रकाशात किवा अंधारात जाऊ शकते. त्यामुळे प्रकाश की अंधार यापैकी कोणत्या मार्गाने जायच हे स्वतः ठरवून स्वतःच्या बळावर आयुष्यातील यशाची शिखरे गाठायची.

रक्तदान - श्रेष्ठ दान

                           परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री याच्या जयंतीनिमित्त्य मला पहिल्यांदा रक्तदान करण्याचा अनुभव आला. तो अनुभव मी सर्वाना सांगू इच्छितेजेणेकरून तुम्ही सुद्धा या सेवेत आपलं योगदान द्याल.

                सर्वात प्रथम रक्तदान करण्यासाठी अनेकांना मनात भीती शंका असतातत्या प्रथम दूर करण्याची गरज आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असं म्हटल्या जाते. आपण दान केलेल्या रक्तामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव सुद्धा वाचू शकतो. रक्तदाताचं वजन आणि हिमोग्लोबीन हे प्रमाणात असावं आणि शरीर निरोगी असावं लागते. आपल्या शरीरातील रक्त गेलं हे मनात ठेवण्यापेक्षा हेच एका जिवाच्या कामी येईल असं मनात ठेवून पुढाकार घ्याला हवा. शरीर सुदृढ असेल तर अशक्तपणा सुद्धा जाणवत नाही. पण विश्रांतीची गरज असते. काही तासात नैसर्गिक रक्त शरीरात तयार होते. 

                   मला सुरुवातीला मनात भीती होती कस काय होईल.... पण सर्व सुरळीतपणे प्रक्रिया पार पडली. पण एक गोष्ट होती ती म्हणजे मी गेली तेव्हा मुली नव्हत्या. पुरुषांचं प्रमाण हे जास्त होत. त्यामुळे मनात आलं कि आपली स्त्री शक्तींनी सुद्धा मनात भीती न बाळगता आनंदाने या सेवेचा आनंद घ्यावा.

                 आजच्या लिखाणाचा हेच उद्देश आहे कि हे माझे शब्द वाचताना तुम्हाला पण  या सेवेत येण्याचा मार्ग दिसावा  आणि जे आधीपासून या सेवेत आहेत त्यांचं कौतुक आहे.

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...