Wednesday, March 02, 2022

इच्छाशक्ती

 कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है। 

 

हा डायलॉग नक्कीच ऐकला असेल...............घडल आहे का अस काही तुमच्या आयुष्यात.........इतका काय दडल आहे या वाक्यात की हा डायलॉग इतका लोकप्रिय झाला ?

चला तर बघूया 

आपण म्हणतो आपल्या नशिबात जे असते तेच घडते पण काही गोष्टी आपण आपल्या इच्छाशक्तीचा उपयोग करून सत्यात उतरवू शकतो. आपले विचार हे आपल जीवन घडवण्यास कारणीभूत ठरतात. एखादी व्यक्ति सतत नकारात्मक विचार करत असेल तर नक्कीच त्या व्यक्तीच्या जीवनात पण त्याच गोष्टी घडतात पण तेच एखाद्या व्यक्तीने सकारात्मक विचार करून आपल स्वप्न पूर्ण होणारच अशी भावना मनात ठेवली की नक्कीच एक दिवस ते स्वप्न पूर्ण होईलच.................पण हे कस काय होते ?

जेव्हा व्यक्ती विचार करतो तेव्हा त्या व्यक्तीची ऊर्जा वातावरणात समावेश होते. जे व्यक्तीचे विचार असतील त्यावर सभोवतील वातावरण कार्य करते..........नकळत आपल्या हातून ते कार्य पार पडते................. ते सकारात्मक किवा नकारात्मक असू शकते.. ही सर्व व्यक्तिमधून येणाऱ्या उर्जेचा परिणाम असतो. 

इच्छाशक्ती ही  एक जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहेया शक्तीचा वापर जीवनातील मोठ्या संकटातून बाहेर पडण्यास केल्या जाऊ शकतो किवा मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

त्यामुळेच त्या एका डायलॉगने सर्वांची मने जिंकून घेतली. सर्वाना नकारात्मक विचार येतातच मात्र ती आपल्या मनात घर करून राहायला नको............ कोणताही विचार करण्याआधी नक्कीच एकदा विचार करा की आपण जसा विचार करू तस आपल्या आयुष्यात होऊ शकते त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करत जीवनाचा आस्वाद घ्यावा.

अर्थ गणित

                घरात येणाऱ्या संपत्तीला लक्ष्मीचे स्वरूप समजल्या जाते. प्रत्येक घरात लक्ष्मीचा वास असतो. लक्ष्मीला धन संपदाशांती आणि समृद्धी ची देवी समजल्या जाते. हातात  येणाऱ्या धनाचा उपयोग योग्य रीतीने करणे महत्त्वाचे असते. धन हातळण्याची कला ही धन कमवण्यापेक्षा महत्वाची ठरते. जीवन जगताना अनेक गोष्टी लक्षात ठेवून समोर पाऊल टाकावे लागते. पण आजकाल बहुतांश घरात आर्थिक स्थिति मध्ये फार प्रमाणात बदल झालेले आहेत. आणि त्यामागची कारणं अनेक आहेत. ती एक एक बघूया..

                        आजच्या काळात घरातील प्रत्येक व्यक्तीकडे दूरध्वनी असतो....काळ बदलतोय तसा  अनावश्यक खर्च वाढतोय ..... मुलं-मुलींची शैक्षणिक खर्च वाढलालहान मुलामुलीना शिकवणीला पाठवण्याची सवय झाली आहे ... ....वाढदिवस आणि वेगळे समारंभात अनेक दिखावा खर्च..... हळदमेहंदीलग्न समारंभात अतिशय खर्च कशासाठी एक प्रतिष्ठा असावी..... लोक काय म्हणतील या विचारपाई कर्ज  घेतात आणि नंतर ते फेडण्याची वेळ येते............हॉटेल मध्ये जेवण करायला जाण्याची भर पडली......मित्र मंडळात पार्टी करण्याच एक वेगळच वेड लागल आहे. काही नवीन वस्तु घेतली तरी त्यासाठी पार्टी मागितली जाते....खाण्यापिण्यात बदल झाल्यामुळे वैद्यकीय खर्चात वाढ...... असे अनेक अनावश्यक खर्च टाळणे आजची गरज आहे. आपली गरज ही अन्नवस्त्र आणि निवारा आहे. लोकांसाठी आपला अनावश्यक खर्च करण्याची गरज नाही आहे.

                जुन्या काळात घरात एकच दूरध्वनी असायचाआणि आता घरातील प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचा दूरध्वनी असतोच. त्यामुळे खर्चात  वाढ झाली आहे. आधी टी.व्ही. वर  मोजक्या वाहिन्या असायच्या आणि त्या सर्व मिळून बघायचेवाहिनी संपली की लोक झोपायचे किवा गप्पा करत बसायचे. पूर्वी शालेय विद्यार्थी शाळा करूनमैदानावर खेडून लवकर झोपी जायचे पण आता शिक्षणाचा ताण वाढला आणि कोविड च्या काळात अभ्यासाची एक आवड कमी झाली..आणि मोबाइलच वेड लागल.....पूर्वी आजी-आजोबाना  चष्मे लागायचे आता लहान मुला-मुलीना चष्मे लागतात....विशेष पदार्थ सणाच्या दिवशीच केले जायचे पण आता खाण्यापिण्यात खूप बदल झाले आहे त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण वाढले आहे...

 

           आजच्या काळात  माणूस स्वतःला काळाच्या प्रवाहात वाहू देत आहे. पण त्याच प्रवाहात आपण होडी वापरुन आपण आपल्या मार्गाने प्रवाहात गेलो तर ते उत्तम असेल. 

जीवनात आपण ठरवलेल्या प्रवाहात आनंद घेत जगायच....

पूर्वी जवळ काही नसताना आनंदात जगता येत होत. पण आता मार्गदर्शन घेतात की स्वतःला आनंदी कसे ठेवायचे..  या दोन ओळीच सर्व काही सांगून जातात..

म्हणून खरा आनंद आणि पैश्यांचा संबंध नसतो. आणि खरा आनंद विकत घेता येत नाही.. त्यासाठी मनाची श्रीमंती असणे गरजेच असते....

संगत

       प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सभोवतील वतावरणाचापरिसराचा शारीरिकमानसिक किंवा व्यक्तिमत्त्व विकासावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. प्रत्येक व्यक्तीची वाढ होत असताना  ती व्यक्ती आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीवरून शिकत जातो आणि आत्मसात करत असतो. नवनवीन गोष्टी शिकत असताना त्या चांगल्या आहे की वाईट आहेत याच परीक्षण त्या व्यक्तीला करता  येईलच अस नाही. त्यासाठी आदर्श व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज असते. 

आदर्श व्यक्ती  कोण ?

                   आदर्श व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती  तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेलआणि तुम्ही कुठे चुकत असाल तर ती चूक तुम्हाला सांगून त्यावर योग्य उपाय सांगेल. अशी ही आदर्श व्यक्ती  स्वतःलाच  शोधावी लागते. 

          आयुष्य जगताना खूप लोक भेटतात. काही मैत्रीच्या रूपात काही गुरूच्या रूपात किंवा अजून काही..............  मैत्रीच्या रूपात भेटणाऱ्या व्यक्तीमध्ये चांगले आणि वाईट गुण असतात आणि या संगतीचा परिणाम स्वतःवर होतो. आपण त्या व्यक्तीकडून कोणते गुण घ्यावे हे स्वतःवर अवलंबून असते. 

                   जेव्हा व्यक्ती माणूस ओळखायला शिकतोतेव्हा त्या व्यक्तीचा एक नवीन प्रवास सुरू होतो. कारण तेव्हा एक स्वतःवरचा विश्वास कायम असतो आणि काय बरोबर काय चूक आहे याची जाणीव येते. आपल कोण ?  या प्रश्नाच उत्तर मिळून जाते. 

                  आयुष्यात संगत खूप महत्त्वाची असते. त्याच आधारे आपलं आयुष्य प्रकाशात किवा अंधारात जाऊ शकते. त्यामुळे प्रकाश की अंधार यापैकी कोणत्या मार्गाने जायच हे स्वतः ठरवून स्वतःच्या बळावर आयुष्यातील यशाची शिखरे गाठायची.

रक्तदान - श्रेष्ठ दान

                           परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री याच्या जयंतीनिमित्त्य मला पहिल्यांदा रक्तदान करण्याचा अनुभव आला. तो अनुभव मी सर्वाना सांगू इच्छितेजेणेकरून तुम्ही सुद्धा या सेवेत आपलं योगदान द्याल.

                सर्वात प्रथम रक्तदान करण्यासाठी अनेकांना मनात भीती शंका असतातत्या प्रथम दूर करण्याची गरज आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असं म्हटल्या जाते. आपण दान केलेल्या रक्तामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव सुद्धा वाचू शकतो. रक्तदाताचं वजन आणि हिमोग्लोबीन हे प्रमाणात असावं आणि शरीर निरोगी असावं लागते. आपल्या शरीरातील रक्त गेलं हे मनात ठेवण्यापेक्षा हेच एका जिवाच्या कामी येईल असं मनात ठेवून पुढाकार घ्याला हवा. शरीर सुदृढ असेल तर अशक्तपणा सुद्धा जाणवत नाही. पण विश्रांतीची गरज असते. काही तासात नैसर्गिक रक्त शरीरात तयार होते. 

                   मला सुरुवातीला मनात भीती होती कस काय होईल.... पण सर्व सुरळीतपणे प्रक्रिया पार पडली. पण एक गोष्ट होती ती म्हणजे मी गेली तेव्हा मुली नव्हत्या. पुरुषांचं प्रमाण हे जास्त होत. त्यामुळे मनात आलं कि आपली स्त्री शक्तींनी सुद्धा मनात भीती न बाळगता आनंदाने या सेवेचा आनंद घ्यावा.

                 आजच्या लिखाणाचा हेच उद्देश आहे कि हे माझे शब्द वाचताना तुम्हाला पण  या सेवेत येण्याचा मार्ग दिसावा  आणि जे आधीपासून या सेवेत आहेत त्यांचं कौतुक आहे.

३ रंग आयुष्याचे

           बालपण आणि म्हातारपण साम्य आहे अस म्हणतात. बाळ जन्माला येते आणि तो जीव सर्वांचा लाडका असतो. पण जेव्हा त्या बाळाची काळजी घ्याची असते तेव्हा कष्ट लागतेकारण त्या बाळाला बोलता येत नाहीसांगता येत नाही. प्रत्येक गोष्ट हाई आईलाबाबाला समजून घ्यावी लागते. बाळ रडते आहे तर काय करायला हवं हे हळू हळू शिकून घेतात. त्या बाळाला आधार हवा असतो. 

                 बाळ मोठं होत होत युवावर्गात प्रवेश करतो. त्या काळात अनेक मित्र मैत्रिणी मिळतातत्यापैकी जास्तीत जास्त हे काही वर्षासाठी मैत्री असणारे असतात पण काहीसोबत मैत्री ही कायम साथ देणारी असते. खूप काही नवीन शिकण्याचा काळ असतो. याच काळात आपलं ध्येयआपल्या आवडीनिवडी ठरवतो आणि एका भविष्याच्या वाटचालीने जगतो.

                 म्हातारपण एक कसोटीची परिस्थिती असतेवृद्ध व्यक्ती सहज बोलून दाखवत नाहीत्यांना अस वाटते याना त्रास नको त्यासाठी मौन असतात पण त्यांची ती गोष्ट माहित करायला समजून घ्यावं लागते. प्रत्येक गोष्टीत आधार द्यावा लागतो. चालायला आधार देण्यापासून ते जेवण भरवण्यापर्यंत सर्वच करावं लागते. जेव्हा व्यक्ती जवळची असते तेव्हा पूर्ण आपुलकीने सेवा केली जाते. आणि त्याच वेळेला आपण आयुष्यभर काय कमावलं याच फळ माहित पडते. रक्ताच्या नात्यांनी दिलेली साथ नाहीतर सोडलेली साथ..........

आश्चर्यांनी भरलेले आयुष्य ✨

               आयुष्य म्हणजे काय याचा खरा अर्थ हा मोठे झाल्यावर कळत असतो. मोठे होता होता लहानपण किती भारी होत याचा अनुभव येतो. उठायचं, शाळेल...