Sunday, April 24, 2022

माझी चित्रकला - भाग १

श्री राधाकृष्ण
 

श्री विठ्ठल राखुमाई 










Wednesday, March 02, 2022

संयम

                  माझ्यासोबतच अस का होते मला का अपयश मिळते कधी मी यशाची पायरी गाठेल ?  काय सारख एक गेल की एक टेंशन येऊनच असते ?

   असे प्रश्न मनात येण स्वाभाविकच आहे. मानवी जीवनात सुखदुःखताण-तणावरडणसकारात्मकतानकारात्मकता  ही सर्व असण सामान्य आहे. वाईट काळ हा चांगल्या काळात कस वागायच ते शिकवून जाते. जीवन जगताना म्हणजे फक्त सकाळी उठणेकाम करणेजेवण करणेपरत झोपणे.......नाहीफक्त याच गोष्टी नाही तर जीवन जगताना म्हणजे आपले विचारआपली दुसऱ्या व्यक्तीबद्दलची वागणूककठीण प्रसंगी सावरायची क्षमतानिर्णय घेण्याची क्षमता इ. त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे संयम. 

             बहुतेक व्यक्तीच मन हे चंचल असते आणि त्याच चंचलपणाच्या विरुद्ध असतो संयमआपण ऐकलं आहेसंयम ही यशाची किल्ली आहेआणि कुलूप म्हणजे आपल्या समोरील संधी. प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट वेळ असतो आणि तो वेळ आली की कार्य पूर्ण होते. पण तिथपर्यंत पोहचेपर्यंत अनेक अडथळे पार करावे लागते. त्यात खरी परीक्षा असतेत्या परिस्थितीत आपलं वर्तन कस असतेहे महत्त्वाचे ठरते. 

                एखाद्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी संयम आवश्यक आहेच पण सोबतीला मेहनतीची जोड लागतेच. संयम हा त्या संघर्षाचा एक घटक आहे. आपल्या मेहनतीच्या बळावर आणि देवाच्या आशीर्वादाने जोपर्यंत आपण ध्येयापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहणे योग्य आहे. 

              खचून न जाता संयम ठेवून मेहनत करून यशाच शिखर गाठण्याची प्रत्येक व्यक्तिमध्ये शक्ति असते. फक्त गरज असते ती शक्ति ओळखण्याची ..........

स्वप्न अनंत असावी पण ती पूर्ण करण्याची ताकत पण असावी.

संयम बाळगा......नक्कीच एक नवीन दिवस आयुष्यात यशाची भरभराट आणेल.....

स्वप्न जीवनाचे

                  जीवनात लहान लहान गोष्टीच आनंद अनुभवता येणारी व्यक्ती ही नक्कीच समाधान वृत्तीची असते. दररोज येणारे नवीन क्षणनवीन अनुभव या सर्वाना आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग बनवून त्यांचा स्वीकार करून आनंदात जगणं  सोप नाही पण ते अवघड सुद्धा नाही. 

आजकाल जगाच्या वाटेने चालणारी व्यक्ती स्वतःच अस्तित्व विसरत आहे. या गोष्टीच उदाहरण बघू

               रस्त्यावर अपंग (ज्या व्यक्तीला पाय नाहीतकिवा चालायला जमत नाही) व्यक्ती ही आपली चाके असलेली खुर्ची हाताच्या मदतीने चालवून गती निर्माण करतो. पण तेच जेव्हा त्याला पायांनी चालणारी व्यक्ति दिसतेतेव्हा त्याला पण वाटते की आपण पण स्वतःच्या पायावर चालू शकलो असतो तर किती बर झाल असतं. आता जो पाऊलवाटेने चालणारा व्यक्ती सायकल चालवण्याऱ्या व्यक्तीला बघतो तर त्याला पण विचार येतोआपल्याकडे पण सायकल असती तर खूप बर झाल असतं. समोर सायकल चालवणारा व्यक्तीला  गाडी चालवणाऱ्या  व्यक्तीकडे बघून वाटते माझ्याकडे पण गाडी असती किती छान असतं .............

         असे हे विचारांचे चक्र सुरूच असते. नक्कीच प्रत्येक व्यक्तीने समोरील स्वप्न बघावे पण ते स्वप्न सकारात्मक दिशेने न्यावे. काही नकारात्मक विचार करतात. माझ्या नशिबात हेच आहे का ?.. अस तस.. तुमच्या जवळ जे काही आहे त्याचा आदर केला की नक्कीच समोरच यश देवच आपल्या पदरी देतो.  आणि म्हणतात ना तुमच्याकडे जे आहे ते कदाचित कोणाच स्वप्न असेल म्हणून देवावर विश्वास ठेवून आपल्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. 

                   तुमच्याकडे काय नाही याच्या विचारात जीवन घालवण्यापेक्षा आज तुमच्याकडे काय काय आहेहे विचार करून एक यादी बनवा मग नक्कीच कळेलआपण किती भाग्यवान आहो की देवाने आजपर्यंत आपल्याला किती काही दिलेल आहे. 

             जगताना आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे कमी आहे त्याच्याकडे बघून जगातेव्हा वाटेल की खरच आपल्याकडे किती काही आहे. तेच आपण ज्यांच्याकडे जास्त साधन संपत्ति आहेअश्याकडे बघून जीवन जगणार तर एक वर्तमान गोष्टीतील समाधान हरवून बसाल.




 

 

मनाचा स्पर्श

 


  • आयुष्य खूप सुंदर आहेजेव्हा स्वतः जगता जगता दुसऱ्यासाठी जगतो.

 

  • न पाहता मनात रुजणारी गोष्ट म्हणजे खरी भावना.

 

  • निस्वार्थपणे कार्य करणे हीच खरी सेवा.

 

  • काही क्षणांना आशीर्वाद द्याल देव सुद्धा प्रेमाचा वर्षाव करीत असतो.

 

  • खरा आनंद पैशातून विकत घेता येत नाही त्यासाठी अंतर्मन निर्मळ असायला हवे.

 

  • एक रंगात दुसरा रंग एकत्र केला कि नवीन रंग तयार होतो पण तो रंग नक्कीच आकर्षित असेलच असं नाही ते त्या दोन रंगावर अवलंबून असते आणि जीवनाचं असच काही असते जेव्हा एक नवीन नात बनत.

 

  • हाताची पाच बोटे सारखी नसतात पण एकत्रित होऊन काम कस पार पडायचं माहिती आहेतसेच मैत्रीत एकमेकांना समजल्याशिवाय एकत्र काम करणे कठीण असते.

 

  • निसर्गातील प्रत्येक गोष्टीकडून शिकवण येतेचदिवस संपला कि रात्र येतेच तेच दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळ होतेच तर नवीन दिवसाचा विचार मनात ठेवायचा.





ऋणानुबंध

 घरात एक बाळ जन्माला येते तेव्हा त्या बाळासोबत अनेक नाती जन्माला येतात. नात म्हटल की मनात एक वेगळच स्मितहास्य येते. बघा ना आपल्या कुटुंबातील सदस्य त्यानंतर शेजारीमग मित्रमैत्रिणीशिक्षक असे कितीतरी नाती तयार होतात आणि प्रत्येक नात्याच एक वैशिष्ट्य असते. 

जेव्हा एक नात तयार होत ते विश्वासावर अवलंबून असते. त्या नात्यातला समजूतदारपणाखोडकरपणाचिडचिडभांडणहास्यअबोला अश्या अनेक भावना त्या नात्यावर परिणाम करतात. काही नाती रक्ताची असतात काही दूरची असली तरी इतकी जवळची होऊन जातात कळतपण नाही. आपण प्रत्येक नात्याला नाव दिले आहेआणि त्या प्रत्येक नात्याची  एक विशिष्ट ओळख असते. 

नात म्हटल की त्यात एकमेकांसोबत व्यक्त केलेल्या भावनाकाही विषयावर चर्चामदतीला असणारा हातयोग्य निर्णय सुचवणारी बुद्धी असे सर्व येते. पण त्या नात्याचा तितकाच आदर असणे पण महत्त्वाचे आहे. जेव्हा त्या दोन व्यक्तिमध्ये एकमेकाबद्दल आदर असेलप्रेम असेलविश्वास असेल तरच ते नात योग्य वाटेने जातेआणि जर ते नात कमजोर झाल तर त्यातले घटक आपोआप ऱ्हास पावतात. 

सोप्प वाटे नात टिकवण पण जेव्हा वेळ येते तेव्हा हिंमत लागते. नात तोडायला एक कारण खूप असतेपण तेच नात जुळवून ठेवण्यास सर्व बाजूने विचार करूनसमजुतीने रहावे लागते.

झाडाला जगवण्यासाठी जस पाणीऊनऑक्सिजन हे सर्व लागते तेव्हाच ते मोठ होते आणि एकदा त्याची वाढ झाली की त्याला जपण्याची गरज नसतेतसच एकदा नात्याचा विश्वाससमजूतदारपणा दृढ झाला की त्या नात्यात असणाऱ्या व्यक्तीमध्ये ते नात जपवून ठेवण्याची ओढ असते.



   

आश्चर्यांनी भरलेले आयुष्य ✨

               आयुष्य म्हणजे काय याचा खरा अर्थ हा मोठे झाल्यावर कळत असतो. मोठे होता होता लहानपण किती भारी होत याचा अनुभव येतो. उठायचं, शाळेल...