व्यक्तीच्या लहानपणापासूनची शिक्षण ते कामाचा प्रवास हा निराळा असतो. विविध विषय शिकणे, घटक चाचणी, वार्षिक परीक्षा देणे त्यात समोर कोणत्या क्षेत्रात जायचं याचा विचार करणे त्यानंतर प्रवेश होण्यासाठी धडपड करणे हे सर्व एका कामासाठी असत.
माझ्या पहिल्या कामाची सुरुवात ही टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड इथून सुरू झाली. बघता बघता कोरोना काळात एक वर्ष सर्व काम घरूनच झालं. चेहरा न बघता रोजच मिळून काम करण्याचा वेगळा अनुभव होता आणि मग काम ऑफिस मधून सुरू करण्यासाठी बोलवलं गेलं. कंपनीकडून असणाऱ्या बस मुळे येणं जाणं सोईस्कर झालं.
प्रत्येक कुलुपाची एक किल्ली असते तशी, कंपनी मध्ये जाण्यासाठी आयडी कार्ड ला शस्त्र च म्हणावं लागेल. स्कॅन केलं की दार उघडलं. लॅपटॉप ची बॅग प्रत्येक वेळेस येते जाता मशीन मध्ये टाकून स्कॅन करावी, आत बघितल तर अगदी नैसर्गिक वातावरण होते. चाफ्याची, आंब्याची झाडे सोबत अजून रंगीबेरंगी फुलांची झाडे. हे सर्व पाहून मन आनंदी झाले. पण आता कुठे जायचं याचा विचार करू लागले आणि मग आपल्या ओ.डी.सी. कडे रवाना झाले.
बघता बघता सर्व गोष्टींचं कुतूहल सुद्धा वाटू लागले आणि उद्या परत ऑफिस यायचं म्हणून वाट लक्षात ठेवत गेले आणि कामाला सुरुवात झाली. जेवण करायला फूड कोर्टला गेली ते पण भव्य अस होत, अगदी हॉटेल प्रमाणे मेनू आणि सर्व ऑनलाईन व्यवहार, फार छान वाटल. जेमतेम ऑफिस मधून काम सुरू झाल्याने हळू हळू संख्या वाढू लागली. फूड कोर्ट अशी जागा होती जिथे कानाला कुजबुज ऐकू यायची आणि डोळ्यांना नेमके अनेक लोक दिसायचे, नाहीतर ऑफिस मध्ये फक्त शांतता आणि आपल आपल काम.
काम करण्यासाठी कामाचे वातावरण सुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरते, किती पण वेगळा विचार डोक्यात घेऊन कंपनी मध्ये पाऊल टाकलं तरी सुद्धा वातावरण बघून मन आनंदी होईल आणि काम करायला भाग पाडेल अस साजेशीर आहे.
आतापर्यंतच्या प्रवासात अनेक लोकांशी ओळखी झाली आणि सर्वांकडून काही न काही नवीन शिकता आले, यापुढे पण असच आनंदचा प्रवास असावा.
जीवनात वय वाढल्याने नाहीतर अनुभवामुळे माणसाची परिपक्वता वाढते. जीवन जगताना असे वेगळे वेगळे अनुभव आल्याने परिस्थितीची जाणीव होते आणि समोर जाऊन योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
No comments:
Post a Comment