लिखाण हे एक संवादाचे साधन आहे. प्रत्येकाला आपलं जीवन कस जगायचं याच स्वातंत्र्य आहे. आपला देश जसा आधुनिक प्रगती करत आहे तसंच मानवाचे विचार पण आधुनिक गोष्टीकडे वळत आहे, या जगासोबत चालता चालता मूळ तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. आजच्या काळाची गरज बघून मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे. एकापण व्यक्तीला या तत्त्वाचे महत्त्व पटले तरी मला आनंद आहे.
Wednesday, July 13, 2022
आनंदाचे क्षण
Saturday, June 25, 2022
नारी सशक्तीकरण
आपला समाज हा पुरूषप्रधान समजल्या जातो. काही वर्ष आधी अस ठरलेल होत की पुरुष घर चालवण्यासाठी नोकरी किंवा धंदा करतील आणि स्त्रीयांनी घर काम सांभाळायच. इच्छा असेल तरी मुलीना शिक्षणापासून वंचित ठेवले जायचे. नोकरी करण्यास विरोध केला जायचा. हे आताच्या परिस्थितीत सुद्धा घडत आहे. तरी या सर्वाना सामना करून महिलाशक्ती आज प्रत्येक क्षेत्रात उत्तमरीत्या कार्यरत आहे.
ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले या भारताच्या सुपुत्रिमूळे आज प्रत्येक जन्म घेणाऱ्या मुलीला शिक्षणाचा
हक्क मिळाला आहे. जीवन जगण्याचा एक मूलभूत पाया म्हणजे शिक्षण आहे. आज प्रत्येक क्षेत्रात
महिला आपली जबाबदारी पार पाडत आहे. काही महिला देशाच नाव उज्ज्वल करत आहे. हे शिक्षण
मुलीना मिळवून देण्यासाठी अनेक समाजसुधारक यांनी अपार कष्ट केले. आणि त्याचच फळ म्हणजे
महिलांची प्रगती.
आजच्या
काळात प्रत्येक मुलीला, स्त्रीला स्वतःच्या पायावर उभ राहण्याची गरज आहे. कधी अडचण
आली तरी स्वतः त्या गोष्टीचा सामना करण्याची ताकत प्रत्येक स्त्री मध्ये हवी. आज अनेक
घटना घडतात त्यासाठी प्रत्येक महिलेने सावधान राहणे गरजेचे आहे. प्रत्येक स्त्रीने
स्वावलंबी होणे गरजेचे आहे. स्वावलंबी म्हणजे फक्त पैसा कमावणे नाही तर समाजात घडत
असणाऱ्या नवीन गोष्टी माहीत करून शिकून घेणे, पैसचे व्यवहार,काही नियम व कायदा, असे
अनेक गोष्टी प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे.
महिलांची
जबाबदारी आहे मूल आणि चूल सांभाळण्याची परंतु त्यासोबतच जगाच्या सोबत चालण्यासाठी जगात
काय घडते आहे हे माहीत असण महत्त्वाच आहे. अस म्हणतात घरातली स्त्री शिकली की ती पूर्ण
घराला शिकवते तसच काळानुसार महत्त्वपूर्ण गोष्टी माहीत असण काळाची गरज आहे.
मुलगी
शिकली प्रगती झाली
Saturday, June 04, 2022
Friday, June 03, 2022
प्रेम म्हणजे काय ?
जगातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम. प्रत्येक सजीवामध्ये असणारी ही प्रेमाची भावना, काही मनातल्या गोष्टी न बोलता सांगून देते. प्रेम समजावायला कोणतीही वाख्या नाही. प्रेमाबद्दल कितीही शब्दाने व्यक्त केलं तरी कमीच आहे. तर नेमक प्रेम काय असतं हे बघूया
जेव्हा २ व्यक्तिमध्ये नात असते, तेव्हा त्या नात्यामधील जिव्हाळा, विश्वास, आनंद, दुःख या सर्वांचा एकत्रितपणे विचार म्हणजे प्रेम. प्रत्येक आनंदात सहभागी असणार म्हणजे प्रेम, दुःखात आधार देणार प्रेम, उद्दिष्टापर्यंत पोहचवण्यासाठी ताकत देणार प्रेम, मायेचा जिव्हाळा देणार प्रेम, नेहमी विचारपूस करणार प्रेम................ अस हे प्रेम
आपण घरी बागेत झाडे लावतो त्यात एखाद्या झाडाला फूल लागण्यासाठी खत पाणी देतो. जेव्हा ते फूल उगवते तेव्हा खूप आनंद होतो. त्या झाडाची वाढ होण्यासाठी केलेली काळजी पण एक प्रेमच आहे. पण तेच फूल आपल्याला आवडते म्हणून आपण त्या फुलाला तोडण आणि फूल झाडाला खूप छान दिसते म्हणून झाडाला शोभून ठेवणे या २ वेगळ्या गोष्टी आहे. फूल झाडपासून वेगळ करण एक आवड झाली, पण तेच फूल झाडाला शोभून दिसण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे प्रेम.
जगाला प्रेमाचे महत्त्व समजवून सांगणारे एकमेव, सर्वांचे प्रिय म्हणजे श्री कृष्ण. श्री कृष्णाच्या लीला बद्दल सर्वाना माहीतच आहे. राधाकृष्ण अस श्री कृष्ण आणि राधा यांचे एकत्रित नाव आज सर्व भक्त घेतात.राधाकृष्ण एकमेकावर किती अपार प्रेम करायचे हे सर्वाना माहीत आहेत पण तरी त्यांच लग्न झाल नाही तर याच कारण खूपच सुंदरतेने सांगितलेले आहे. श्री कृष्ण आणि राधा यांच एकमेकावर प्रेम अनंत आहे. प्रेम म्हणजे एकच आत्मा आणि शरीर हे आत्मा वर कार्यरत असते. मनातून दोघेही एकच झालेले आहे. श्री कृष्णाने प्रेमा च महत्त्व सांगितलं आहे. प्रेमात अहंकार क्रोध द्वेष, निष्काळजी या सर्वांची जागाच नाही आहे. प्रेम म्हणजे एक शुद्ध, पवित्र मनातील भावना.
खर प्रेम मिळण म्हणजे एक नशीब आहे. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीने पण आपल्यावर प्रेम करावे तितकीच आपली काळजी घ्यावी अस वाटत असते. पण जेव्हा नात्यात समजूतदारपणा, विश्वास, आपुलकी, काळजी असते तिथे खर प्रेम असते.
आश्चर्यांनी भरलेले आयुष्य ✨
आयुष्य म्हणजे काय याचा खरा अर्थ हा मोठे झाल्यावर कळत असतो. मोठे होता होता लहानपण किती भारी होत याचा अनुभव येतो. उठायचं, शाळेल...
-
काल ९ ऑक्टोबर रोजी श्री रतन नवल टाटा सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी साधारण मध्यरात्री प्रसारित माध्यमातुन कळाली. जणूकाह...
-
आनंदाने जीवन जगण्याची इच्छा बाळगत आईबाबांनी एका मुलीला जन्म दिला. फक्त आईबाबाच नाही तर पूर्ण परिवार आनंदाने न्हाहून निघाले....






.jpg)
.jpg)



