![]() |
| केदारनाथ धाम |
![]() |
| गुढीपाडवा |
![]() |
| जय श्री राम |
लिखाण हे एक संवादाचे साधन आहे. प्रत्येकाला आपलं जीवन कस जगायचं याच स्वातंत्र्य आहे. आपला देश जसा आधुनिक प्रगती करत आहे तसंच मानवाचे विचार पण आधुनिक गोष्टीकडे वळत आहे, या जगासोबत चालता चालता मूळ तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. आजच्या काळाची गरज बघून मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे. एकापण व्यक्तीला या तत्त्वाचे महत्त्व पटले तरी मला आनंद आहे.
जगातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम. प्रत्येक सजीवामध्ये असणारी ही प्रेमाची भावना, काही मनातल्या गोष्टी न बोलता सांगून देते. प्रेम समजावायला कोणतीही वाख्या नाही. प्रेमाबद्दल कितीही शब्दाने व्यक्त केलं तरी कमीच आहे. तर नेमक प्रेम काय असतं हे बघूया
जेव्हा २ व्यक्तिमध्ये नात असते, तेव्हा त्या नात्यामधील जिव्हाळा, विश्वास, आनंद, दुःख या सर्वांचा एकत्रितपणे विचार म्हणजे प्रेम. प्रत्येक आनंदात सहभागी असणार म्हणजे प्रेम, दुःखात आधार देणार प्रेम, उद्दिष्टापर्यंत पोहचवण्यासाठी ताकत देणार प्रेम, मायेचा जिव्हाळा देणार प्रेम, नेहमी विचारपूस करणार प्रेम................ अस हे प्रेम
आपण घरी बागेत झाडे लावतो त्यात एखाद्या झाडाला फूल लागण्यासाठी खत पाणी देतो. जेव्हा ते फूल उगवते तेव्हा खूप आनंद होतो. त्या झाडाची वाढ होण्यासाठी केलेली काळजी पण एक प्रेमच आहे. पण तेच फूल आपल्याला आवडते म्हणून आपण त्या फुलाला तोडण आणि फूल झाडाला खूप छान दिसते म्हणून झाडाला शोभून ठेवणे या २ वेगळ्या गोष्टी आहे. फूल झाडपासून वेगळ करण एक आवड झाली, पण तेच फूल झाडाला शोभून दिसण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे प्रेम.
जगाला प्रेमाचे महत्त्व समजवून सांगणारे एकमेव, सर्वांचे प्रिय म्हणजे श्री कृष्ण. श्री कृष्णाच्या लीला बद्दल सर्वाना माहीतच आहे. राधाकृष्ण अस श्री कृष्ण आणि राधा यांचे एकत्रित नाव आज सर्व भक्त घेतात.राधाकृष्ण एकमेकावर किती अपार प्रेम करायचे हे सर्वाना माहीत आहेत पण तरी त्यांच लग्न झाल नाही तर याच कारण खूपच सुंदरतेने सांगितलेले आहे. श्री कृष्ण आणि राधा यांच एकमेकावर प्रेम अनंत आहे. प्रेम म्हणजे एकच आत्मा आणि शरीर हे आत्मा वर कार्यरत असते. मनातून दोघेही एकच झालेले आहे. श्री कृष्णाने प्रेमा च महत्त्व सांगितलं आहे. प्रेमात अहंकार क्रोध द्वेष, निष्काळजी या सर्वांची जागाच नाही आहे. प्रेम म्हणजे एक शुद्ध, पवित्र मनातील भावना.
खर प्रेम मिळण म्हणजे एक नशीब आहे. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीने पण आपल्यावर प्रेम करावे तितकीच आपली काळजी घ्यावी अस वाटत असते. पण जेव्हा नात्यात समजूतदारपणा, विश्वास, आपुलकी, काळजी असते तिथे खर प्रेम असते.
माझ्यासोबतच अस का होते ? मला का अपयश मिळते ? कधी मी यशाची पायरी गाठेल ? काय सारख एक गेल की एक टेंशन येऊनच असते ?
असे प्रश्न मनात येण स्वाभाविकच आहे. मानवी जीवनात सुख, दुःख, ताण-तणाव, रडण, सकारात्मकता, नकारात्मकता ही सर्व असण सामान्य आहे. वाईट काळ हा चांगल्या काळात कस वागायच ते शिकवून जाते. जीवन जगताना म्हणजे फक्त सकाळी उठणे, काम करणे, जेवण करणे, परत झोपणे.......नाही, फक्त याच गोष्टी नाही तर जीवन जगताना म्हणजे आपले विचार, आपली दुसऱ्या व्यक्तीबद्दलची वागणूक, कठीण प्रसंगी सावरायची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता इ. त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे संयम.
बहुतेक व्यक्तीच मन हे चंचल असते आणि त्याच चंचलपणाच्या विरुद्ध असतो संयम. आपण ऐकलं आहे, संयम ही यशाची किल्ली आहे, आणि कुलूप म्हणजे आपल्या समोरील संधी. प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट वेळ असतो आणि तो वेळ आली की कार्य पूर्ण होते. पण तिथपर्यंत पोहचेपर्यंत अनेक अडथळे पार करावे लागते. त्यात खरी परीक्षा असते, त्या परिस्थितीत आपलं वर्तन कस असते, हे महत्त्वाचे ठरते.
एखाद्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी संयम आवश्यक आहेच पण सोबतीला मेहनतीची जोड लागतेच. संयम हा त्या संघर्षाचा एक घटक आहे. आपल्या मेहनतीच्या बळावर आणि देवाच्या आशीर्वादाने जोपर्यंत आपण ध्येयापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहणे योग्य आहे.
खचून न जाता संयम ठेवून मेहनत करून यशाच शिखर गाठण्याची प्रत्येक व्यक्तिमध्ये शक्ति असते. फक्त गरज असते ती शक्ति ओळखण्याची ..........
स्वप्न अनंत असावी पण ती पूर्ण करण्याची ताकत पण असावी.
संयम बाळगा......नक्कीच एक नवीन दिवस आयुष्यात यशाची भरभराट आणेल.....
आयुष्य म्हणजे काय याचा खरा अर्थ हा मोठे झाल्यावर कळत असतो. मोठे होता होता लहानपण किती भारी होत याचा अनुभव येतो. उठायचं, शाळेल...