Wednesday, March 02, 2022

मातृत्व

                   आई म्हणजे 'आत्मा आणि ईश्वरया दोघांचा संगम आहे. जी स्त्री आपल्या अपत्याला जन्म देते तिला मातृत्व प्राप्त होते. ती स्त्री प्रेमाचा सागर बनून आपल्या बाळाला आपल्या जगात सामावून घेते. नऊ महिने वेदना सहन करून बाळाला या विश्वात आणते. आणि या जगात जगताना कसे जगायचे हे शिकवते. छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊन आधार देते. बाळ चुकत असेल तरी आईला रागवायचा हक्क आहे की ते लेकरू सरळ मार्गाने जाऊन यशाच्या चांगल्या मार्गानी स्वतःच्या पायावर उभं राहील.

 

               त्याच स्त्रीला मायमाउलीआईमाँ हे  वेगळे वेगळे शब्द वापरून हाक देऊन बोलवतात. म्हणतात ना प्रत्येकाची काळजी घ्यायला देवांनी आईला पाठवले. तीच सर्व सांभाळून घेतेआधार देतेकाय हवं काय नको सर्व बघतेएखादीवेळ रागावली आणि मार दिला तरी तो तिचा हक्क आहे. आई ही दिव्याची ज्योत आहे जी पूर्ण अंधकार नष्ट करून जग प्रकाशमान करते. आई आणि वडील हेच असे दोन व्यक्ती आहे जे तुमच्या सुखात आणि दुःखात नेहमी तुमची साथ देईल. आणि हेच दोघे प्रत्येक व्यक्तीचे पहिले शिक्षक आहे.

 

               सर्वाना आपल्या बासरीच्या सुरात मोहित करणाऱ्या कृष्णाला देवकी आणि वासुदेव या दोघांनी जन्म दिला पण पालनपोषण यशोदा आणि नंद महाराज यांनी केलं. जितक्या प्रेमानी देवकी आणि वासुदेव यांनी नऊ महिने कृष्णाचं कंसापासुन संरक्षण केलंतितक्याच प्रेमानी यशोदा आणि नंद महाराज यांनी स्वतःच्या अपत्यासारखंच  बाळकृष्णाचं संगोपन केलंत्यामुळे ते बाळ प्रेमानी मनानी स्वीकारलं की आपोआप मातृत्व येते. ती व्यक्ती ताईदादाबाबा,आजीआजोबामावशी कोणीपण असू शकते. ज्या व्यक्ती आपल्या प्रेमानीआनंदानी त्या बाळाचं संगोपन करत असेल ती एक आईच आहे. फक्त जन्म देणारीच आई नसते तर पालनपोषण करणारी सुद्धा व्यक्ती आई होऊ शकते. निस्वार्थ संगोपनाची भावना ठेवून आईची माया ती व्यक्ती देऊ शकते.

 

             हृदयात जपून ठेवणाऱ्यासंकटात धावून येणाऱ्याप्रेमाच्या अखंड सागरात सामावून घेणाऱ्यागुलाबाच्या फुलाच्या झाडासारखे जपणाऱ्यानिस्वार्थपणे काळजी घेणाऱ्यारागवेल तरी नाराज चेहरा न बघू शकणाऱ्या..... आणि प्रत्येक समस्येवर उपाय असणाऱ्यात्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात असलेल्या मातृत्वाला वंदन.......

 

                        प्रत्येक मातृत्व बाळगण्याऱ्या व्यक्तीला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा............


 

 

विठुमाऊली तू माऊली जगाची

माऊलीत मूर्ति विठ्ठलाचीविठ्ठला मायबापा




कोरोना विरुद्ध लढाई

  व्हायरस भारतात आला. सर्व शाळा महाविद्यालय १५ दिवस बंद ठेवण्याची सूचना मिळाली. सर्वानी आपल्या  आपल्या घराकडे वाट धरली. झटपटीने हा कोरोना व्हायरस पूर्ण जगात पसरला आणि एक संघर्ष सुरु झाला. या व्हायरस ची साखळी तुटावी यासाठी लॉकडाऊन सुद्धा करण्यात आले. या लॉकडाऊन मध्ये गरीबाची रोजची कमाई  गेली. खायला अन्न नाहीखिश्यात पैसे नाहीजीवन जगण्याला संघर्ष सुरु झालाभीतीच वातावरण तयार झालं. घरावर छत असणारे आनंदात एकत्र राहत पण ज्यांच्याकडे राहायला घर नाहीनोकरी गेल्यामुळे हातात पैसे नाहीधंदा बुडल्यामुळे हातात पैसे नाही अश्या लोकांचं जीवन जगण कठीण झालं. 

भारत हा लोकसंख्येमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारताची लोकसंख्या अंदाजे १३९ कोटी आहे.  झपाट्याने कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या वाढू लागली. तज्ञडॉक्टर्सनर्सेसपोलीससफाई कर्मचारी हे सर्व जनतेच्या संरक्षणासाठी लढत आहेतपण काही वाईट प्रवृत्तीचे लोक या संकटाचा दुरुपयोग करताना सुद्धा सापडलेअनेक घटना या प्रसार माध्यमाद्वारे बघायला मिळते आहेत. २०२० मध्ये सर्वात जास्त सप्टेंबर मध्ये रुग्ण आढळून आले त्यांनतर याची आकडेवारी कमी होऊ लागलीआणि लोकांची काळजी संपलीकमी आहे रुग्ण सर्व ठीक होईल असा समज सर्वांचा झाला. परंतु फेब्रुवारी २०२१ पासून आणखी रुग्ण वाढायला सुरुवात झालीअनेक प्रश्न उद्भवू लागलेलस घेतली तरी या व्हायरस ला लोक बळी पडले.

आजच्या काळात सर्वात जास्त कठीण परिस्थिती आहेना हॉस्पिटल मध्ये बेड मिळेना,ना औषध मिळेनाना राम्डेसिवीर इंजेकशन मिळेना......रुग्णाच्या नातेवाईकाची धडपड ना पोटात अन्नना हातात जीव वाचवायला साधन.... १ वर्ष उलटून गेल. हे वर्ष आर्थिकमानसिकशारीरिक दृष्टीने घातकच ठरले. इतकं जगात सुरु असताना आज पण लोकांना वाटे मला काही होणार नाही....मास्क न वापरणेसानिटीझर न वापरणेतब्येतीकडे दुर्लक्ष करणे अश्या काही कारणाने आपणच त्या रोगाला निमंत्रण देत अहो हे लक्षात घ्यायला पाहिजे.आज या सेवेत ज्या व्यक्तींचा जीव गेला त्यांना श्रद्धांजलीआणि आजपण जे हिम्मतीने कार्यरत आहेत त्यांचं कौतुक आहे.

ताज्या बातम्या प्रसारमाध्यमांद्वारे  लगेच आपल्याला कळून जाते. आपण या वर्षात काय काय शिकलो या प्रश्नच सर्व वेगळे वेगळे उत्तर देतील पण त्यातील काही सामान्य उत्तरे असतील. स्वतःची काळजी स्वतः घ्यावीशरीर सुदृढ हवं. प्रतिकारशक्ती मजबूत हवीव्यायाम आणि आहार हा शरीराची गरज आहेपरिस्थिती इतकी बेताची आहे की जवळपास प्रत्येक व्यक्तींनी आपल्या ओळखीच्या व्यक्तीला या महामारी मध्ये हरवलं असेल. त्यामुळे स्वतःसाठीघरच्यांसाठीलोकांसाठी मास्क वापरावे. सर्वाशी प्रेमाने वागा बोला. द्वेषमत्सरराग सर्व सोडून प्रेमानी आपल्या घराला सजवा..उद्या आपल्यासोबत कोण असेल कोण नाही हे आपल्याला नाही माहित.

 

कोरोना व्हायरस हे फक्त निमित्य आहेपण आजच्या काळात गुन्हेमारामारीबलात्कारद्वेषमत्सररागवादछळ असे अनेक निसर्गाविरोधात केलेल्या कृत्याची भरपाई आहे. "आता तरी सुधरा" हेच निसर्ग लोकांपर्यंत संदेश पोहचवत आहे. निसर्ग म्हणजेच देव देवाच्या विरोधात होणार कार्य विनाशाकडे जाणारच....

सुरक्षित राहा.....स्वतःला जपा....शरीर सुदृढ नसेल तर संपत्तीगाडीबंगला याला अर्थ नाही.....


भारत भूमी

 झेंडा आमुचा या भारत भूमीचा

शान बाण आणि मान आमुचा

फडकत राहील वरी महान

गर्व आम्हास त्या तिरंगाचा

झुकून करतो आम्ही प्रणाम याला

करतो आम्ही प्रणाम...

लढले  गांधीटिळकनेहरू,

लढले आमचे वीर जवान

सोबत आधार  देत लढली आपली जनता

या भारत मायेला अर्पण केले त्यानी आपले प्राण

करतो आम्ही प्रणाम यांना करतो आम्ही प्रणाम .....

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...