Wednesday, March 02, 2022

मैत्री

         मैत्रीचा उल्लेख हा अनेक शब्दात वाक्यात करू शकतो. पण माझ्या मते मैत्री हि दुधासारखी असावीदुधात पाणी टाकलं कि पाणी दुधाचं रूपे घेते पण दुधाला उष्णता दिली कि पाणी वाफेच्या रूपात दुधापासून वेगळं होते. म्हणजेच कितीपण कठोर क्षण आला तरी ती मैत्री कायम ठेवणारंतितक्याच विश्वासाने मन जिंकून घेणारं नातं म्हणजे मैत्री.

                    रंगात रंग मिसळवला कि नवीन रंग तयार होतो पण तो रंग आकर्षित असेलच असं नसतेतो नवीन तयार झालेला रंग हा त्या दोन रंगावर अवलंबून असतो. तसेच मैत्रीच्या नात्यात त्या दोन व्यक्तीवर अवलंबून असते की हे मैत्रीचं नातं  किती काळ टिकणारविश्वास त्या मैत्रीचा मूलभूत पाय असतो.

                 जीवनात बरेच मित्र मैत्रीण भेटतात पण त्यातले काहीच शेवटपर्यंत सोबतीला असतात. कठीण प्रसंगी जो मदतीला येईल त्या नात्याचा मनापासून आदर करत असतो. जीवाला जीव लावणारेखोट्या हास्याच्या मगच दुःख ओळखणारेफक्त कामापुरते नाही तर बाकी वेळ पण आपली आठवण काढणारेयोग्य दिशा दाखवणारे असे जिवलगीचे मित्रमैत्रिणी  भेटायला भाग्यच लागते.

                तुमच्याकडे ते देवांनी दिलेलं अमूल्य नातं असेल तर नक्कीच जपून ठेवा....इतक्या मोठ्या जगात इतके लोक आहे पण आपली भेट त्याच व्यक्तीशी होणे आणि ते फार काळपर्यंत टिकणे हा एक देवाचाच आशीर्वाद आहे. जीवनात भेटणारी प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवूनच जातेती चांगलीही असू शकते किंवा वाईट पण.....एक जीवन जगायचं मूलमंत्र नक्कीच शिकवून देईल..... 

पालक आणि बालक

                        आईवडील म्हणून जगताना आधी एक मित्र आणि मैत्रीण म्हणून जगावं लागतपण का असं तर मित्र आणि मैत्रीण म्हटलं कि आपल्याच वयाचे असतातत्याच डोकं सारखंच चालत आणि विचार सारखेच चालतात. आज जर आपला मुलगा किंवा मुलगी प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे येऊन सांगत असेल तर फारच उत्तम आहे. पाल्याला एक वळण लावण्यास मदत होईल. चांगली कामगिरी असेल त शाबासकी देता येईल किंवा चुकीचं घडल्या वळण लावता यतेची. पण तेच लेकरू घाबरत असेल तर ते काय सांगणारघरातच वादभांडणताणतणाव तर कोणत्या प्रकारे मनोवृद्धी होईलकिंवा काय शिकेल अजून घाबरेल तेमी नाही सांगत भीती वाटे मला असं मन होऊन जाईल आणि ते आपल्या वर्तुळाच्या बाहेर निघायचा प्रयत्न पण करणार नाही.

                    शिक्षण महत्त्वाचं आहेचत्यात एका दबावाखाली येऊन अभ्यास करीत भरपूर मार्क्स मिळवणारपरंतु फक्त अभ्यासच करणे हा त्यावरचा पर्याय नाही आहे. अभ्यास सोडून पण इतर भरपूर काही शिकण्यासारखे आहे. त्यामुळे मार्क्स वरून त्या विद्यार्थ्यांची किंमत लक्षात घेणे हे चुकीचं आहे. सर्वांच्या वेगळ्या उच्चआवडीनिवडी असतात. मार्क्स भरपूर आले कीअपेक्षा पण वाढते आपलं नाव मोठं करेल म्हणूनकरेल नक्कीच पण त्या अडखडलेल्या मनाचं काय जर कधी अपयश मिळालं तर .... चुकीचा विचार केला तर......

             साधं उत्तर आहेआपल्या पाल्याला एक मित्र आणि मैत्रीण म्हणून जवळ घ्याएक जीवन कस जगायचंजगातील बाहेरचे लोक वाईट दृष्टिकोनाचे असू शकतात.या काही गोष्टींबाबदल सांगा. आणि एक खरं जीवन जगणारा व्यक्ती बनवाहेच खूप मोलाचं आहे. लहानपणी तुम्ही हि शिकवण दिली तर तुमच्या म्हातारपणात तुम्हाला एकटं नाही सोडणार. फक्त गरज पुरविणे इतकच नसते हे प्रेमशिक्षण घेतलं मोठ्या नोकरीवर असून आईवडिलांसाठी  वेळ नसणाऱ्या लोंकाना किंमत नसते. 

             जग खूप मोठं आहे जगायचं असेल तर वाघासारखा जगायला शिकवा आणि मरण हे किड्यामुंगीसारखे नको आहे. रस्त्यावर जाताना पण पाटी असते  त्यावर लिहलं असते,'नजर हाती दुर्घटना घटी'. संगोपन हा प्रत्येकाच्या जीवनाचा खूप मोठा भाग आहे. म्हणतात ना 'जे पेराल तेच उगवेलम्हणजेच तुम्ही जशी शिकवण द्याल वळण द्याल तशीच वागणूक ही तुमच्या पाल्यामध्ये असेल.

 विचार करा आणि पटलं तर नक्कीच जीवनात या विचाराचे पालन करा.......

३३ कोटी देवतांची संकल्पना

 देव हा एकच आहे. देवांनी भिन्न रूप धारण करून एक वेगळं जग निर्माण केलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत ब्रह्मविष्णूशिवशक्ती आणि गणपती या देवांना पंचदेवता मानले जातात. ब्रह्मदेवांनी संपूर्ण सृष्टी निर्माण केली आणि श्रीविष्णू हे सृष्टीचे पालनहार आहेत असे मानले जाते. महादेव शिवशंकर हे सृष्टिच्या लय तत्त्वाचे स्वामी मानले जातात. शक्ती हे देवीचे स्वरुप मानले गेले आहे. गणपती हे मूळ स्वरुप मानले गेले आहे.

गायीच्या पोटात ३३ कोटी देवतांचा वास असतो असे मानले जाते. ३३ कोटी देवता ही संकल्पना आहे. ३३ कोटी ही देवतांची संख्या नाही. संस्कृतमध्ये कोटी ' या शब्दाचा अर्थ प्रकार ' आहेम्हणून ३३ कोटी देवता नसून देवता या ३३ प्रकारच्या आहेत.

त्या ३३ देवता कोणत्या ते बघूया

सृष्टीचे व्यवस्थापन करणे हे या ३३ कोटी देवतांकडे असते असे मानले जाते. या ३३ कोटी देवतांमध्ये ८ वसू११ रुद्र१२ आदित्य१ इंद्र१ प्रजापती यांचा समावेश आहे. प्रत्येक देवतांचे कार्य हे वेगळे असल्यामुळे त्यांना कोटी असे म्हटले जाते.

  • ८ वसू   -  आपधृवसोमधरअनिलअनलप्रत्यूष आणि प्रभास                                                                               ( जलतारेचंद्रपृथ्वीवायूअग्नीसूर्यआकाश )
  • ११ रुद्र  -  मनुमन्युमहतशिवऋतुध्वजमहीनसउम्रतेरसकालवामदेवभव आणि धृत-ध्वज.                           
  • १२ आदित्य   - अंशुमानअर्यमनइंद्रत्वष्टाधानूपर्जन्यपूषनभगमित्रवरूणवैवस्वत व विष्णू      

                        सूर्याला आदित्य पण म्हटले जाते. भारतीय दिनदर्शिका सूर्य आधारित बनवलेली असते. एक वर्षात १२ महिने असतात. त्याच १२ महिन्यांना आदित्य म्हणून संबोधले जाते.                                                                                                                                                

  • १ इंद्र 
  • १ प्रजापती 

असे पूर्ण मिळून ३३ प्रकारचे देवता संपूर्ण सृष्टीला जीवनदान प्रदान करतात. ३३ देवतांचे देवता हे साक्षात देवांचे देव महादेव आहे. 

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...