आज लोक म्हणतात माझं मोठं घर आहे,त्यासमोर बगीचा आहे,मोठी जागा आहे,पण त्यात राहणारे किती लोक आहेत याबद्दल कोणी बोलत नाही. चार भिंती आणि त्यावर असणारा छत म्हणजे एक वास्तू झाली.पण तिथे राहण्यारा लोकांमुळे त्या घराला घरपण येते हे सर्वीकडे आपण ऐकतो. खूप पैसे लावून घराला बांधतात एकदम नटून थाटून तयार करतात. नवीन महागडी वस्तू घेतात घर सजवायला पण खरंच हे सर्व महत्त्वाचं आहे का ?
लिखाण हे एक संवादाचे साधन आहे. प्रत्येकाला आपलं जीवन कस जगायचं याच स्वातंत्र्य आहे. आपला देश जसा आधुनिक प्रगती करत आहे तसंच मानवाचे विचार पण आधुनिक गोष्टीकडे वळत आहे, या जगासोबत चालता चालता मूळ तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. आजच्या काळाची गरज बघून मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे. एकापण व्यक्तीला या तत्त्वाचे महत्त्व पटले तरी मला आनंद आहे.
Friday, February 25, 2022
घर
Sunday, February 20, 2022
संघर्ष
संघर्ष हा असा शब्द आहे ज्यात माणूस आपली पूर्ण मेहनत त्या ध्येयाकडे पोहचण्यात लावते . तो संघर्ष करताना माणसाला दुखापत होते वेदना होतात पण शेवट हा एक महत्त्वाचा भाग असतो. एक लहान बाळ सुरुवातीला हालचाल करायला लागते त्यांनतर ते पलटायला शिकते .काही दिवसांनी रंगायला सुरुवात करते आणि मग आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकते.आता यात काय होते कि जेव्हा प्रत्येक एक पाऊल बाळाचं संघर्षच असते, म्हणजेच हात पाय चा नियंत्रण समजायला लागले कि एक संघर्ष चालू होतो त्याला अजून कायकाय करता येईल.आपले शरीराचे अंग कसे हलवता येईल याचा संघर्ष करता करता ते बाळ चालायला शिकते पण तेव्हा बाळाला आधार असतो. तो आधार देतो पण संघर्ष हा बाळालाच करावा लागतो.
असच अगदी पूर्ण मानवी जीवनात अनुभवायला मिळते. प्रत्येक दिवसाला एक संघर्ष असतो पण त्यात फक्त बसून राहायचं कि त्या गोष्टीला सामना करायचं हे त्या व्यक्तीवर असते. धडपडण्याऱ्या कार्यातच यशाचा आनंद असतो. जितकी जास्त मेहनत बुद्धी वापरली तिथेच त्याचे यशामध्ये रूपांतर होते.
Sunday, February 06, 2022
स्वातंत्र्य
स्वातंत्र्य हा शब्द कानी आला की लगेच 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला, हेच वाक्य गुणगुणत असते. आपल्याला त्याच दिवशी स्वातंत्र्य मिळालं आणि गर्वानी आपल्या देशाचा मान तिरंगा फडकवतो. पण नेमकं स्वातंत्र्य म्हणजे काय? या प्रश्नाची अनेक उत्तर येतील, स्वातंत्र्य म्हणजे आपण आपल्या मनासारखं वागू शकू आपल्याला हवं ते करू शकू, जिथे जायचं आहे तिथे जाऊ शकू पण खरं स्वातंत्र्य म्हणजे ज्या थोर व्यक्तींनी आज आपला बलाढ्य भारत बनवण्यास सहकार्य केले, त्रास सहन करून पण हार नाही मानली त्यांना मनात प्रेरणास्थान ठेवून आजच्या भारतात एक जबाबदार नागरिक, एक चांगला व्यक्ती बनून राहणे हे प्रत्येक व्यक्तीच आपल्या जन्मभूमीसाठीच कर्तव्य आहे. थोर व्यक्ती काही मूळ तत्त्वावर जीवन जगतात. थोर व्यक्ती वेळ मिळत नाही अशी तक्रार करत नाही, जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत जिद्द चिकाटी आणि आवड या तत्त्वाची गरज असते.
त्यामुळे स्वातंत्र्य म्हणजे एक विश्वास, एक इच्छा, एक आवड , माणुसकी आणि एक कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी आहे. सर्व आपल्याच मनासारखं घडावं हे गृहीत धरणे बरोबर नाही पण त्यात सर्वांना घेऊन चालण्याला अर्थ आहे, एक कार्य पण खूप काही शिकवून देते त्यामुळे याचा खरा अर्थ समजून जीवन जगण्यातच आनंद आहे.
चांदणी
निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...
-
काल ९ ऑक्टोबर रोजी श्री रतन नवल टाटा सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी साधारण मध्यरात्री प्रसारित माध्यमातुन कळाली. जणूकाह...
-
आनंदाने जीवन जगण्याची इच्छा बाळगत आईबाबांनी एका मुलीला जन्म दिला. फक्त आईबाबाच नाही तर पूर्ण परिवार आनंदाने न्हाहून निघाले....