Sunday, April 13, 2025

लहानपण देगा देवा

            या वयात आलेल्या आयुष्यात, नोकरीच्या दगदगित वाटत लहान असताना सर्व किती छान होत... ना कसल बंधन ना ताणतणाव.... फक्त मनसोक्त आनंद.

          व्यक्ती जसा जसा मोठा होतो तसा त्याच्या मेंदूचा विकास होतो. मेंदूच्या विकासासहीत विचार करण्याची क्षमताही वाढत असते. लहान असताना संपूर्ण जग हे एका बागे सारखं वाटतं, सुंदर फुले, हिरवेगार झाडे, खेळण्यासाठी अनेक झूले इत्यादी. प्रत्येक व्यक्ती हा चांगला आहे अस वाटते. अभ्यास, शिक्षण, शाळा, आणि खेळ या व्यतिरिक्त मनात काहीही नसते. ते म्हणतात ना मुले ही देवाघरची फुले.

              सर्वांना आपलंसं करून टाकणारी, मनात कुठलाही द्वेष न ठेवणारी, सर्वांचं मनापासून एकणारी गोंडस मुले. आणि आज तीच मुले मोठे होत असताना विचार करतात.... लहानपणी सर्व चांगलच वाटत का तर आपल्यात ती समज नसते. एकदा समज आली की  समोरील व्यक्ती आपल्यासाठी धोकादायक असू शकते हे समजते...आज सतत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या बातम्या कानी एकु येतात आणि मन सुन्न होतं, कदाचित या सर्व गोष्टी आपण लहान होतो तेव्हा पण होतच असतील पण त्या गोष्टीचा सुगावा लागायचा नाही म्हणूनच जग हे बागेसारख वाटायचं पण आता कळलं जितकं सर्व छान दिसते ते नसते म्हणजेच दिसते तस नसते.

लहानपण परत येणं तर अशक्यच आहे पण आपल्यातलं लहानपण आपणच जपून ठेवायला हवं.

Sunday, March 02, 2025

अश्रू

कधी कधी मनमोकळेपणाने रडावे
मनातल्या वेदना अश्रू वाटे बाहेर पडावे

रडणं ही कमकुवत मनाची निशाणी नसून
भावनांना  फुटलेला पाझर असावा

नदीचं पाणी संथगतीने वाहते तसच
डोळ्यातलं पाणी हे टपोऱ्या पावसाचे थेंब जणू

मनाला दिलासा मिळाला तरीही
पाणावलेले डोळे खुप काही सांगतात

Sunday, December 01, 2024

Sunday, November 24, 2024

वय आणि समजूतदारपणा

                 समाजाचा परिणाम हा व्यक्तिमत्व विकासावर होतो. लहानपणापासून वयात येत पर्यंत सभोवताल घडणाऱ्या घटनांचा परिणाम हा त्या व्यक्तीच्या विकासावर परिणाम करत असतो. प्रत्येक गोष्ट समजण्यासाठी ती वेळ यावी लागते. 

                   कानांनी एकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की स्वतः बघितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा हा प्रश्न नवा नव्हेच. प्रत्येक गोष्ट आपल्याला त्याच वयात कळेल अस होत नाही. वयात आल्यावर ती गोष्ट आपोआप आत्मसात केल्या जाते, त्यासाठी सल्ल्याची गरज भासत नसते. जेव्हा व्यक्तीला परिपक्वता येते तेव्हा समज येते, काही गोष्टीबद्दलचा समज हा बदलू शकतो. आपण भूतकाळात विचार केला तो चुकीचा होता हे सुद्धा प्राप्त होऊ शकते.

                आजच्या काळात विचारांने समृद्ध असणे फार गरजेचे आहे. योग्य समज येणे ही काळाची गरज आहे. भूतकाळात आपले काही विचार असतील पण त्याच मुद्द्यांवर आता वर्तमानकाळात वेगळे विचार असू शकतात. काळानुसार बदल हा निसर्गाचा नियमच आहे.


Sunday, November 17, 2024

असच काही

           नात्यामधले वाद हे अमावस्याच्या रात्री सारखे असतात. अमावस्येला सगळीकडे काळोख अंधार असतो. रोज आसमंत प्रकाशित करणारा चंद्र दिसत नसतो. अमावस्या संपली की हळू हळू चंद्राचं नवीन रूप पाहायला मिळते. दररोज चंद्र कलेनी वाढत जातो आणि मन ओढून घेणारी पौर्णिमेची रात्र येते. पौर्णिमेचा चंद्र बघून मनाला शांत वाटते. कवीच्या मनात घर करतो. 

           अश्याचप्रकारे मैत्रीमध्ये वाद झाले की मन उदास होते पण प्रेमापोटी वाद विसरून एकत्र येणे हे पौर्णिमेच्या रात्री सारखे असते. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे नात्यामध्ये एक वेगळं तेज निर्माण होते आणि रागावणाऱ्या चेहऱ्यावर आनंदाचे बोल असतात अशीच ही वळण त्या मैत्रीला पुन्हा घट्ट करून जातात.

आश्चर्यांनी भरलेले आयुष्य ✨

               आयुष्य म्हणजे काय याचा खरा अर्थ हा मोठे झाल्यावर कळत असतो. मोठे होता होता लहानपण किती भारी होत याचा अनुभव येतो. उठायचं, शाळेल...