या वयात आलेल्या आयुष्यात, नोकरीच्या दगदगित वाटत लहान असताना सर्व किती छान होत... ना कसल बंधन ना ताणतणाव.... फक्त मनसोक्त आनंद.
व्यक्ती जसा जसा मोठा होतो तसा त्याच्या मेंदूचा विकास होतो. मेंदूच्या विकासासहीत विचार करण्याची क्षमताही वाढत असते. लहान असताना संपूर्ण जग हे एका बागे सारखं वाटतं, सुंदर फुले, हिरवेगार झाडे, खेळण्यासाठी अनेक झूले इत्यादी. प्रत्येक व्यक्ती हा चांगला आहे अस वाटते. अभ्यास, शिक्षण, शाळा, आणि खेळ या व्यतिरिक्त मनात काहीही नसते. ते म्हणतात ना मुले ही देवाघरची फुले.
सर्वांना आपलंसं करून टाकणारी, मनात कुठलाही द्वेष न ठेवणारी, सर्वांचं मनापासून एकणारी गोंडस मुले. आणि आज तीच मुले मोठे होत असताना विचार करतात.... लहानपणी सर्व चांगलच वाटत का तर आपल्यात ती समज नसते. एकदा समज आली की समोरील व्यक्ती आपल्यासाठी धोकादायक असू शकते हे समजते...आज सतत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या बातम्या कानी एकु येतात आणि मन सुन्न होतं, कदाचित या सर्व गोष्टी आपण लहान होतो तेव्हा पण होतच असतील पण त्या गोष्टीचा सुगावा लागायचा नाही म्हणूनच जग हे बागेसारख वाटायचं पण आता कळलं जितकं सर्व छान दिसते ते नसते म्हणजेच दिसते तस नसते.
लहानपण परत येणं तर अशक्यच आहे पण आपल्यातलं लहानपण आपणच जपून ठेवायला हवं.
No comments:
Post a Comment