Monday, October 02, 2023

माझी चित्रकला भाग ६


श्री कृष्ण जन्म 

लाल किल्ला दिल्ली




Saturday, September 23, 2023

एक वेगळा उपक्रम

                      रूमची स्वच्छता 🧹मोहीम राबवून एक मोकळा श्वास घेतला आणि समोरच्या टेबल वर ठेवलेल्या वर्तमानपत्रावर नजर गेली. इतकी नजर जाण्यासारख काय होत त्यात  तर चक्क गणपती बाप्पाचं चित्र होत. लगेच उठून कात्रीने त्या गणपतीच्या चित्राला पेपर पासून वेगळं केलं. इतकं गोड चित्र समोर जाऊन कचऱ्यात गेल असतं, या विचाराने मनात खंत वाटू लागली.

                     आपल्याकडे घरोघरी सकाळी वर्तमानपत्र 📰वाचण्याची सवय असते. ठळक बातम्या, चालू घडामोडी माहिती करण्याच उत्तम साधन म्हणजे वर्तमानपत्र. पण तेच वर्तमानपत्र वाचून झाल्यावर अनेक मार्गी लागतो किंवा ते रद्दीत विकले जातात. म्हणजेच शेवटी वर्तमानपत्राचा एक कचराच होणार असतो पण मग आपल्या देवी देवतांचे चित्र त्या वर्तमानपत्रात समाविष्ट करणे किती चुकीचे आहे. फक्त वर्तमानपत्र नाही तर दिनदर्शिका, लग्नाच्या पत्रिका, फटाके, बॅनर, कपड्यावर चित्र किंवा पिशवीवर देवी देवतांचे चित्र असणे फार चुकीचे आहे. आपल्या धर्मात देवी देवतांचे महत्त्व सर्वांना माहीत आहे. आपल्या धर्मात अनेक देवी देवता आहेत आणि जर प्रत्येक सणाला प्रत्येक देवीदेवता यांचे चित्र साध्या साध्या गोष्टीमद्धे समाविष्ट करण्यात येत असतील तर हा देवाचा अपमान आहे. 

                        प्रत्येक व्यक्तीने थोडा जीवनात वेगळा मार्ग निवडला तरी ते आनंदाचे असेल. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, वर्तमानपत्र वापरताना एकदा नक्की बघा की त्यात आपले देवी देवतांचे छायाचित्र तर नाही ना असेलतर लगेच तो भाग काढून वेगळा ठेवावा, लग्नाच्या पत्रिकेत आपण देवाचे नाव लिहितोच आणि देव सर्व भक्तांना समजतो आणि तो नेहमी आपल्याला आशिर्वाद देतच असतो त्यामुळे देवाच्या चित्र ऐवजी वेगळी डिझाईन प्रिंट करा कारण वर्षभर जमा होण्याऱ्या पत्रिका आपण रद्दीतच देत असतो म्हणजे हा एक देवाचा अपमान झाला. 

                      माझ्या मते देवाचे स्थान हे फक्त  मंदिर🛕 आणि आपलं हृदय💗 आहे. आता विचार कराल, मंदिराबाहेर दुकान असतात त्यात तर किती देवाच्या मूर्ती, फोटो असतात. ते तर असणारच ना, जर भक्ताला देवाला आपल्या घरच्या मंदिरात स्थापना करायची असेल तर ती मूर्ती विकत घ्यावी लागेल. व्यवसायधारकानी जर या गोष्टीला महत्त्व दिले आणि देवांचे छायाचित्र छापणे बंद केले तर हे अति उत्तम असेल. 

आज मी हा प्रसंग अनुभवला आणि माझी चूक मला कळाली. ही चूक तुमच्या हातून होवू नये यासाठी मी हा लेख  लिहिते 🖊आहे.  आयुष्यात लहान लहान बदल केले तरी जीवन जगण्याचा मार्ग बदलतो. 😊




गणपतीचे मनमोहक चित्र 

Tuesday, September 19, 2023

इच्छा तिथे मार्ग

                      काही गोष्टींचा विचार आपल्या मनात संचारत असतो आणि ती गोष्ट करायची आपली खूप मनापासून इच्छा असते परंतु काही कारणास्तव ती होणार नाही किवा वेळ नाही यामुळे आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही. माझ्यासोबत होत अस कधी कधी. पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग तसच काही झाल आणि देवाच्या इच्छेने माझी इच्छा पूर्ण झालीच, देवाने कार्य माझ्या हातून केले असले तरीही करविता देवच आहे. 

                      वर्षातून एकदा देव बाप्पा म्हणजेच आपले गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होतात, सर्व भक्त उत्साहाने गणपती बाप्पाचे आगमन करतात. गणपती उत्सव जवळ येताच मला पण विचार आला की आपण पण देव बाप्पाच्या स्वतःच्या हाताने घडवलेल्या मूर्तीचे  पूजन करावे. पण आगमनाच्या काही दिवस आधी मला मूर्ती बनवणे शक्य झाले नाही. मनात इच्छा तर होतीच पण आता वेळेवर कस काय होणार म्हणून  आपण नेहमीसारखी पूजा करावी पण देवाला वाटले असेल हिला प्रोत्साहन द्याव म्हणजे बरोबर ही करेल आणि तसच झाल मला ते  मिळाल आणि लगेच मूर्ती बनवायला लागली. एकीकडे बाप्पाचे भजन कानी येत होते आणि एकीकडे हाताने मूर्तीला आकार द्याला सुरुवात केली. संध्याकाळचे २ तास कसे निघून गेले कळले नाही. इतक्या कमीवेळेत मूर्ती तयार करणे सोपे नव्हते परंतु मनात इच्छा होती श्री गणेश चतुर्थी ला स्वतः ने बनवलेल्या मूर्तीची पूजा करायचीच आणि हे सर्व घडून फक्त देवाच्या आशीर्वादाने😊. 


तू सुखकर्ता तू  दुःखहर्ता 

तूच कर्ता आणि करविता 

मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया  


सर्वाना  श्री गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा 😊


#गणेशोत्सव २०२३



Thursday, July 27, 2023

पाऊसधारा

सूर्यास्ताची वेळ होती, सूर्य नजरेतून हळूवार पणे अंधाराची चाहूल लावून मावळला आणि विजेच्या लखलखीत प्रकाशाने आभाळ दाटून गेलं. बघता बघता मुसळधार पावसाला सुरुवात झाली, एकीकडे गर्जना करत, प्रकाशित विजेचा कडाडणारा आवाज आणि दुसरीकडे लोखंडाच्या टिनावर पडलेल्या टपोऱ्या पावसाचे थेंब यांचे आवाज कानी पडत राहिले, तितक्यात विजेचा दिवा बंद झाला आणि मेणबत्तीची आठवण आली, छोट्याश्या एका ज्योतीने पूर्ण खोलीभर प्रकाश पसरवला. उजेड तर मिळाला पण पावसाचे काय, खिडकीवाटे बाहेर डोकावून पाहले तर समोरची इमारत दिसेनाशी झाली, नजरेस सर्व अस्पष्ट दिसू लागले.

खिडकी जवळ खुर्चीवर बसून थंड हवेचा आस्वाद घेण्यात माझे मन रमले होते, तितक्यात मनात विचार आला, इतका हा असा मुसळधार पाऊस दिवसा आला तर घराबाहेर पडणं सुद्धां अशक्य होईल, सर्वांचं काम ठप्प होईल पण कदाचित पावसाला आपण कधी धरणी वर जोरदार वर्षाव करावा हे ठाऊक असेल, पण आपल तर बर आहे राहायला जागा आहे पण ज्यांना राहायला जागा नाही ते या परिस्थितीला कशी मात देत असतील हे अवघडच आहे.

पूर्ण रात्र पावसाचे थैमान सुरू होते, मुसळधार पाऊस आणि विजा. अचानक पहाटे ५ ला जाग आली आणि बघते तर पाऊस सुरूच आणि विजा सुद्धा सुरू होत्या. वातावरणात उजेड पसरू लागला आणि ऊन सुद्धा निघालं. यावर्षीच्या पावसाळयात पहिल्यांदाच असा पावसाचा अनुभव घेतला.

काही गोष्टी अश्या असतात ज्या प्रत्येकवेळी कामी येणारच अस नाही पण जेव्हा त्याची गरज पडते ती आपल्यासोबत असणे हे आपल्यासाठी महत्त्वाचे असते जसे की मेणबत्ती. निसर्गाशी कधीच खेळ करू नये. हवा, पाणी, वीज आणि अग्नी याची ताकत असामान्य आहे. आधीचा दिवस कितीही कठोर, संघर्षमय गेला तरी येणारा दिवस नवीन संधी निर्माण करून आयुष्याचा आनंद देतो.

पाऊस पाहिला की तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा.

Saturday, July 08, 2023

व्यक्त व्हायला शिका

                          जेव्हापासून मी माझे ब्लॉग लिहिणे सुरू केले तेव्हापासून एखादी मनात विचार आला किवा एखाद्या गोष्टीची मनात कायम चर्चा सुरू असली की माझा हात लॅपटॉपकडे जातो आणि त्यात ब्लॉगवर पटापट शब्द लिहायला लागते. माझ्या मते लिखाण हे आपले विचार मांडण्याचे प्रखर माध्यम आहे, असही होऊ शकते आपण जो विचार करत आहोत तोच विचार दूसरा व्यक्ती सुद्धा करू शकतोच.

                         समाधानी असणे हा जीवनाचा मी मूलमंत्र मानते. पण प्रत्येकच प्रसंगाला आपण समाधानी राहुच अस होत नाही. आपण कधी हसतो, कधी रडतो, कधी रूसतो, कधी रागात असतो तसेच कधी कधी मन समाधानी नसते. आणि यात काही वेगळ नाहीच हे साहजिक आहे. 

                        आपल्याला माहीत आहे आपल्या आयुष्यात सर्व छान चाललंय तरीही आपण कुठेतरी कमी पडतो आहो याचा विचार सुद्धा येतो, अजून काय करायला हवे, आपण स्वावलंबी झालो आहोत, महिन्याच्या शेवटी कामाचा मोबदला मिळतो, कामा व्यतिरिक्त आपण स्वतःच्या आवडी निवडी जपत आहोत, गरजेच्या वस्तु मिळत आहेत, सर्व काही असून पण कुठे तरी कमीपणा भासतो. जसा वाघ शिकार मिळवण्यासाठी धडपडत असतो तसा जीवनाकडे एका स्पर्धेप्रमाणे पाहल्यास आपल अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड आवश्यक असते.

प्रत्येकाच जीवन सारख नसलं तरीही त्यात मात्र साम्य असतेच.. कोणाला लवकर यश पदरी येत कोणाला उशिरा, कोणाला लवकर प्रगल्भता लाभते कोणाला उशिरा त्यामुळे कोणी समोर नसते कोणी मागे नसते सर्व आपल्या वेळेप्रमाणे आपल जीवन जगत असतात.

आश्चर्यांनी भरलेले आयुष्य ✨

               आयुष्य म्हणजे काय याचा खरा अर्थ हा मोठे झाल्यावर कळत असतो. मोठे होता होता लहानपण किती भारी होत याचा अनुभव येतो. उठायचं, शाळेल...