लिखाण हे एक संवादाचे साधन आहे. प्रत्येकाला आपलं जीवन कस जगायचं याच स्वातंत्र्य आहे. आपला देश जसा आधुनिक प्रगती करत आहे तसंच मानवाचे विचार पण आधुनिक गोष्टीकडे वळत आहे, या जगासोबत चालता चालता मूळ तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. आजच्या काळाची गरज बघून मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे. एकापण व्यक्तीला या तत्त्वाचे महत्त्व पटले तरी मला आनंद आहे.
Monday, October 02, 2023
Saturday, September 23, 2023
एक वेगळा उपक्रम
| गणपतीचे मनमोहक चित्र |
Tuesday, September 19, 2023
इच्छा तिथे मार्ग
काही गोष्टींचा विचार आपल्या मनात संचारत असतो आणि ती गोष्ट करायची आपली खूप मनापासून इच्छा असते परंतु काही कारणास्तव ती होणार नाही किवा वेळ नाही यामुळे आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही. माझ्यासोबत होत अस कधी कधी. पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग तसच काही झाल आणि देवाच्या इच्छेने माझी इच्छा पूर्ण झालीच, देवाने कार्य माझ्या हातून केले असले तरीही करविता देवच आहे.
वर्षातून एकदा देव बाप्पा म्हणजेच आपले गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होतात, सर्व भक्त उत्साहाने गणपती बाप्पाचे आगमन करतात. गणपती उत्सव जवळ येताच मला पण विचार आला की आपण पण देव बाप्पाच्या स्वतःच्या हाताने घडवलेल्या मूर्तीचे पूजन करावे. पण आगमनाच्या काही दिवस आधी मला मूर्ती बनवणे शक्य झाले नाही. मनात इच्छा तर होतीच पण आता वेळेवर कस काय होणार म्हणून आपण नेहमीसारखी पूजा करावी पण देवाला वाटले असेल हिला प्रोत्साहन द्याव म्हणजे बरोबर ही करेल आणि तसच झाल मला ते मिळाल आणि लगेच मूर्ती बनवायला लागली. एकीकडे बाप्पाचे भजन कानी येत होते आणि एकीकडे हाताने मूर्तीला आकार द्याला सुरुवात केली. संध्याकाळचे २ तास कसे निघून गेले कळले नाही. इतक्या कमीवेळेत मूर्ती तयार करणे सोपे नव्हते परंतु मनात इच्छा होती श्री गणेश चतुर्थी ला स्वतः ने बनवलेल्या मूर्तीची पूजा करायचीच आणि हे सर्व घडून फक्त देवाच्या आशीर्वादाने😊.
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
तूच कर्ता आणि करविता
मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया
सर्वाना श्री गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा 😊
Thursday, July 27, 2023
पाऊसधारा
Saturday, July 08, 2023
व्यक्त व्हायला शिका
जेव्हापासून मी माझे ब्लॉग लिहिणे सुरू केले तेव्हापासून एखादी मनात विचार आला किवा एखाद्या गोष्टीची मनात कायम चर्चा सुरू असली की माझा हात लॅपटॉपकडे जातो आणि त्यात ब्लॉगवर पटापट शब्द लिहायला लागते. माझ्या मते लिखाण हे आपले विचार मांडण्याचे प्रखर माध्यम आहे, असही होऊ शकते आपण जो विचार करत आहोत तोच विचार दूसरा व्यक्ती सुद्धा करू शकतोच.
समाधानी असणे हा जीवनाचा मी मूलमंत्र मानते. पण प्रत्येकच प्रसंगाला आपण समाधानी राहुच अस होत नाही. आपण कधी हसतो, कधी रडतो, कधी रूसतो, कधी रागात असतो तसेच कधी कधी मन समाधानी नसते. आणि यात काही वेगळ नाहीच हे साहजिक आहे.
आपल्याला माहीत आहे आपल्या आयुष्यात सर्व छान चाललंय तरीही आपण कुठेतरी कमी पडतो आहो याचा विचार सुद्धा येतो, अजून काय करायला हवे, आपण स्वावलंबी झालो आहोत, महिन्याच्या शेवटी कामाचा मोबदला मिळतो, कामा व्यतिरिक्त आपण स्वतःच्या आवडी निवडी जपत आहोत, गरजेच्या वस्तु मिळत आहेत, सर्व काही असून पण कुठे तरी कमीपणा भासतो. जसा वाघ शिकार मिळवण्यासाठी धडपडत असतो तसा जीवनाकडे एका स्पर्धेप्रमाणे पाहल्यास आपल अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड आवश्यक असते.
प्रत्येकाच जीवन सारख नसलं तरीही त्यात मात्र साम्य असतेच.. कोणाला लवकर यश पदरी येत कोणाला उशिरा, कोणाला लवकर प्रगल्भता लाभते कोणाला उशिरा त्यामुळे कोणी समोर नसते कोणी मागे नसते सर्व आपल्या वेळेप्रमाणे आपल जीवन जगत असतात.
आश्चर्यांनी भरलेले आयुष्य ✨
आयुष्य म्हणजे काय याचा खरा अर्थ हा मोठे झाल्यावर कळत असतो. मोठे होता होता लहानपण किती भारी होत याचा अनुभव येतो. उठायचं, शाळेल...
-
काल ९ ऑक्टोबर रोजी श्री रतन नवल टाटा सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी साधारण मध्यरात्री प्रसारित माध्यमातुन कळाली. जणूकाह...
-
आनंदाने जीवन जगण्याची इच्छा बाळगत आईबाबांनी एका मुलीला जन्म दिला. फक्त आईबाबाच नाही तर पूर्ण परिवार आनंदाने न्हाहून निघाले....


