Tuesday, May 21, 2024

निःशब्द

                आजच्या काळात ताण तणाव वाढत चाललेला दिसतो.  दररोजच्या चालू घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावली, त्या बातम्या वाचता वाचता मन दुखत, प्रत्येक दिवसाला बातम्यांमध्ये अत्याचार, बलात्कार, सामूहिक बलात्कार, खून प्रकरण, जंगली प्राण्यांचा हल्ला, दुर्घटना, अपघात इत्यादी प्रकारच्या बातम्या वाचायला मिळतात. हे असं सर्व वाचून मन खूप दुखावलं जातं,  देवाने इतक्या सुंदर सृष्टीची निर्मिती केली आणि आजचा माणूस खरचं माणसाप्रमाणे वागत आहे का ?

                 लोकांची मानसिकता माणसाप्रमाणे का राहिली नाही ? हे सर्व पाप करून काय सिद्ध करतात ? या चुकीच्या गोष्टी करून काय समाधान मिळते ?  निसर्गाचा, माणुसकीचा का विनाश करू पाहत आहे ?

               हे सर्व प्रश्न रोजच पडतात. लोकसंख्या जास्त, वेगळे विचार असणाऱ्या लोकांची संख्या जास्त, इतक्या लोकसंख्येला नियंत्रित करणं साधं सोपं नाही पण अस्या घटना देशाला काळीमा फासतात, गुन्हेगाराला त्याच्या चुकीची शिक्षा मिळत नसेल तर ही खरचं न्यायव्यवस्थेची लाजेची गोष्ट आहे.

            मणिपूर दंगे, लडाख आंदोलन, बिल्कीस बानो केस, प्रज्वल रेवांना केस, नुकतच पुणे मध्ये अपघात झाल्याचं प्रकरण, गुन्हेगाराला शिक्षा मध्ये काय तर निबंध ? खरचं २ निष्पाप जीवाची हत्या केलेल्या गुन्हेगार पैसे वाल्याचा मुलगा म्हणून त्यात शिक्षा म्हणून निबंध, वा रे वा कमालच झाली. घाटकोपर इथे होर्डींग पडल्यामुळे मृत पावलेल्या कुटुंबांनी काय करायचं ? आणि त्यांच्या जीवाची किंमत किती तर ५ लाख, वा रे वा सरकार ,  स्वप्नील लोणकरची आत्महत्या, निर्भया कांड, डॉक्टर च्या निष्काळजीमुळे मृत्यू.

           हेच दिवस बघण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस भारताचे संविधान लिहिण्यात वेळ दिला ?
हे काही मोजकेच मुद्दे असे दररोज कितीतरी भयानक गोष्टी घडत आहेत. आणि सामान्य जनतेचे हाल होत आहेत.

             लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांची व लोकांसाठी चालवलेली राज्यव्यवस्था म्हणजे लोकशाही. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे फक्त देशाचे नोकर आहे, जनतेचे सेवक आहे. पण काही माज असलेल्यांना वाटते की आपल्यापुढे मोठे कोणीच नाही, जनतेचे सेवक आहे तर सेवक पण काम करावे, पण तसं नाही जमणार ना, आधी स्वतःच्या घरात पैसे कसे येतील याचा विचार हे माजलेले लोक करतात. खालच्या पातळीपासून ते वरच्या पातळीपर्यंत सर्व भ्रष्टाचारी असल्यावर सामान्य जनतेच्या समस्या कोण सोडविणार ? 

            जर सरकारी नोकर बनण्यासाठी उच्चशिक्षित/ शिक्षित विद्यार्थांना ३ ते ४ परीक्षा द्याव्या लागतात तर जनतेचे सेवक म्हणवून घेणाऱ्या लोकप्रिनिधीसाठी  परीक्षा का नाही ? सगळी मर मर सामान्य कुटुंबातील तरुणांनी/ तरुणींनी करायची का ? सामान्य कुटुंबातून येऊन सरकार चालवायचं, गुन्हेगार नोंद असताना पक्षात प्रवेश करून करोडोची संपत्ती जमा करून आलिशान बंगले, आलिशान गाड्या घ्यायच्या आणि मिरवायच्या ,श्रीमंत अजून श्रीमंत होत आहे आणि गरीब अजून गरीब होत आहे. 

           लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ कोण पत्रकार, पत्रकारितेची पातळी इतकी खाली घसरली आहे की देशातले ठळक मुद्दे सोडून हिंदु मुस्लिम, आणि फालतू बातम्या दाखवीत असतात. नवीन बातम्या बघण्यासाठी आणि त्या गोष्टीची पूर्ण पडताळणी माहीत करण्यासाठी यूट्यूबर्स ची मदत घ्यावी लागते ही शोकांतिका आहे.

                      आपण समस्येकडे नाही तर उपायाकडे बघितले पाहिजे. वरील सर्व मुद्दे लक्षात घेता फक्त देशाला एकाच गोष्टीची गरज आहे ती म्हणजे प्रामाणिकता. देशातल्या प्रत्येक नागरिकाने आपले काम प्रामाणिकरित्या देशाच्या कल्याणासाठी केल्यास आपला देश समृद्ध होण्याच्या मार्गास लागेल.

Saturday, May 18, 2024

स्वभावाच्या लहरी

          एक दिवस असा येतो सकाळी उठायची इच्छा नसते, अस वाटते काहीच करावा नाही फक्त बेडवर पडून राहावं, काही खावं नाही बस आराम करावा. त्यानंतर एखादी दिवस असा अगदी ताकतीने भरलेला असेल काय करू काय नाही असं होईल, काम नसेल तरीही मुद्दामून काही न काही काम काढणार आणि ते पूर्ण करणार. कधी मन खूप आनंदी असेल तर कधी मनात दुःखाचे विचार येतील, कधी काही गोष्टीवर राग सुद्धा येणार हे सर्व प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असते.

               प्रत्येक दिवस सारखाच नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळे क्षण असतात. त्यामुळे आपण हे सर्व स्वीकारलं पाहिजे आणि हे सर्व सामान्य आहे. आपल्या आंतरिक शक्तीची जाणीव झाल्यास आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. स्वतःला खचून जायची परवानगी द्याचीच नाही. आयुष्यात समोर कसे जाता येईल हे बघणे गरजेचं ठरते.

              एकच आयुष्य आहे मनसोक्त जगायचं. आपल्याजवळ जे आहे त्याबद्दल विचार करायचं, आपल्याकडे काय नाही हे बघत बसल्यास कायम दुःख वाट्याला येईल. वेळ मिळेल तस नवीन गोष्टी शिकत राहायचं, त्यामुळे आपल्याला विचार करायला वेळच मिळणार नाही.

प्रत्येक गोष्टीला सामना करता आला म्हणजे म्हणता येईल "मी सक्षम आहे."


Saturday, May 11, 2024

का रे दुरावा

          माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. माणूस बोलू शकतो एकु शकतो, बघू शकतो आणि विचार सुद्धा करू शकतो सोबत भावना व्यक्त करू शकतो  हे सर्व तर प्राणी पण करू शकतात पण माणूस हा कोणत्याही क्षेत्रात बुध्दीने अग्रेसर असतो.

          व्यक्तीच्या वागणुकीवर समाजाचा, सभोवतील वातावरणाचा खूप प्रमाणात प्रभाव होत असतो. आपण ज्या भविष्याचा विचार करतो तो खरा होतो, नाही होत यावर प्रत्येकाचे वेगळे मत असू शकते पण जास्त प्रमाणात काहीतरी वेगळी परिस्थिती असते. आपण जसा विचार करतो तस काही घडत नसते, आपल्या मनासारखं होत नसल्याने आपल्याला त्या गोष्टीचं दुःख सुद्धा वाटते, डोळ्यात अश्रू दाटतात. पण त्या परिस्थितीला सामना करायला देवाने आपल्या मध्ये शक्ती दिली असते याच भान नसते. आपल्यासोबत २ गोष्टी प्रेमाने बोलले तरी आपल्याला छान वाटते. 

      भविष्यात आपलं जीवन अस असेल तस असेल असा विचार नक्कीच सर्वांनी केलाच असेल पण खरचं ते सर्व खर होत आहे का ?

आपण भविष्याचा अंदाज लावू शकतो पण वास्तव नाही. 


मनात गुंफलेल्या तारा सोडवाव्या कश्या

नात्यातला रुसवा, फुगवा सोडवावा कसा

काचेला तडा गेला की वापरता येत नाही 

नात्याला तडा गेला की नात भरून निघत नाही

स्वतःच्या आधी ठेवलेली नाती परकी होतात

काळजी आणि प्रेमाची जागा क्लेश, मत्सर घेतात

नेहमीच्या भेटीची जागा अकस्मात होणारी भेट घेते

घट्ट नातं वाटणाऱ्या नात्यात पोकळ  निर्माण होते




चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...