एक दिवस असा येतो सकाळी उठायची इच्छा नसते, अस वाटते काहीच करावा नाही फक्त बेडवर पडून राहावं, काही खावं नाही बस आराम करावा. त्यानंतर एखादी दिवस असा अगदी ताकतीने भरलेला असेल काय करू काय नाही असं होईल, काम नसेल तरीही मुद्दामून काही न काही काम काढणार आणि ते पूर्ण करणार. कधी मन खूप आनंदी असेल तर कधी मनात दुःखाचे विचार येतील, कधी काही गोष्टीवर राग सुद्धा येणार हे सर्व प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असते.
प्रत्येक दिवस सारखाच नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळे क्षण असतात. त्यामुळे आपण हे सर्व स्वीकारलं पाहिजे आणि हे सर्व सामान्य आहे. आपल्या आंतरिक शक्तीची जाणीव झाल्यास आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. स्वतःला खचून जायची परवानगी द्याचीच नाही. आयुष्यात समोर कसे जाता येईल हे बघणे गरजेचं ठरते.
एकच आयुष्य आहे मनसोक्त जगायचं. आपल्याजवळ जे आहे त्याबद्दल विचार करायचं, आपल्याकडे काय नाही हे बघत बसल्यास कायम दुःख वाट्याला येईल. वेळ मिळेल तस नवीन गोष्टी शिकत राहायचं, त्यामुळे आपल्याला विचार करायला वेळच मिळणार नाही.
प्रत्येक गोष्टीला सामना करता आला म्हणजे म्हणता येईल "मी सक्षम आहे."
No comments:
Post a Comment