Wednesday, March 02, 2022

नैराश्य

                    प्रत्येक व्यक्तीला आपण का जगतो कशासाठी जगतो आपल्याला काय करायचे आहे आपल्या जीवनाच ध्येय काय आहे या सर्व प्रश्नाची उत्तर ज्या व्यक्तीकडे असतील त्या व्यक्तीच्या ध्येयामध्ये येणाऱ्या अडचणींपुढे मात करून तो व्यक्ती नक्कीच यशस्वी होणारच... का तर जी सर्वात मोठी ताकत आहे ती मनाची इच्छाशक्ती आहे. 

                जीवन हा जन्म आणि मृत्यू यामधला प्रवास आहे. सुखदुःखकठीण प्रसंग अशी अनेक नागमोडी वळणे जीवनाचा मूलमंत्र देऊन जाईल. पण जेव्हा तीच इच्छाशक्ती मनातून लुप्त होते तेव्हा काय होते याबद्दल जाणून घेऊया...

             जीवनाचा तो एक भाग  ज्यामध्ये आपली इच्छाशक्ती हि दबून जातेएक न्यूनगंड( स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी समजणे ) निर्माण होतोजीवनाचं ध्येय नसतेनवीन काही करण्याची इच्छा नसते,भूक लागत नाहीझोप येत नाहीताणतणाव असतेमानसिक त्रासापासून ग्रस्त असते त्यामुळे शारीरिक त्रास उदभवतात हि सर्व नैराश्याची लक्षण आहे.

               नैराश्याची कारण ही खूप आहेत. आपल्याला जस हवं असते तस न मिळाल्यामुळे नैराश्य येतेकोणत्याही क्षेत्रात अपयश  पदरी आल्यामुळे नैराश्य येतेएखादी गोष्ट मनाला लागली कि नैराश्य येतेआपल्यापेक्षा यशाची उंची गाठणाऱ्या लोकांना बघून नैराश्य येते.

            नैराश्य येणे साहजिकच आहे पण त्यातून बाहेर पडणे आपल्यासमोर एक आव्हान आहे. विचारांनी ग्रस्त असलेलं डोकं शांत करण्यासाठी स्वतःला व्यस्त करणे गरजेचे आहेएखादी छंद जोपासणे गरजेचं आहेआवडती गोष्ट केल्यास मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईलपर्यटन स्थळाला भेट द्या त्यामुळे मनमेंदू हा दुसऱ्या वाटेने विचार करायला लागेलतुमच्या विश्वासातील व्यक्तीसोबत बोला,मनातल्या गोष्टी सांगापण विचार करूनखरंच त्या व्यक्तीला तुमची काळजी असेल तर तीच व्यक्ती सर्व ओळखून घेईलनवीन कला शिकण्याचा प्रयत्न करा आणि एक मनात ध्येय ठेवून नव्या वाटेला सुरुवात करा.... मनाची इच्छा शक्ती सर्वात मोठी शक्ती आहेध्येय साध्य करण्याची क्षमता प्रत्येकात असते फक्त योग्य दिशेने चालावं लागत.....

जगाचा पोशिंदा

   प्रत्येक व्यक्ती लहानपणापासूनच मूलभूत गरजा शिकले त्या म्हणजे अन्नवस्त्रआणि निवारा. आणि बाकी जीवनाला सोईस्कर करण्यासाठी निर्मित करण्यात आलेले साधन आहेत. आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी काही देवासारखी माणसं आपल्या कष्टाचं सोन करतात. आणि त्याच पैकी एक जगाचा पोशिंदा - शेतकरी बद्दल विचार मांडण्याचा प्रयत्न आहे.

             देवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला कीमाझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल म्हणून मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा माणूस म्हणजे शेतकरीजो धान्यभाजीपालाकच्चा मालआपल्या जमिनीत राबराब राबूनदिवसरात्र कष्ट करून पिकवतो. त्याच शेतकऱ्याला अन्नदाता म्हणतात. जगातला एकच असा मानव आहे जो ताससुट्टी चे दिवस न बघता स्वतःसाठी नाही तर पूर्ण जगासाठी राबतो तो असतो शेतकरी.

              आज त्या शेतकऱ्यामुळे आज आपल्या घरात शिजवायला धान्य आहेखायला चविष्ट असे फळभाजीपाला आहे. कापडनिर्मिती सुद्धा त्या जमिनीमधून उगवण्याऱ्या कापसावर अवलंबून आहे. घाम गाळूनमेहनत करूनजीवाची पर्वा न करता त्या पिकाला आपल्याच जीवाचा भाग समजून उगवणाऱ्या पिकाला पैशाची किंमत जोडणे सहज होते पण विचार केला तर त्याची किंमत अमूल्य आहे.

           कधी निसर्ग खेळ करतोकधी सरकार खेळ करतेकधी महामारी खेळ करते पण त्यात भिरडण्याऱ्या त्या अन्नदाताचे काय 

           कर्ज घेऊन शेती करतात मेहनत घेऊन कष्ट करतात पण जेव्हा शेवटी हाताला काही लागत नाही किंवा कर्ज फेडू शकणार धन हाती येत नाही तेव्हा तो दाता आत्महत्येला बळी पडतो. त्या मागे त्याच कुटुंब अनाथ होतेआणि त्यामागचं दुःख हे सोसणे कठीण होऊन जाते.

            आज एक स्वतः कडून आपण जितकी मदत करू शकू तितकाच आपल्या हातात आहे. महागड्या ठिकाणी खूप वस्तू घेतो मात्र भाजीफळ घेताना भाव करतो. आज त्याच्यामुळे आपण आहो हे विसरायला नको. त्यांना त्यांचा अधिकारआदर हा मिळायला हवा.

           थोडा विचार करूयाआज जर शेतकरी संपावर गेले काय होईलशेती बंद होईलपीक उगवणार नाही ना भाजी उगवणारआणि आपल्या ताटात रोज अन्न असते ते पण मिळणार नाही.

          भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग याच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय शेतकरी दिन २३ डिसेंबरला  साजरा केला जातो. वेळेआधीच काही गोष्टीचा आदर करायला शिकणे  महत्वाचे असते. त्यामुळे तो गरीब असेलही पण तो जगाचा पोशिंदा आहे आणि अन्न आपली गरज आहेहे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आजही आपल्या देशात शेतकरी जमिनीला आईचा दर्जा देतो आणि मेहनत करून तिच्यातून धान्य पिकवतो. त्यामुळे जगाचा खरा पोशिंदा शेतकरीच आहे.

ती

 कालपासून जरा अस्वस्थच वाटत होत. त्यामुळे वाटलं हे सुद्धा मी माझ्या शब्दात मांडले पाहिजे. तस तर या घटना सतत घडत आहे. मनाला चटका लावणारीमाणुसकीच्या नावाला काळ फासणारीकंठ दाटून टाकणारीआणि एक मुलगी म्हणून मनात धसकी भरणारीती म्हणजे स्त्रीवर होणारे अत्याचार त्यालाच समाजात बलात्कार असे म्हणतात. खूप संवेदनशील गोष्ट आहे. बँगलोर मधली घटना मी ऐकलीआणि हे ऐकून मन खूप अस्वस्थ झालं. डोळ्यासमोर येतो तो त्या व्यक्तींनी किती सहन केले असेलकिती आक्रोश केला असेलत्या मायबापाला किती दुःख वाट्याला आलं असेल..........आणि हे सर्व थांबायला हवं आहे......

 

आपल्या देशात घडणाऱ्या या देशाला काळिमा फासणाऱ्या घटना रोज घडत आहे. काही या समोर येतात तर काही भीती पोटी लपवून ठेवतात. भारत कितीही विज्ञान आणि तंत्रज्ञानअंतराळसाक्षरता अनेक सुविधांमध्ये प्राविण्य मिळवत प्रगती करत असला तरी जोपर्यंत या अश्या दुर्देवी घटना आपण थांबवू शकत नसेल तर त्या प्रगती ला काही अर्थ नाहीआज जर देशाच्या मुलीला या अत्याचारापासून वाचवायला देश असमर्थ असेल तर हे देशाचं दुर्दैव्य आहे. आज एक मी पण मुलगी आहेआज या घटना ऐकून भीती पण वाटे आणि देशाच्या प्रणालीवर विश्वास बसत नाही. नेहमी ऐकण्यात येणाऱ्या गुन्ह्यापैकीं हा एक अत्याचार आहे. एखादी बातमी आली कि खूप मनावर प्रभाव पडतो. आपण सुरक्षित राहायला हवं. दिवस गेले कि आपण सामान्य बनतो आधीसारखेचआपल्याच जगात रमून जातोपण हे आपलं वागणं चुकीचं आहे.

 

समाजात याबाबदल बोलायला गेलं कि काही लोक स्त्रीला दोषी ठरवतात किंवा काही त्या नालायक लोकांना...सर्वांची वेगळे वेगळी बाजू असू शकते...पण सर्व प्रकरणात एकच पकडून आपण चालू नाही शकत.. चुकी हि कोणाचीही असू शकतेतपास केल्यावर गुन्हेगाराला पकडल्याच जाते. ज्यांच्या हातात उच्च शक्ती आहेते करतील काय करायचं ते पण गरज हि आहे स्व:रक्षणाची. शेवटी स्वतःला सुरक्षित करण्यासाठी स्वतःला ताकतीने मोठे करायचे आहे.

 

आजच्या काळात योग्य संगोपनाची गरज आहे. शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीला साक्षर बनवते पण पुस्तके सोडून इतर गोष्टीविषयी ज्ञान गरजेचं आहे. आजच्या काळात स्वरक्षण म्हटलं की महिलांसाठी स्वरक्षणचे धडे शिकवले जातात परंतु त्याच्याआधीपण काही साध्या साध्या गोष्टी मदतीला ठरू शकतात. सुरवात हि आई वडिलांपासून होते. आज पालक आणि बालक यामध्ये पारदर्शकता राहिलेली नाही. आज प्रत्येक आई वडिलांनी आपल्या पाल्याना या गोष्टीबद्दल जाणीव करून द्याची गरज आहे. मुलींना पण आपल्या पद्धतीने सुरक्षित राहायला शिकवायला हवंआणि मुलांना सुद्धा मुलींचा आदर करायला शिकवायला हवा. असं संभाषण फार कमीच होत असेल. आज प्रत्येक घरात राजमाता  जिजाऊ असत्या तर शिवबा जन्माला आला असता आणि राणी लक्ष्मीबाई ची शूरता प्रत्येक मुलीत असती तर क्रूर लोकांना धडा शिकवलं असता पण आजचा काळ खूप भयंकर आहे त्यामुळे तुम्हीच ती व्यक्ती आहे जी स्वतः माणुसकी दाखवू शकेल आणि सामर्थ्य एकत्र करून शक्तीचा उपयोग कराल.

 

आपण कुठेही वावरत असताना आपल्या आजूबाजूला लोक असतातत्यामुळे लोक ओळखायला शिकणे हि स्वरक्षणाची पहिली पायरी आहे. त्यांनतर एक मर्दपणा असायला हवाजर काही वाईट घडत असेल तर त्याला विरोध करायची शक्ती असली पाहिजे. आज मार्केटला अनेक स्वरक्षणासाठी उपकरण किंवा साधन उपलब्ध आहेतती विकत घ्या आणि बाहेर जाताना नेहमी तुमच्याजवळ ठेवाकाही चुकीचं वाटलं की लगेच हिमतीने सामना करायला शिका. आज आपल्याला कोणी वाईट नजरेने बघायला नको त्यामुळे आपल्या परीने वागणूक ठेवायला हवी.


चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...