Sunday, July 14, 2024

भेटला विठ्ठल माझा 🌸

                प्रत्येक धर्मात अनेक देव आहेत. त्या देवांची पूजा अर्चना केली जाते. भक्ताला देवाने दर्शन द्यावे ही प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या संकटात देवाने आपल्याला मदत करावी असे प्रत्येकाला वाटत असते. देवाने स्वयंभू आपल्याला आशीर्वाद द्यावा अस वाटत असते. त्यासाठी फक्त भक्ती करून होत नाही, त्यासाठी आपले आचरण हे देवांच्या शिकवण प्रमाणे असायला हवे. अर्थात देव आहे आपल्या हृदयात असतो, आपण चुकीचं कार्य केल्यास देवाचं आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरते.
            रोजच्या जीवनात अनेक प्रसंग येतात, जेव्हा आपल्याला नियम पाळावे लागतात. दुपारच्या वेळेला ट्रॅफिक नसले तरीही १ मिनिटांसाठी सिग्नल वर थांबल्याने मागून येणारे वाहने सुद्धा थांबतात हा माझा स्वतः चा अनुभव आहे. प्रत्येकाची मानसिकता नसतेच, ते नियम न पाळता नियमांच उल्लंघन करतात. आपण आपल्या नियमांवर ठाम राहल्यास समोरच्या व्यक्तीला सुद्धा नियमांची कठोरता कळते. अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला मदतीचा हात दिल्यास आपल्याला ही मदत मिळतेच. शुद्ध मन, विचार, आचरण असल्यास देव सतत आपल्या हृदयात विराजमान असतात.

           एकमेकांना मदत केल्यास माणुसकी टिकून राहते. देव कोणत्या रुपात येऊन तुम्हाला मदत करेल हे कळणार पण नाही. त्यामुळे चांगले कर्म करत राहिल्याने त्या कर्माचे गोड फळ मिळतेच.

Sunday, June 16, 2024

सुखदायक वेदना ❤️

              वेदना या कोणत्याही प्रकारात मोडल्या जाऊ शकतात. शरीराला झालेल्या दुखापतीमुळे होणारी वेदना, मनाच्या विरुद्ध गोष्टीमुळे मनाला होणारी वेदना आणि आपल एक काम पूर्ण होत असलेल्यांची एक उल्हासदायी वेदना, आता हे वेदना उल्हासदायी खरच असू शकते का ?

          उल्हास म्हणजे आनंद आणि उल्हासदायी वेदना म्हणजे वेदना होऊन सुद्धा मिळणारा आनंद. एखादी गोष्ट पूर्ण करण्याकरिता मेंदूचा किंवा शरीराचा वापर होतो. एखादी गोष्ट मनात ठरवून ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ती सोडायची नाही अश्याप्रकरच्या खूप गोष्टी असतात, त्यापैकी एक माझी आवड म्हणजे चित्रकला.

             हातात घेतलेली चित्रकला पूर्ण होत पर्यंत माझ मन शांत नसते. हातात पेन्सिल घेण्यापासून ते शेवटचं रंगकाम करून पाण्यात ठेवलेला ब्रश, इतक्या काळात वेळेचं भान नसते, भूक लागली हे सुद्धा कळत नाही, बाकी काम राहील बाजूला पण चित्र पूर्ण होत पर्यंत मी त्या चित्रात गुंतले असते.

            एक चित्र काढायला, रंगवायला साधारण ३ ते ४ तास लागतातच. हा वेळ कसा निघून जातो कळत सुद्धा नाही आणि त्यात सतत बसून काम करणे, त्यामुळे पाठ दुखू लागते, बारीक काम असेल तर हात सुद्धा दुखून येतो. एकदाच चित्र पूर्ण झालं की शरीराला आराम दिल्यावर मिळणार समाधान खूप वेगळ असते.

            शरीरात वेदना झाल्या असतील तरीही त्यापेक्षा चित्र पूर्ण झाल्याचा आनंद जास्त असतो त्यामुळेच याला उल्हासदायी वेदना म्हणतात. एखादी गोष्टीची मनापासून आवड असल्यास ती पूर्ण होत पर्यंत सतत प्रयत्न केल्यास मिळणाऱ्या फळाची चव गोडच लागते. ती कला असो वा गिर्यारोहण असो किंवा आपले छंद.......

Monday, June 10, 2024

वेळेचे नियोजन 🕐

           आयुष्यात वेळेला खूप महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीला सारखाच वेळ मिळतो. त्यात वेळेचं नियोजन करणाऱ्या व्यक्तीला यश लवकर मिळत.

           वेळेचे नियोजन का आवश्यक आहे ? गेलेली वेळ परत मिळत नाही. वेळेचं महत्त्व अन्यसाधारण आहे. थोर पुरुष वेळ मिळत नाही अशी तक्रार करत नाही. कमी वेळेत आपली कामे पूर्ण करण्यासाठी वेळेचं नियोजन गरजेचं असते.

            रात्री झोपण्याआधी उद्याच नियोजन करणे गरजेचं असते. कोणत्या गोष्टीला किती वेळ द्याला हवा हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. आपल्याला कोणती कामे करायची आहे आणि त्या साठी किती वेळ लागेल याचा अंदाज असल्याने दुसऱ्या दिवशी विचार करण्यात वेळ जात नाही.
           व्यक्तीला काम नसले की माणूस विचार करत बसतो. म्हणून त्यापेक्षा स्वतःला कामात गुंतवून ठेवणे हे उपयोगी ठरते.
रोजचे १० मिनिट स्वतःचा विचार केला तरी भविष्यात त्या १० मिनिटांचा परिणाम दिसेलच. 

           आयुष्यातला प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. एका सेकंदाला वाया घालवता कामा नये. जितका ज्ञान मिळवता येईल तितका मिळवण्याचा प्रयत्न करायचं. आजच्या काळात सोशल मीडियाला बळी पडणारे भरपूर आहेत. आपला मौल्यवान वेळ केवळ जिथून ज्ञान मिळते त्यातच वापरावा.

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...