आयुष्यात वेळेला खूप महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीला सारखाच वेळ मिळतो. त्यात वेळेचं नियोजन करणाऱ्या व्यक्तीला यश लवकर मिळत.
वेळेचे नियोजन का आवश्यक आहे ? गेलेली वेळ परत मिळत नाही. वेळेचं महत्त्व अन्यसाधारण आहे. थोर पुरुष वेळ मिळत नाही अशी तक्रार करत नाही. कमी वेळेत आपली कामे पूर्ण करण्यासाठी वेळेचं नियोजन गरजेचं असते.
रात्री झोपण्याआधी उद्याच नियोजन करणे गरजेचं असते. कोणत्या गोष्टीला किती वेळ द्याला हवा हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. आपल्याला कोणती कामे करायची आहे आणि त्या साठी किती वेळ लागेल याचा अंदाज असल्याने दुसऱ्या दिवशी विचार करण्यात वेळ जात नाही.
व्यक्तीला काम नसले की माणूस विचार करत बसतो. म्हणून त्यापेक्षा स्वतःला कामात गुंतवून ठेवणे हे उपयोगी ठरते.
रोजचे १० मिनिट स्वतःचा विचार केला तरी भविष्यात त्या १० मिनिटांचा परिणाम दिसेलच.
आयुष्यातला प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. एका सेकंदाला वाया घालवता कामा नये. जितका ज्ञान मिळवता येईल तितका मिळवण्याचा प्रयत्न करायचं. आजच्या काळात सोशल मीडियाला बळी पडणारे भरपूर आहेत. आपला मौल्यवान वेळ केवळ जिथून ज्ञान मिळते त्यातच वापरावा.
No comments:
Post a Comment