लिखाण हे एक संवादाचे साधन आहे. प्रत्येकाला आपलं जीवन कस जगायचं याच स्वातंत्र्य आहे. आपला देश जसा आधुनिक प्रगती करत आहे तसंच मानवाचे विचार पण आधुनिक गोष्टीकडे वळत आहे, या जगासोबत चालता चालता मूळ तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. आजच्या काळाची गरज बघून मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे. एकापण व्यक्तीला या तत्त्वाचे महत्त्व पटले तरी मला आनंद आहे.
Sunday, August 14, 2022
हर घर तिरंगा
Wednesday, July 13, 2022
आनंदाचे क्षण
Saturday, June 25, 2022
नारी सशक्तीकरण
आपला समाज हा पुरूषप्रधान समजल्या जातो. काही वर्ष आधी अस ठरलेल होत की पुरुष घर चालवण्यासाठी नोकरी किंवा धंदा करतील आणि स्त्रीयांनी घर काम सांभाळायच. इच्छा असेल तरी मुलीना शिक्षणापासून वंचित ठेवले जायचे. नोकरी करण्यास विरोध केला जायचा. हे आताच्या परिस्थितीत सुद्धा घडत आहे. तरी या सर्वाना सामना करून महिलाशक्ती आज प्रत्येक क्षेत्रात उत्तमरीत्या कार्यरत आहे.
ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले या भारताच्या सुपुत्रिमूळे आज प्रत्येक जन्म घेणाऱ्या मुलीला शिक्षणाचा
हक्क मिळाला आहे. जीवन जगण्याचा एक मूलभूत पाया म्हणजे शिक्षण आहे. आज प्रत्येक क्षेत्रात
महिला आपली जबाबदारी पार पाडत आहे. काही महिला देशाच नाव उज्ज्वल करत आहे. हे शिक्षण
मुलीना मिळवून देण्यासाठी अनेक समाजसुधारक यांनी अपार कष्ट केले. आणि त्याचच फळ म्हणजे
महिलांची प्रगती.
आजच्या
काळात प्रत्येक मुलीला, स्त्रीला स्वतःच्या पायावर उभ राहण्याची गरज आहे. कधी अडचण
आली तरी स्वतः त्या गोष्टीचा सामना करण्याची ताकत प्रत्येक स्त्री मध्ये हवी. आज अनेक
घटना घडतात त्यासाठी प्रत्येक महिलेने सावधान राहणे गरजेचे आहे. प्रत्येक स्त्रीने
स्वावलंबी होणे गरजेचे आहे. स्वावलंबी म्हणजे फक्त पैसा कमावणे नाही तर समाजात घडत
असणाऱ्या नवीन गोष्टी माहीत करून शिकून घेणे, पैसचे व्यवहार,काही नियम व कायदा, असे
अनेक गोष्टी प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे.
महिलांची
जबाबदारी आहे मूल आणि चूल सांभाळण्याची परंतु त्यासोबतच जगाच्या सोबत चालण्यासाठी जगात
काय घडते आहे हे माहीत असण महत्त्वाच आहे. अस म्हणतात घरातली स्त्री शिकली की ती पूर्ण
घराला शिकवते तसच काळानुसार महत्त्वपूर्ण गोष्टी माहीत असण काळाची गरज आहे.
मुलगी
शिकली प्रगती झाली
चांदणी
निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...
-
काल ९ ऑक्टोबर रोजी श्री रतन नवल टाटा सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी साधारण मध्यरात्री प्रसारित माध्यमातुन कळाली. जणूकाह...
-
आनंदाने जीवन जगण्याची इच्छा बाळगत आईबाबांनी एका मुलीला जन्म दिला. फक्त आईबाबाच नाही तर पूर्ण परिवार आनंदाने न्हाहून निघाले....

