Wednesday, August 27, 2025

दृष्ट नजर

          देशाची विचारांची पातळी खूप घसरत चालली आहे. सरकार आपली तिजोरी भरण्याचे काम करते मात्र सामान्य माणूस एक एक पैशासाठी मर मर राबतो.

          देशात वाढणाऱ्या बलात्काराला आळा घालण्यासाठी खूप उपाय केले जाऊ शकतात पण कोण इतकी मेहनत करणार ? आपल्या मुलीला काही होणार नाही बाकी देशातल्या भगिनींच जे व्हायचं ते होईल असा समज आहे. वर्षानुवर्षे हेच चालत आलंय. कधी कधी वाटत लहानपणी खूपदा पाहिलेल्या नायक चित्रपटात जसा एक दिवसाच्या मुख्यमंत्र्याने न्याय केला ते सर्व आताही होऊ शकत पण करणार कोण ? 

          आज मी नवराष्ट्राचे वर्तमानपत्र वाचत होते. त्याच्या पहिल्या ५०% पानाला एक कंपनीची जाहिरात दिसली. ती होती प्लास्टो कंपनीची. आपली उत्पादने लोकांनी खरेदी करावी यासाठी स्त्रीच्या शरीराचा वापर केला गेला. इतके उत्पादने असताना पण यांना शॉवरचीच मोठी जाहिरात का द्यावी वाटली असेल. शॉवरच्या पाण्याने अंघोळ करणारी स्त्री, वाह रे वाह, ही कमालच ना, इकडे इलेक्शन कमिशन म्हणते आपल्या देशातील स्त्री, बहिणी, भगिनी यांचे मतदान करतानाचे सीसीटीव्ही दाखवणे म्हणजे त्यांच्या गोपनीयतेचा भंग करणे, मग आता कुठे गेली ती गोपनीयता. बाईच उघडं शरीर बघून माणसाला आकर्षण वाटत असते आणि त्यामुळे मुले, माणसे यांची स्त्रीविषयची नजर ही वाईट होते. आणि या गोष्टीची भरपाई असहाय्य लहान लेकरांपासून ते वृद्धांपर्यंत असणाऱ्या स्त्रीला करावी लागते. वृद्ध लोकांना नियमित वर्तमानपत्र वाचायची सवय असते. आता त्यांनी सुद्धा हे असे चित्र बघावे का ???? वर्तमानपत्रात असे चित्र टाकून असे उघडे शरीर असणे सामान्य आहे असे दाखवायचे आहे का ? आपली संस्कृती विसरून असे अंग प्रदर्शन करण्याची मुभा या देशातल्या मुलींना संदेश देऊ इच्छिता का ???? 

         काही म्हणतील तुम्हाला पटत नाही तर तुम्ही जाहिरात बघू नका. पण हा काही त्यावर उपाय नाही. चुकीच्या गोष्टी दुर्लक्षित करून चालणार नाही. वर्तमानपत्र हे एक माहितीच स्रोत आहे आणि त्यात अशी अश्लीलता दाखवण्यावर बंदी असायला हवी. जेव्हा देशात सक्त कायदे असतील तेव्हाच वारंवार घडणारे दुष्कर्म थांबतील. आता तर काय देशातल्या लोकांचा स्वतःच्या देशाच्या न्याय व्यवस्थेवरचा विश्वास सुद्धा उडाला आहे. हीच ती का लोकशाही ?

Sunday, August 24, 2025

निःशब्द संवाद

           आपल्या जीवनात काही असे क्षण येतात जे काहीही न बोलता खूप काही सांगून जातात. त्या क्षणात जे घडले त्याचा प्रत्यय लावणे हे प्रत्येकाला जमेलच असे नाही. काही क्षण हे मनात कायम राहतात. आपल्याला खूप काही करावे वाटते परंतु काही कारणास्तव करता येत नाहीत. तशीच माझी एक आठवण एका जवळच्या व्यक्तीची.....

            निघण्याची वेळ झाली होती, मी तिची भेट घेतली आणि येते म्हणाली तितक्याच तिने घट्ट पकडलेला हात खूप काही सांगून गेला. तिला काहीतरी सांगायचं होतं पण सांगू शकले नाही परंतु मी ओळखले तिला काय म्हणायचे होते. पण घड्याळाचे काटे समोर सरकत होते आणि माझी प्रस्थान करण्याची वेळ झाली होती. प्रवास करते वेळी सुद्धा मी तोच विचार करत राहिले......

              असे काही क्षण न बोलता खूप काही सांगून जातात त्यासाठी मनाला ओळखणे गरजेचे असते. प्रत्येक वेळी  समोरच्या व्यक्तीबद्दलची काळजी ही बोलून न दाखवता वेळ येईल तेव्हा खंबीरपणे आधार देण्याची असते. सहज बोलून दाखवणे आणि प्रत्यक्षात करून दाखवणे यात फार फरक असतो आणि काही वेळेला मनात इच्छा असेल तरीही शांत रहावे लागते.

Saturday, August 16, 2025

Let's Travel

             

          Travelling is where person feels nature, meet new people. It is not only about the destination but the journey you enjoy. Travelling is new experience that has space in our hearts for the memories.It is a way to expand the thinking of our mind, heart and soul and It's not about how much distance is in our journey but cherishing seconds of that moment we enjoy.


At the end of the day what matters is you......





Friday, August 15, 2025

ती एक रात्र 🌌

           उन्हाळ्याचे दिवस होते. हळूहळू सूर्य मावळू लागला होता. दिवसभर उन्हाने तापून निघणाऱ्या गच्चीला थंड करायची वेळ झाली होती. टाकीतून पाणी घेऊन पूर्ण गच्चीवर पाण्याचा वर्षाव केला. पाण्याने गच्ची अगदी गार केली. जेवण आटोपून झोपण्यासाठी गाद्या टाकल्या गेल्या. गप्पा गोष्टीचा खेळ संपला आणि सर्व आपल्या आपल्या जागेवर झोपून एकटक आकाशाकडे पाहत राहिले.......

            निरभ्र आकाश आणि त्यात वाऱ्याची थंड झुळूक मनाला गुदगुल्या करत होती.  निरभ्र आकाशाला प्रकाशाची चाहूल लागली होती. आणि ती प्रकाशाची चाहूल पूर्ण करायला लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी संपूर्ण आकाश न्हाऊन निघाले आणि त्यात इवलीशी उगवती चंद्रकोर आसमंताला ध्यास लावून गेली. हे नयनरम्य दृश्य बघण्यात माझे मन रमले होते. खूप कौतुकाने हे दृश्य डोळ्यात सामावून घेत होती. असंख्य असणाऱ्या चांदण्या मोजण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण एकटीने मोजता येणारच नाही त्यामुळे सर्वांना कामी लावले पण मोजणी काही थांबेना. अगणित चांदण्यामध्ये सर्वात जास्त चमकणाऱ्या चांदणीला शोधत होते आणि ती गवसली. पूर्ण गोष्ट लक्षात नाही पण म्हणायचे की आकाशात चांदण्यामध्ये आजीबाईच्या खाटेचे ४ पाय आणि त्या बाजूला ३ चोर दिसतात. आणि खरंच ४ चांदण्या आयताकृतीत दिसल्या आणि त्या बाजूला ३ चांदण्यापण दिसल्या.

             चांदण्यांनी भरलेलं आकाश बघून फार कौतुक वाटायचं. आपलं जस जग आहे तसंच, त्या चांदण्या पलीकडे पण एक वेगळं जग असेल का ? सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी आणि पूर्ण सूर्यमालेचे घटकनिर्मिती कशी झाली असेल ? झाडांची आणि प्राण्यांची निर्मिती कशी झाली असेल ? असे प्रश्न मनात यायचे. लहान असताना आपल मन हे किती साध असतं, आपल्याला जे दिसतं त्याचबद्दल आपण साधेपणाने विचार करत असतो. 
              
               आज आधुनिक काळात प्रत्येक गोष्टीच विज्ञान असेल तरीही मला निसर्गाच्या या गोष्टीचं आजही नवलच वाटत. पण आजकाल चांदण्या दिसतातच कुठे ? समोरच्या पिढीला चांदण्या दाखवायच्या तरी कश्या ? आपण निसर्गाची निगा नाही राखली तर निसर्ग सुद्धा आपली निगा करणार नाही. वाढती लोकसंख्या, वाढत प्रदूषण, तापमानवाढ, जंगलतोड इत्यादि गोष्टी निसर्गाला हानी पोहचवत आहेत. म्हणून निसर्गाची काळजी घेणे ही आपलीच जबाबदारी समजून आपल कर्तव्य सर्वांनी पार पाडायला पाहिजेच.


Thursday, August 14, 2025

जीवन हे क्षणभंगुर

खुदकी खामिया देखते देखते, खुदको ना खो देना
सबकी मंजिले अलग अलग, किसीकी ईर्ष्या ना करना


               प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत ही वेगळी आहे. कोणाला जन्मजात सर्व मिळत असते तर कोणाला ते सर्व मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. समोरच्या व्यक्तीकडे असणारी वस्तू आपल्याकडे नाही याची नाराजी प्रत्येक व्यक्तीला होतेच हा निसर्गाचा नियम आहे. कोणाला लवकर यश मिळते तर कोणाला उशिरा मिळते. अश्या अनेक गोष्टी आहे ज्यामुळे आपण स्वतःची तुलना ही समोरच्या व्यक्ती सोबत करतो. त्या भौतिक, मानसिक गरजाही असू शकतात. तुलना करता करता आपण स्वतःला कमी समजायला लागतो आणि समोरच्या व्यक्तीबद्दल ईर्ष्या करू लागतो. 

          आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानून जीवन जगण्याला अर्थ आहे. आजच्या आधुनिक काळात पैसा, गाडी, बंगला, नाव, नोकरी या गोष्टींना माणुसकीपेक्षा मोठा दर्जा दिला जातो आहे. कितीही काळ गेले तरी ज्या व्यक्तीत माणुसकी आहे तोच देवाला प्रिय असतो. 

          आपल्या परिस्थितीची माणसाने नेहमी जाण ठेवावी आणि समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीची थट्टा करू नये. सर्व गोष्टी या आदराने घ्याव्या. त्यातच आपली खरी माणुसकी दिसून येते. आपण स्वतः स्वकष्टाने, मेहनतीने कस मोठं होऊ याचा विचार करू समोरचे पाऊल टाकावे.

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...