आरसा हा आपल स्वतःच प्रतिबिंब दाखवतो आणि सावली ही आपली साथ कधीच सोडत नाही असं खूपदा एकलेल आहे, पण जर आरसा दोषपूर्ण निघाला तर आपल्याला जे प्रतिबिंब दिसते ते प्रत्यक्ष पेक्षा वेगळं असतं, म्हणजेच आरसा पण काहीवेळेस आपली साथ सोडतो.
सावली ही कायम आपल्यासोबत असते पण जेव्हा सूर्य अगदी आपल्या डोक्यावर असतो तेव्हा उभ्या असलेल्या वस्तूची सावली दिसत नाही याचाच अर्थ एक वेळेस सावली पण आपली साथ सोडते मग आपण माणसांकडून तरी काय अपेक्षा ठेवावी. नशीबवान असतात ती लोक ज्यांच्याकडे एक अशी व्यक्ति असते जी कायम खंबीर आधार देतात, प्रत्येक वेळी गरजेच्या वेळी उपलब्ध असतात आणि अश्या व्यक्तीना जपलं पाहिजे, कायम आधार दिला पाहिजे.
No comments:
Post a Comment