लिखाण हे एक संवादाचे साधन आहे. प्रत्येकाला आपलं जीवन कस जगायचं याच स्वातंत्र्य आहे. आपला देश जसा आधुनिक प्रगती करत आहे तसंच मानवाचे विचार पण आधुनिक गोष्टीकडे वळत आहे, या जगासोबत चालता चालता मूळ तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. आजच्या काळाची गरज बघून मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे. एकापण व्यक्तीला या तत्त्वाचे महत्त्व पटले तरी मला आनंद आहे.
Sunday, September 29, 2024
मी एक कलाकार
Sunday, September 15, 2024
गणेशोत्सव २०२४
गजानना श्री गणरायाआधी वंदू तुज मोरया
प्रत्येक लहान मोठ्या भक्ताला गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली असते. मागच्या वर्षी सारखाच यावर्षी सुद्धा १० दिवस वेगळाच उत्साह असतो. पूजेत सर्वप्रथम श्री गणेश पूजन केले जाते. गणपतीला अनेक नावे आहेत. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या शब्दांच्या गजरात, बाप्पाच स्वागत केले जाते. मनासारखी सजावट व्हावी म्हणून सर्व सज्ज असतात. मित्र मंडळा तर्फे स्थापना करण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे रूप खूपच मनमोहक असते. ढोल ताशे यांच्या आवाजाने परिसर दुमदुमायला लागतो. बाप्पांना आवडणारे मोदक घरोघरी बनवले जातात. वातावरणात एक वेगळंच चैतन्य निर्माण होते. आपली संस्कृतीच जतन आपणच करायला हवं.
Wednesday, August 14, 2024
खरचं देश स्वतंत्र झाला काय ?
चांदणी
निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...
-
काल ९ ऑक्टोबर रोजी श्री रतन नवल टाटा सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी साधारण मध्यरात्री प्रसारित माध्यमातुन कळाली. जणूकाह...
-
आनंदाने जीवन जगण्याची इच्छा बाळगत आईबाबांनी एका मुलीला जन्म दिला. फक्त आईबाबाच नाही तर पूर्ण परिवार आनंदाने न्हाहून निघाले....