Sunday, September 29, 2024

मी एक कलाकार

          रोजच्या जीवनात मला अनेक प्रश्न पडायचे त्यातला एक म्हणजे मी कोण आहे ? विचारांची पातळी उच्च असल्यास हा प्रश्न कठीणच वाटेल. मी कोण आहे ? माझी ओळख काय आहे ? माझ्यात अस काही वेगळं आहे का ? आजच्या धावत्या युगात मी स्पर्धा करू शकेल का ? असे अनेक प्रश्न सतावत राहायचे. एक दिवस ठरवल आपण या प्रश्नाचं उत्तर शोधायलाच हवं. 

         प्रत्येक व्यक्ती विशेष असतोच पण विशेष व्हायला मेहनत लागते, मेंदूचा वापर करावा लागतो. मी म्हणू शकते मी एक कलाकार आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीत उत्कृष्ट व्हावं लागेलच अस काही नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट करता आली पाहिजे. 

        मी ओळखली माझी कला. ती कला करताना माझं मन रमत. मला उत्साही वाटतं. ती कला पूर्ण होत पर्यंत समाधान वाटत नाही. अश्या विविध कला जोपासणे आजच्या काळाची गरज आहे. शाळेत शिकत असताना या गोष्टीचं महत्त्व कळायचं नाही पण याच गोष्टी आपल्याला किती आनंद देऊ शकतात, आपले मानसिक आरोग्य चांगले राखू शकते हे कळले.

          आजच्या काळात सोशल मीडिया मुळे कितीतरी प्रकारच्या कला जगासमोर आल्या आहेत. कधी विचार केला नव्हता त्या सुद्धा कला बघता येत आहे, शिकता येत आहेत. जग फार मोठे आहे, नवीन जगासोबत नवीन गोष्टी शिकणे तितकेच गरजेचे आहे.

         भरतकाम, ग्रिटींग कार्ड, मेहेंदी, चित्रकला, रांगोळी, सजावट, संगीत, स्वयंपाक, रंगकाम, शिलाई काम, नृत्य, गायन, लिखाण, वाचन अश्या अनेक प्रकारचे छंद बाळगायला हवे. छंद म्हणजे फावल्या वेळेत करता येणाऱ्या कृती. याच छंदातून अनेक लोक व्यवसायाकडे वळतात. पण सर्वप्रथम प्राधान्य शिक्षण आणि नोकरीला द्याला पाहिजे. 

         आपण विचार केलेली भविष्यातील परिस्थिती तशीच असेल अस होत नाही. काळानुसार निर्णय बदलावे लागतात. एकच म्हणायचं आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहा. 


Sunday, September 15, 2024

गणेशोत्सव २०२४

गजानना श्री गणराया
आधी वंदू  तुज मोरया


       ऑगस्ट महिन्याची चाहूल लागली की सणांची सुरुवात होते. रक्षाबंधन पासून ते दिवाळी हा काळ सर्वांसाठी आनंदाचा असतो. आपली संस्कृती, आपले सण हे आपुलकीचे बंध निर्माण करतात. त्यात एक महत्त्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव.

       प्रत्येक लहान मोठ्या भक्ताला गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली असते. मागच्या वर्षी सारखाच यावर्षी सुद्धा १० दिवस वेगळाच उत्साह असतो. पूजेत सर्वप्रथम श्री गणेश पूजन केले जाते. गणपतीला अनेक नावे आहेत. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या शब्दांच्या गजरात, बाप्पाच स्वागत केले जाते. मनासारखी सजावट व्हावी म्हणून सर्व सज्ज असतात. मित्र मंडळा तर्फे स्थापना करण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे रूप खूपच मनमोहक असते. ढोल ताशे यांच्या आवाजाने परिसर दुमदुमायला लागतो. बाप्पांना आवडणारे मोदक घरोघरी बनवले जातात. वातावरणात एक वेगळंच चैतन्य निर्माण होते. आपली संस्कृतीच जतन आपणच करायला हवं. 



#गणेशोत्सव २०२४

Wednesday, August 14, 2024

खरचं देश स्वतंत्र झाला काय ?

                 आनंदाने जीवन जगण्याची इच्छा बाळगत आईबाबांनी एका मुलीला जन्म दिला. फक्त आईबाबाच नाही तर पूर्ण परिवार आनंदाने न्हाहून निघाले. मुलीला हातात घेऊन बाबाचा आनंद गगनात मावेना, आईने ९ महिने पोटात वाढलेल्या बाळाला कुशीत घेतल तेव्हा उर दाटून आला.

                   मुलीच्या रुपात साक्षात लक्ष्मीने जन्म घेतला, मुलीचा पायगुण घराला लागला. घराची भरभराट झाली. ते कुटुंब फार आनंदी होत. मुलगी जशी मोठी होऊ लागली तसे आईबाबा तिचे लाड पुरवत गेले, तिच्या स्वप्नांसाठी ते झटत राहिले. आपली मुलगी शिकून खूप मोठी व्हावी, आपलं नाव तिने मोठे करावे हीच इच्छा बाळगत ते मुलीला शिक्षणासाठी दूर पाठवू लागले. मुलगी पण तशीच जिद्दी, चिकाटी वृत्तीची, तिने आपल्या स्वप्नांना पंख दिले, खूप मेहनत घेतली. आपल्या आई बाबाच नाव मोठं करण्यासाठी ती कष्ट घेत राहिली.

                नियमितपणे रोजची कामे करत असताना अचानक घरच्यांना फोन येतो, तुमच्या मुलीने आत्महत्या केली. नेहमी सारखे आनंदात जगण्याऱ्या कुटुंबाला राक्षसाची नजर लागली. जिवाचे हाल करून मोठ केलेल्या मुलीच्या बाबतीत ही घटना एकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. काही समजेना, काही सुचेना, काय झालं असेल ते ही कळेना. गुलाबाच्या फुलाप्रमाणे जपणाऱ्या मुलीला त्या आई वडिलांनी आपल्या मुलीला मृत अवस्थेत बघितलं, रक्तबंबाळ शरीर, अस्त्यावस्त असलेलं निर्वस्त्र शरीर. दोघांचं काळीज चिरून उठलं.  दोघांचा आक्रोश आसमंतात पोहचला.

            त्या मुलीची अशी अवस्था का झाली ? तिने अंग प्रदर्शन करणारे कपडे घातले होते ? रात्रीच्या वेळी ती आपली नोकरी करत होती ? स्वतःसाठी नाहीतर दुसऱ्या जीवांना जपत होती ? ती कामाच्या जागी एका हॉल मध्ये आराम करत होती ? काय होती तिची चुकी ?

               जिवाचे रान करून अभ्यास करून शिक्षण घेतल ? स्वतःची पर्वा न करता दुसऱ्यांसाठी झटत होती ? कामाच्या ठिकाणी आपण सुरक्षित असणार हा विचार करत होती ? या होत्या तिच्या चुका ?

                मुलींनी बलात्काराच्या भीती पोटी घरीच बसायचं का ? शिक्षण घेऊन पण घरचीच कामे करायची का ? आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आकाशात घेतलेली झेप थांबवायची का ?

               चूक करणाऱ्या पेक्षा चुकीच्या गोष्टीबद्दल मौन राहणे हे जास्त अपराधी आहे. सतत घडणाऱ्या गोष्टींना आळा घालणं हे जास्त महत्त्वाचं वाटते. प्रत्येक दिवसाला काही न काही नवीन धक्कादायक बातम्या समोरच येतात पण न्यायाच काय ? आरोपी लपवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. हे सर्व कधी थांबणार ? कधी हा देश बलात्कार मुक्त होणार ? या अश्या राक्षस वृत्तीच्या लोकांना जगण्याचा अधिकार नकोच.

        भारत भूमी ही संतांची भूमी आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले, थोर महापुरुष, राजे, महाराजे यांनी स्व मेहनतीवर स्वराज्य निर्माण केले. त्याच भूमीवर अश्याप्रकरचे दुष्कर्म थांबत नाहीत हे बघून मनाला अत्यंत दुःख वाटते. सर्वांनी एकमेकांना जपा, अस कृत्य कोणासोबत घडू नये..... बाकी काय अजून समोर खूप काही बघायचचं आहे..........


हा देश माझा याचे भान,
जरासे राहू द्या रे
जरासे राहू द्या
अभिलाषा यांची धरिता
कुणी नजर वाकडी करिता
त्या मरण द्यावया,
स्फुरण आपुले बाहु पाऊ द्या रे ॥


चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...