Sunday, April 20, 2025

मराठीचे भवितव्य : आपली जबाबदारी

जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा

           या गीताला आपल्या महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून राज्यसरकारने घोषित केले. आपल्या देशात २२ भाषा प्रचलित आहेत. त्यापैकी महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी. 

               आताच्या काळात इंग्रजीचं इतक वर्चस्व वाढलंय की  लोकांना मराठी बोलताना मध्येच इंग्रजी शब्द बोलायची सवय झाली आहे. म्हणजे ना पूर्ण मराठी ना पूर्ण इंग्रजी. नक्कीच इंग्रजी ही काळाची गरज आहे पण आपली मातृभाषा टिकून राहणे हे आपलीच जबाबदारी. समोरच्या पिढीला मराठीचं महत्त्व कळाव यासाठी आपली मातृभाषेत बोलणे हे गरजेचे आहे.

          एक दिवस मेट्रो ने प्रवास करते वेळी रांगेत उभ न राहता समोर समोर करणाऱ्या व्यक्तीला मी म्हणाले " आपको लाईन नही दिख रही क्या ? बीच में कैसे आ रहे हो ?
हे वाक्य विचार न करता तोंडून निघून गेले. पण लगेच विचार आला मी हिंदीत का बोलले, आपली भाषा मराठी आहे तर मराठीतच शब्द निघायला हवे होते. माझी हिंदी इतकी स्पष्ट नाही पण मराठी बोलताना गोडवा वाटतो.

                नोकरी मुळे इंग्रजीचा पगडा वाढलाय आणि प्रत्येकाला मराठी कळत नाही त्यामुळे हिंदीचा वापर वाढलाय.. तरीही एखादी गोष्ट व्यक्त करायला आपली मातृभाषाच गोड वाटते. मराठी असल्याचा गर्व वाटतो आणि शिवरायांच्या भूमीत जन्म घेतल्याचा आदर वाटतो.

               प्रत्येकाला प्रत्येक भाषेचा आदर असावा. भाषेची सक्ती नको पण थोडीफार दुसरी भाषा ही शिकण्याची आवड असावी. भारतात अनेक ठिकाणी भाषेमुळे वाद होत असताना आपल्याला दिसतात पण ते वाद न करता समजूतदारपणे प्रश्न कसा सोडवावा याकडे बघितले पाहिजे. भाषेचा अनादर करणे म्हणजे त्या मातृभूमीचा अनादर करणे होय. शेवटी भारत हा सर्वांचा देश आहे.

Sunday, April 13, 2025

लहानपण देगा देवा

            या वयात आलेल्या आयुष्यात, नोकरीच्या दगदगित वाटत लहान असताना सर्व किती छान होत... ना कसल बंधन ना ताणतणाव.... फक्त मनसोक्त आनंद.

          व्यक्ती जसा जसा मोठा होतो तसा त्याच्या मेंदूचा विकास होतो. मेंदूच्या विकासासहीत विचार करण्याची क्षमताही वाढत असते. लहान असताना संपूर्ण जग हे एका बागे सारखं वाटतं, सुंदर फुले, हिरवेगार झाडे, खेळण्यासाठी अनेक झूले इत्यादी. प्रत्येक व्यक्ती हा चांगला आहे अस वाटते. अभ्यास, शिक्षण, शाळा, आणि खेळ या व्यतिरिक्त मनात काहीही नसते. ते म्हणतात ना मुले ही देवाघरची फुले.

              सर्वांना आपलंसं करून टाकणारी, मनात कुठलाही द्वेष न ठेवणारी, सर्वांचं मनापासून एकणारी गोंडस मुले. आणि आज तीच मुले मोठे होत असताना विचार करतात.... लहानपणी सर्व चांगलच वाटत का तर आपल्यात ती समज नसते. एकदा समज आली की  समोरील व्यक्ती आपल्यासाठी धोकादायक असू शकते हे समजते...आज सतत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या बातम्या कानी एकु येतात आणि मन सुन्न होतं, कदाचित या सर्व गोष्टी आपण लहान होतो तेव्हा पण होतच असतील पण त्या गोष्टीचा सुगावा लागायचा नाही म्हणूनच जग हे बागेसारख वाटायचं पण आता कळलं जितकं सर्व छान दिसते ते नसते म्हणजेच दिसते तस नसते.

लहानपण परत येणं तर अशक्यच आहे पण आपल्यातलं लहानपण आपणच जपून ठेवायला हवं.

Sunday, March 02, 2025

अश्रू

कधी कधी मनमोकळेपणाने रडावे
मनातल्या वेदना अश्रू वाटे बाहेर पडावे

रडणं ही कमकुवत मनाची निशाणी नसून
भावनांना  फुटलेला पाझर असावा

नदीचं पाणी संथगतीने वाहते तसच
डोळ्यातलं पाणी हे टपोऱ्या पावसाचे थेंब जणू

मनाला दिलासा मिळाला तरीही
पाणावलेले डोळे खुप काही सांगतात

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...