Sunday, August 04, 2024

न संपणारं दुःख

                माणसांच्या जीवनात भावनांच चक्र सुरू असते. कधी चेहऱ्यावरचं गोड हसू, कधी क्षणात आलेला राग, कधी डोळ्यातून वाहलेले अश्रू तर कधी मनातल्या मनात साठवलेली भावना.

                सुख सर्वानाच हवं असते. माणसाला सुखात राहावं वाटते. पण हे सुख कायम असेल अस नसतेच. प्रत्येकाच्या जीवनात चढउतार होतच असते. सुखाबद्दल नेहमी बोलले जाते पण दुःखाचं काय ?

                दुःखात माणूस हताश होतो, नैराश्यात जातो, मानसिकरीत्या दुबळा बनतो, आणि या संकटांतून सावरायला फार काळ लागतो. नियतीने प्रत्येक जीवाचा जन्म आणि मृत्यू लिहिलेला आहे. ज्याने या धरणीवर जन्म घेतला तो एक ना एक दिवस अनंतात विलन होणारच हा निसर्गाचा नियमच आहे.

              आपल्या जीवनात आपण आपल्याकडे असणाऱ्या आधारामुळे जीवन जगत असतो. प्रत्येक व्यक्तीकडे जीव लावणारी माणसं असतातच. आपल्यासोबत आपली जवळची व्यक्ती आहे याचं समाधान असते. पण काही कारणास्तव ती व्यक्ती आपल्यापासून दूर झाल्यास होणारा त्रास हा असहनीय असतो. ज्या व्यक्तीला डोळ्यादेखत आपण बघतो, बोलतो ती व्यक्ती एक दिवस कायम आपल्याला सोडून जाते यातून मनाला लागणारा धक्का अविश्वसनीय असतो. यापेक्षा कोणतेही दुख मोठे नाही.

              जरी हे सर्व आपल्यासोबत घडू नये याची मनात धारणा ठेवली तरी, हे दुःख कोणापासूनही वंचित नाहीच. आज काय घडेल किंवा उद्या काय घडेल याची शाश्वती नाही.

Sunday, July 21, 2024

बंधन

           लहान असताना मोठ लवकर व्हावं अस वाटते आणि मोठ झाल्यावर वाटते अजून बालपणात जगावं. बालपणातील निरागसपणा, जबाबदारी मुक्त, मजेत असणार लहान मूल परत व्हावंसं वाटते.  जसं जसं मोठं होत असतो तस अनेक गोष्टीचं वजन वाढत जाते. प्रत्येक गोष्ट मनासारखी करता यायची पण आता असा काळ आला आपण एखादी गोष्टी बरोबर करत आहो की नाही याची तपासणी करावी लागते.

            लहान असताना आपला जीवनक्रम अगदी ताण मुक्त होता पण आता रोजच्या दिनचर्येत वापरत असणाऱ्या गोष्टीबद्दल विचार करावा लागतो, अंघोळीसाठी साठी साबण कोणता वापरावं, केस धुवायला कोणता शाम्पू चांगला असेल ज्यामुळे केसांची काळजी घेता येईल, तेल कोणतं वापरायचं, टूथपेस्ट कोणती वापरावी, 
रोज पाणी किती प्यावे, कोणते पदार्थ आपल्या शरीरासाठी चांगले आहे आणि कोणते घातक आहे, जेवताना जास्त पाणी पियू नये, फळ पण वेळेतच खावी  इत्यादी.....

          बापरे ! कितीही चिंता, काही नवीन वस्तू घ्यायचा विचार झाला तरी १० वेळा विचार करावा लागतो, आपल्यासाठी कोणती वस्तू योग्य असेल. समोरच्या दिवसाचं दिनक्रम आधल्या दिवशी करावं लागतं.
म्हणून वय जसं जसं मोठ होत तसं तसं विचार करण्याची क्षमता वाढत जाते आणि मेंदूमध्ये प्रश्नावली तयार होते. आणि यामुळे अती विचारांची समस्या उद्भवू लागते. हातात पैसा जसा येत जातो तश्या माणसाच्या गरजा वाढत जातात.

              या धावत्या युगात साधं राहणीमान लोप पावत असल्याचे दिसून येते. जे आयुष्य आपण लहान असताना जगलो ते आयुष्य आताच्या पिढीला जगता येत नाहीच. आताच्या पिढीच काहीतरी नवीनच असतं. जितका कमी विचार तितके लवकर प्रश्न सुटतील आणि अतिविचारांची, बंधन असल्याची काळजी मिटेल.

Sunday, July 14, 2024

भेटला विठ्ठल माझा 🌸

                प्रत्येक धर्मात अनेक देव आहेत. त्या देवांची पूजा अर्चना केली जाते. भक्ताला देवाने दर्शन द्यावे ही प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या संकटात देवाने आपल्याला मदत करावी असे प्रत्येकाला वाटत असते. देवाने स्वयंभू आपल्याला आशीर्वाद द्यावा अस वाटत असते. त्यासाठी फक्त भक्ती करून होत नाही, त्यासाठी आपले आचरण हे देवांच्या शिकवण प्रमाणे असायला हवे. अर्थात देव आहे आपल्या हृदयात असतो, आपण चुकीचं कार्य केल्यास देवाचं आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरते.
            रोजच्या जीवनात अनेक प्रसंग येतात, जेव्हा आपल्याला नियम पाळावे लागतात. दुपारच्या वेळेला ट्रॅफिक नसले तरीही १ मिनिटांसाठी सिग्नल वर थांबल्याने मागून येणारे वाहने सुद्धा थांबतात हा माझा स्वतः चा अनुभव आहे. प्रत्येकाची मानसिकता नसतेच, ते नियम न पाळता नियमांच उल्लंघन करतात. आपण आपल्या नियमांवर ठाम राहल्यास समोरच्या व्यक्तीला सुद्धा नियमांची कठोरता कळते. अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला मदतीचा हात दिल्यास आपल्याला ही मदत मिळतेच. शुद्ध मन, विचार, आचरण असल्यास देव सतत आपल्या हृदयात विराजमान असतात.

           एकमेकांना मदत केल्यास माणुसकी टिकून राहते. देव कोणत्या रुपात येऊन तुम्हाला मदत करेल हे कळणार पण नाही. त्यामुळे चांगले कर्म करत राहिल्याने त्या कर्माचे गोड फळ मिळतेच.

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...