Sunday, August 04, 2024

न संपणारं दुःख

                माणसांच्या जीवनात भावनांच चक्र सुरू असते. कधी चेहऱ्यावरचं गोड हसू, कधी क्षणात आलेला राग, कधी डोळ्यातून वाहलेले अश्रू तर कधी मनातल्या मनात साठवलेली भावना.

                सुख सर्वानाच हवं असते. माणसाला सुखात राहावं वाटते. पण हे सुख कायम असेल अस नसतेच. प्रत्येकाच्या जीवनात चढउतार होतच असते. सुखाबद्दल नेहमी बोलले जाते पण दुःखाचं काय ?

                दुःखात माणूस हताश होतो, नैराश्यात जातो, मानसिकरीत्या दुबळा बनतो, आणि या संकटांतून सावरायला फार काळ लागतो. नियतीने प्रत्येक जीवाचा जन्म आणि मृत्यू लिहिलेला आहे. ज्याने या धरणीवर जन्म घेतला तो एक ना एक दिवस अनंतात विलन होणारच हा निसर्गाचा नियमच आहे.

              आपल्या जीवनात आपण आपल्याकडे असणाऱ्या आधारामुळे जीवन जगत असतो. प्रत्येक व्यक्तीकडे जीव लावणारी माणसं असतातच. आपल्यासोबत आपली जवळची व्यक्ती आहे याचं समाधान असते. पण काही कारणास्तव ती व्यक्ती आपल्यापासून दूर झाल्यास होणारा त्रास हा असहनीय असतो. ज्या व्यक्तीला डोळ्यादेखत आपण बघतो, बोलतो ती व्यक्ती एक दिवस कायम आपल्याला सोडून जाते यातून मनाला लागणारा धक्का अविश्वसनीय असतो. यापेक्षा कोणतेही दुख मोठे नाही.

              जरी हे सर्व आपल्यासोबत घडू नये याची मनात धारणा ठेवली तरी, हे दुःख कोणापासूनही वंचित नाहीच. आज काय घडेल किंवा उद्या काय घडेल याची शाश्वती नाही.

No comments:

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...