प्रत्येकाला कधी कधी जीवनात यातना सहन कराव्या लागतात. जोपर्यंत मेहनत नाही तोपर्यंत पैसे नाही आणि पैसे नाहीतर काही नाही. पैसे हे सर्वस्व नाहीच पण आजच्या काळात पैशाशिवाय काही होत नाही.
कित्येक नोकरदार हे त्यांना न आवडणार काम करत असतात. काम कशासाठी तर हातात ४ पैसे यावे यासाठी सर्व मेहनत असते. कोणाच स्वप्न हे काही वेगळं असते मात्र पैशाखातीर नाईलाजाने काम करावं लागत. महिन्याच्या शेवटी मिळालेला कामाचा मोबदला नोकरी सोडण्याच्या विचारला दूर ठेवतो. रोज कामाच्या ठिकाणी प्रवास करणे, काम करणे त्यानंतर घरची सुद्धा कामे करणे हे काही साधारण नाहीच. मनात काहीतरी वेगळ करण्याची इच्छा असेल तरीही कधी कधी नाईलाजाने त्या करता येत नाही.
कितीही त्रासदायक प्रवास असला तरीही त्या नोकरीमुळे आपलं घर चालते यात समाधान असते. आजच्या काळात पैशाला खूप महत्त्व आहे. पैसे कमावणे ही एक काळाची गरजच झाली आहे. नोकरी असेल तर लोक सुद्धा २ शब्द गोड बोलतात मात्र बेरोजगार असणाऱ्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. समोरील व्यक्तीकडे किती पैसे आहे यावरून त्याला आदरपूर्वक वागणूक दिली जाते.
वाढती महागाई बघता एकट्या व्यक्तीने घर सांभाळणं कठिणच होत चाललंय. ज्या कामामुळे आपल्या घरी लक्ष्मी येते त्या कामाचा आदर करायलाच हवा.
No comments:
Post a Comment