समाजाचा परिणाम हा व्यक्तिमत्व विकासावर होतो. लहानपणापासून वयात येत पर्यंत सभोवताल घडणाऱ्या घटनांचा परिणाम हा त्या व्यक्तीच्या विकासावर परिणाम करत असतो. प्रत्येक गोष्ट समजण्यासाठी ती वेळ यावी लागते.
कानांनी एकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की स्वतः बघितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा हा प्रश्न नवा नव्हेच. प्रत्येक गोष्ट आपल्याला त्याच वयात कळेल अस होत नाही. वयात आल्यावर ती गोष्ट आपोआप आत्मसात केल्या जाते, त्यासाठी सल्ल्याची गरज भासत नसते. जेव्हा व्यक्तीला परिपक्वता येते तेव्हा समज येते, काही गोष्टीबद्दलचा समज हा बदलू शकतो. आपण भूतकाळात विचार केला तो चुकीचा होता हे सुद्धा प्राप्त होऊ शकते.
आजच्या काळात विचारांने समृद्ध असणे फार गरजेचे आहे. योग्य समज येणे ही काळाची गरज आहे. भूतकाळात आपले काही विचार असतील पण त्याच मुद्द्यांवर आता वर्तमानकाळात वेगळे विचार असू शकतात. काळानुसार बदल हा निसर्गाचा नियमच आहे.