काल ९ ऑक्टोबर रोजी श्री रतन नवल टाटा सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी साधारण मध्यरात्री प्रसारित माध्यमातुन कळाली. जणूकाही आपल्या परिवारातील, आपल्या जवळील व्यक्ती हरपला असेच वाटू लागले. मी तर त्यांना भेटले पण नाही, फक्त त्यांचा फोटो बघितला पण इतका जवळच नात कस काय तयार झालं असावं, की माझ्या मनाला दुःख वाटू लागले.
आज या बातमीने पूर्ण देश हळहळ व्यक्त करतो आहे. आज आपल्या देशातच नाहीतर संपूर्ण जगात टाटा एक ब्रँड म्हणून प्रसिध्द आहे. हा ब्रँड बनवण्यासाठी घेतलेले कष्ट अवर्णनिय आहे. घराघरात मिळणाऱ्या मिठापासून ते विमानाच्या प्रवासापर्यंत सर्व क्षेत्रात टाटा या ब्रँड ने डंका वाजवला आहे. एक उत्कृष्ट उद्योजक म्हणून टाटांच नाव आहे.
खर सांगायचं तर माणूस कितीही मोठा झाला तरी माणुसकी कायम ठेवता आली पाहिजे आणि हेच कारण की रतन सर विषयी सर्वांना आदर वाटतो. स्वतः उद्योजक असेल तरीही आपल्याला समाजाला देणं लागते या निष्टेवर ते कार्य करत आले. आतापर्यंत केलेली देशसेवा, समाजसेवा, लोककल्याणासाठी दान धर्म ही सर्व देशाच्या प्रेमापोटी.
नक्कीच काहीतरी वेगळं होतं. ते आदर्श व्यक्तिमत्त्व होते. साधं राहणीमान, दुसऱ्यांना नम्रतेने वागवणे या काही निवडक गोष्टी. आपले आदर्श हेच असावे. एक दिवस हा येणारच होता हे सर्वांना माहीत होते. पण हे असं व्हावं कोणाला वाटत नव्हते.
असे देवमाणूस पुन्हा होणे नाही.
भावपूर्ण आदरांजली