Thursday, October 10, 2024

अनमोल रत्न

         काल ९ ऑक्टोबर रोजी श्री रतन नवल टाटा सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी साधारण मध्यरात्री प्रसारित माध्यमातुन कळाली. जणूकाही आपल्या परिवारातील, आपल्या जवळील व्यक्ती हरपला असेच वाटू लागले. मी तर त्यांना भेटले पण नाही, फक्त त्यांचा फोटो बघितला पण इतका जवळच नात कस काय तयार झालं असावं, की माझ्या मनाला दुःख वाटू लागले.
 
         आज या बातमीने पूर्ण देश हळहळ व्यक्त करतो आहे. आज आपल्या देशातच नाहीतर संपूर्ण जगात टाटा एक ब्रँड म्हणून प्रसिध्द आहे. हा ब्रँड बनवण्यासाठी घेतलेले कष्ट अवर्णनिय आहे. घराघरात मिळणाऱ्या मिठापासून ते विमानाच्या प्रवासापर्यंत सर्व क्षेत्रात टाटा या ब्रँड ने डंका वाजवला आहे. एक उत्कृष्ट उद्योजक म्हणून टाटांच नाव आहे.

        खर सांगायचं तर माणूस कितीही मोठा झाला तरी माणुसकी कायम ठेवता आली पाहिजे आणि हेच कारण की रतन सर विषयी सर्वांना आदर वाटतो. स्वतः उद्योजक असेल तरीही आपल्याला समाजाला देणं लागते या निष्टेवर ते कार्य करत आले. आतापर्यंत केलेली देशसेवा, समाजसेवा, लोककल्याणासाठी दान धर्म ही सर्व देशाच्या प्रेमापोटी. 

          नक्कीच काहीतरी वेगळं होतं. ते आदर्श व्यक्तिमत्त्व होते. साधं राहणीमान, दुसऱ्यांना नम्रतेने वागवणे या काही निवडक गोष्टी. आपले आदर्श हेच असावे. एक दिवस हा येणारच होता हे सर्वांना माहीत होते. पण हे असं व्हावं कोणाला वाटत नव्हते.

असे देवमाणूस पुन्हा होणे नाही.
भावपूर्ण आदरांजली 

Sunday, October 06, 2024

चित्रकला भाग ८

काडीपासून रंगकाम

माता सरस्वती


राधाकृष्ण



घर कसे असावे

मोर कला


Sunday, September 29, 2024

मी एक कलाकार

          रोजच्या जीवनात मला अनेक प्रश्न पडायचे त्यातला एक म्हणजे मी कोण आहे ? विचारांची पातळी उच्च असल्यास हा प्रश्न कठीणच वाटेल. मी कोण आहे ? माझी ओळख काय आहे ? माझ्यात अस काही वेगळं आहे का ? आजच्या धावत्या युगात मी स्पर्धा करू शकेल का ? असे अनेक प्रश्न सतावत राहायचे. एक दिवस ठरवल आपण या प्रश्नाचं उत्तर शोधायलाच हवं. 

         प्रत्येक व्यक्ती विशेष असतोच पण विशेष व्हायला मेहनत लागते, मेंदूचा वापर करावा लागतो. मी म्हणू शकते मी एक कलाकार आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीत उत्कृष्ट व्हावं लागेलच अस काही नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट करता आली पाहिजे. 

        मी ओळखली माझी कला. ती कला करताना माझं मन रमत. मला उत्साही वाटतं. ती कला पूर्ण होत पर्यंत समाधान वाटत नाही. अश्या विविध कला जोपासणे आजच्या काळाची गरज आहे. शाळेत शिकत असताना या गोष्टीचं महत्त्व कळायचं नाही पण याच गोष्टी आपल्याला किती आनंद देऊ शकतात, आपले मानसिक आरोग्य चांगले राखू शकते हे कळले.

          आजच्या काळात सोशल मीडिया मुळे कितीतरी प्रकारच्या कला जगासमोर आल्या आहेत. कधी विचार केला नव्हता त्या सुद्धा कला बघता येत आहे, शिकता येत आहेत. जग फार मोठे आहे, नवीन जगासोबत नवीन गोष्टी शिकणे तितकेच गरजेचे आहे.

         भरतकाम, ग्रिटींग कार्ड, मेहेंदी, चित्रकला, रांगोळी, सजावट, संगीत, स्वयंपाक, रंगकाम, शिलाई काम, नृत्य, गायन, लिखाण, वाचन अश्या अनेक प्रकारचे छंद बाळगायला हवे. छंद म्हणजे फावल्या वेळेत करता येणाऱ्या कृती. याच छंदातून अनेक लोक व्यवसायाकडे वळतात. पण सर्वप्रथम प्राधान्य शिक्षण आणि नोकरीला द्याला पाहिजे. 

         आपण विचार केलेली भविष्यातील परिस्थिती तशीच असेल अस होत नाही. काळानुसार निर्णय बदलावे लागतात. एकच म्हणायचं आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहा. 


चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...