फुले पाहून माझे मन आनंदाने बहरले
गुलाबी रंगात रंगून पुष्प वाऱ्याने डुले
पावसाचे थेंब जणू वाटे फूल मोत्याने सजलेले
फुले पाहून माझे मन आनंदाने बहरले
लिखाण हे एक संवादाचे साधन आहे. प्रत्येकाला आपलं जीवन कस जगायचं याच स्वातंत्र्य आहे. आपला देश जसा आधुनिक प्रगती करत आहे तसंच मानवाचे विचार पण आधुनिक गोष्टीकडे वळत आहे, या जगासोबत चालता चालता मूळ तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. आजच्या काळाची गरज बघून मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे. एकापण व्यक्तीला या तत्त्वाचे महत्त्व पटले तरी मला आनंद आहे.
फुले पाहून माझे मन आनंदाने बहरले
गुलाबी रंगात रंगून पुष्प वाऱ्याने डुले
पावसाचे थेंब जणू वाटे फूल मोत्याने सजलेले
फुले पाहून माझे मन आनंदाने बहरले
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक असा क्षण येतो जेव्हा त्या व्यक्तीला सर्व नकोस वाटे. मनातून हरल्यासारख वाटते. मोकळा श्वास घ्याला त्रास होतो, जीवनात पूर्ण काळोख दिसायला लागतो. तसंच काही माझ्या बाबतीत झाल. एक क्षण असा आला की मन कोमेजून गेल होत. कधी आपल्या कडून काही चुका होतात पण आपल्याला तेव्हा ते बरोबर वाटते. पण त्या गोष्टीची जाणीव नसते. वाईट संगतीचा परिणाम जीवनावर होतो आणि आपल्या जीवनात काही वाईट काही चांगले प्रसंग घडत असतात. एककाळ असा येतो की नवीन काहीतरी करायला मानसिकदृष्ट्या कमजोर होऊन असत. पण देवाला बहुतेक ते मान्य नव्हता. हिला एक आत्मविश्वास, जगण्याची नवीन उमेद द्याल हवी, म्हणून देवाने मला एक भेट दिली.
देवानी दिलेल्या भेटीमुळे माझ पूर्ण जीवन बदलल, माझा जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोण बदलला. एक कळीच फुलात रूपांतर होते तस माझ एक मला नवीन आयुष्य मिळाल. जीवनाला एक आकार मिळाला. नवीन नवीन गोष्टी करण्याला उत्साह वाढला. एक मनातला स्वतःबद्दलचा आत्मविश्वास वाढत गेला. जगाला पाहण्याचा वेगळा दृष्टिकोण मिळाला. स्वतःबद्दल आनंद वाटू लागला. एक जीवनात बदल झाला. जगाची ओळख पटली. आज जगताना व्यक्ति आपली मूळतत्त्व विसरत आहे. माझा पण तसच काही झाल, पण त्या गोष्टीची जाणीव होऊन आज मी ठामपणे आपल्या मूळतत्त्व घेऊन या जगत एक आपला वेगळ जग निर्माण करत देवानी दिलेल्या या अमूल्य अश्या भेटीने सामोरे जायच प्रयत्न करत आहे.
अंड्यातून जीव निर्माण होतो. जर अंड्याला बाहेरून दबाव दिला तर ते फुटते आणि त्यातल्या जिवाची हत्या होते पण तेच जेव्हा तो अंड्यातला जीव स्वतची शक्ती वापरुन कवचवर दबाव देतो तेव्हा त्यातून नवीन जिवाची निर्मिती होते. याच काही विचार मानवाच्या जीवनात लागू होतात. जेव्हा आपण आपला एक वेगळ जग निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपली आंतरिक शक्ती मजबूत असावी लागते तेव्हाच आपण नवीन जगाशी सामना करण्यात सफल ठरतो पण तेच बाहेरून दबाव आला की मानवाच अस्तित्व संपते. नवीन आशेची किरण घेऊन जगात पाऊल ठेवायची ताकत प्रत्येकात असते आणि प्रत्येक स्वप्न साकार करण्याची हिम्मत पण असते मात्र त्या शक्तीची जाणीव असणे महत्त्वाचे असते. ती जाणीव मला एक मजबूत, खोडकर, स्वच्छ मन असणाऱ्या व्यक्तीने करून दिली. म्हणतात ना आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ति आपल्याला काहीतरी शिकवत असते. आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात येण्याच्या मागे काहीतरी गुपित असत. नाहीतर इतक्या मोठ्या लोकसंख्या असणाऱ्या जगात त्याच व्यक्तीशी भेट होणे हे नवलच आहे.
प्रत्येक व्यक्तीत एक आंतरिक आणि बाह्य सुंदरता असते. बाह्य सुंदरतेकडे लक्ष देता देता मातील आंतरिक सुंदरतेला बहुतेकजण विसरतात आणि स्व: पण विसरतात. आपल्या मनाला काय आवडते. काय केल्यावर मनाला आनंद मिळतो. आनंद म्हणजे खरा आनंद आजकालच्या काळातील आनंद नाही की सोशल मेडियावर 4 लोक आपली सुस्ती करत आहे. वाहवा करत आहे तो आनंद नाही. खरा आनंद म्हणजे कोणताही मोह न बाळगता स्वखुशीने केलेल एक कार्य आणि त्यातून ओठावर उमटणार हसू, हेच महत्त्वाच आहे. प्रत्येकच दिवस आनंदाचे नसतात कधी दुख कधी सुख त्यामुळे प्रत्येक दिवसाचा प्रतेकला सामान्य करावाच लागणार आहे.
मी माझ्या कला ना विसरून बसली होती. माझ्यातला आत्मविश्वास कमजोर झाला होता आणि माझ्यात पण काहीतरी वेगळ आहे हे मी विसरून दुखच डोंगर घेऊन बसली होती पण त्या एक व्यक्तीने माझ्या मनातल ओळखून मला प्रोत्साहन दिल. आणि प्रत्येक क्षणाला साथ दिली. आणि आज मी एक्स्पर्ट आहे अस म्हणत नाही पण मी जे करते त्यातून मला आनंद मिळतो जस लिखाण, चित्रकला, रंगोली, मेहंदी, काही नवनवीन वस्तु बनवणे या सर्व गोष्टीतून आनंद मिळतो. 4 लोकानी स्तुति करावी अस पण माझ्या मनात नसते पण काही दिवसानी तेच मी स्वता पाहले की एक वेगळाच समाधान असते. वाहह छान अस स्वतःलाच शाबासकी देत असते. एक छोटासा मार्ग जरी बदलला तरी ते आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणू शकते. त्यामुळे अस म्हणतात ना ह्रदय काय सांगते ते ऐका.
आदर्श व्यक्ति ही प्रत्येकाच्या जीवनात असावी. जी व्यक्ति तुम्हाला काय चूक काय बरोबर हे समजावून सांगते. तुमच्या चुका झाल्या तरी योग्य मार्ग सांगत असेल, बरोबर असेल तर त्या गोष्टीत हिम्मत देते असेल, नेहमी तुम्हाला तुमच्या शक्तीची जाणीव करून देत असेल तीच व्यक्ति तुमच्यासाठी आदर्श. जेव्हा त्या आदर्श व्यक्तीची साथ लाभते तेव्हा माणूस कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करू शकते. तसच मला वेळोवेळी आधार मिळाला, प्रोत्साहन मिळालं म्हणून आज इतके शब्द मी लिहू शकत आहे. मला स्वतःवर गर्व वाटतो आज देवानी मला अश्या व्यक्तीची भेट घडवून दिली. वर्णन करावा तितका कमी आहे,चांगले गुण सांगाव तितका कमी आहे. आणि शिकण्यासारख इतका आहे की आयुष्यभर पुरेल.
जस जस आपण या जगात मोठ होतो तस अनेक गोष्टीची जाणीव होत असते जगात काय बरोबर चालू आहे काय चुकीच आहे कोणत्या गोष्टीला विरोध असावा आणि कोणत्या गोष्टीला पुढाकार करावा. जस नाण्याला २ बाजू आहेत तस प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे क्षण आणि दुःखाचे क्षण हे कायम जीवनभर असणारच पण त्याला सामोरे कसे जायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. आज काही गोष्टीला जेव्हा मनाला स्पर्श करतात तेव्हा त्या मनाला लागतात आणि डोळे पाणवतात ते मग आनंदाचे असो किवा दुःखाचे....
निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...